चालाना येऊ फिरून
जाऊ दूर मस्त ।
हाफ तिकीट लागते
पडते ना हो स्वस्त ।
येसटी नच जा लागन
मग कुठं बी उतरा ।
यात्रा बरी घडन वो
गाव फिरू ना सतरा ।
जाऊ जाऊ मुन तुमी
नेलं च कुठं आतावरी ।
चार धाम झाले असते
पर केलं तुम्ही म्हतारी ।
आता न्हाई नोका म्हनू
यंदा जाचच आपल्याले ।
पांडुरंगानं बलावल
काई कायते का तुमाले ।
रंग्या मंग्या ऱ्हाउ द्या
दोघच आपून जाऊ ।
पूना मुंबई बी तिकड
डोये भरून पाहू ।
समुद्राच मले बी हो
हाय लयच येड ।
आंघोय करू तिथं
काडू त्याचीबी छेड ।
चाला बर उठा आता
बॅग तुमची भरा ।
म्या ठीवली भरून
आता निंगा तरा तरा ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment