Monday, December 30, 2019

" एकतीस डिसेंम्बर.... "

एकतीस दिसेम्बर मांगचा
आठवते अजून भौ मले ।
एक थेंब घ्याची न्हाई
ठरवलं होतं हे सांगतो तुले ।

काय वरीस निंघाल गा
प्याच लागली ना मले ।
पहिल्याच दिशी सांगतो
भेटाले दुरून दोस्त आले ।

न्हाई न्हाई म्हनता भौ
घेऊन गा मले गेले ।
घ्याच लागते म्हने सारे
न्हाईत पैसे द्या लागन तुले ।

रिकामा महा खिसा मुन
जीवावर आलत भांडे घासाले ।
पेउन झालो मोकळा तवा
सुखरूप पोचलो घराले ।

तवा पासून राजा ठरवलं म्या
सोडाची गोठ सांगाची नाई कोनाले ।
प्यावं वाटलं त एकटच जाऊन
खाऊन पेउन लागाच रस्त्याले ।

पायता पायता सरलं वरीस
पोचलो ना एकतीस डिसेंम्बरले ।
झक्कास पडलं पार सारं
बाकी पाहू पुढच्या वरसाले ।
Sanjay R.

" जीवन रंग "

काय जीवनाचा रंग
जगणेच आहे व्यन्ग ।

स्वप्नांचा होतो भंग
शोधायचे त्यात तरंग ।

होऊन विचारात दंग
घर ठेऊनिया संग ।

करायचा नेटका संसार
मुखी तुकोबांचा अभंग ।
Sanjay R.

" वर्ष सरताना...."

वर्ष सरतांना.....
उभा मागे इतिहास
पुढे भविष्याचा ध्यास ।
एक एक पान पालटून बघा
त्यात पुढे जायचा प्रयास ।
मनात होता आभास
थांबले नाहीत श्वास ।
नववर्ष येईल आता
करू सुरुवात खास ।
व्हायचे विजयी आम्हा
आहे हाच विश्वास ।
Sanjay R.

" अर्थ जीवनाचा "

" अर्थ जीवनाचा "

जन्म आणि मृत्यु
जीवनाची दोन टोके ।
जगायचे मध्ये
टाळून सारे धोके ।

कधी हसायचं
कधी रडायचं ।
वादळ वाऱ्याला
झेलत जगायचं ।

नागमोडी वाटा इथे
खाचखळग्यांनी भरलेल्या ।
पार होतात सहज
विश्वासाने सारलेल्या ।

दिन दुबळे गरीब बिचारे
मदत करा जगायला ।
वेळ नाही लागत कुठली
तयार राहायचे मरायला ।
Sanjay R.

Wednesday, December 25, 2019

" मेरी ख्रिसमस "

आला आला
सँटा आला ।
दिसतो कसा
दाढी वाला ।

मोठी दाढी
मोठ्या मिश्या ।
वाटतोय बघा
सगळ्यांना खुशा ।

लाल झगा
लाल टोपी
हाती घंटी
झोळी पाठी ।

हवेत गिफ्ट
सांगा कुणाला
घोळका मुलांचा
म्हणतो मला ।

जिंगल बेल
जिंगल बेल ।
मुलं खुश
वाटतंय वेल ।

" हॅपी ख्रिसमस "
Sanjay R.

Tuesday, December 24, 2019

" शोधतो मंगळ "

लग्न नाही जुळत
आहे म्हणतात मंगळ ।
दोघानाही असेल तर
होते का मग चंगळ ।

पृथ्वी वर राहताय ना
दूर आहे हो मंगळ ।
वाजते का थंडी मग
करू नका आंघोळ ।

यान आले जाऊन
बघून आले मंगळ ।
शोध पाण्याचा सुरू
जीवनाची सळसळ ।

मात्र अजूनही शोधतो
मंगळाला मंगळ ।
नाहीच मिळाले तर
होते का हो अमंगळ ।
Sanjay R.

" मंगळ लग्नातला "

अंतराळात थोडे बघा
अति विशाल याचा आकार ।
नजर थांबेल पण
आकाश नाही सम्पणार ।
असंख्य ग्रह ताऱ्यांची
इथे आहे वस्ती ।
सगळे एकमेकात गुंफलेले
ढळला तो सरला ।
हा एकच सिद्धांत
आहे ठाऊक यांना ।
स्वतःच्या शक्तीनुसार
सतत भ्रमंती सुरू असते ।
प्रत्यकाला आपली
कक्षा आहे ठाऊक ।
कोणीच कक्षेच्या बाहेर
डोकावत नाही ।
आणि डोकावले तर
कपाळमोक्ष ठरलेला ।
पृथ्वी सूर्य चंद्र मंगळ
सारेच माळेतले मणी ।
मात्र इथे आम्ही
पृथ्वीवरचे ज्ञाणी ।
भक्तीवान काही
शक्तीवान काही ।
निर्बुद्ध काही तर
बुद्धिवान काही ।
मनात येईल तसे
आमच्याच मनाने वागतो ।
दिवस आणि रात्र
सांगेल तसे जगतो ।
मन भिर भिर
घाबरून थोडे बघतो ।
ज्ञानी जसे सांगतो
तसेच मग वागतो
मंगळाची दशा आणि
शनीचा राग टाळतो ।
पृथ्वी ला मात्र
मनात येईल तसे जळतो ।
स्वतःच्याच हाताने
विध्वंस स्वतःचा करतो ।
करून विनाश स्वतःचा
अनंतात मग विसावतो ।
Sanjay R.

" भेटन का कापसाले भाव "

फेल झाले
सरकारचे डाव ।
आता भेटन का
कापसाले भाव ।

एकोपा सरला,
मिटलं नाव ।
पेटून उठला ना
समदा गाव ।

सांगा ना भाऊ
आता कोनी ।
घरातले वांधे
कोनाले सांगाव ।

कफल्लक झालो
महागाई पाई ।
न्हाई खाले,
घर कसं चालवाव ।
Sanjay R.

"आनंद हवा जगायला "

विचार वयाचा कशाला
आनंद हवा जगायला ।
एक एक श्वासा सोबत
हवा उत्साह हसायला ।
मुखवटा सुंदर करायचा
इतरांना छान दिसायला ।
अंत तर निर्विवाद सत्य
वेळच कुठे विचार करायला ।
Sanjay R.

" रे बळीराजा "

रे बळीराजा…..

सहनशक्ती तुही सांग
किती हाये रे अपार ।

कयनार न्हाई कधीच तुले
थ्या चाकूची रे धार ।

न्हाइ ठाव, अजब रे
हाये हे सरकार ।

पोटावर तुह्या होते
किती किती रे वार ।

सांग तूच आता तुले
हाये कोनाचा आधार ।

किती रे झेलशीन तू
हे अशे परहार ।

काया मातीत राबतो
न्हाई तुले दिस वार।

घरात जगतेत किती
सांग किती तुहा भार ।

पै पै लागे मातीत
घेते पाऊसच इसार।

सावकारापुढ कसा
होतो रे तू लाचार ।

तिसरा मधीच कोनी येते
करते तुह्या व्यापार ।

खिसा घेते हिसकुन
आनं सरतेत ईचार ।

सांग ठनकावून जरा
तूच जगवतो सारा भार ।

नको रे सोसू असा
एकटाच सारे वार ।

फेक फंदा फाशीचा
दे घराले तू आधार ।

टाक उलटून आता
सरकारचा ह्या दरबार ।

जयुन तू रे जयनार किती
राखे ईना काय उरनार ।

टाक जायुन तू आता
पडू दे त्यांयचेच निखार ।

संजय रोंघे,
नागपूर .
मोबाईल : 8380074730

" तुझ्या पाई रे माणूस हरला "

काय झाले कुणास ठाऊक
शांतीचा तर रंगच पालटला ।
मोर्चा दगडफेक जाळपोळ
हिंसेचा तर डोंब उसळला ।

सगळीकडे अफवांचा बाजार
सुत्रधाराने एक डाव रचला ।
जीव कुणाचा जातोय सांगा
अविचारी तर तिथेच फसला ।

शांती अहिंसा गांधींचा मार्ग
कसा रे माणसा तू विसरला ।
हो ना थोडा शांत जरासा
तुझ्यापाई रे माणूसच हरला ।
Sanjay R.

Friday, December 20, 2019

" खोटा मुखवटा "

" खोटा मुखवटा "

कोण खोटा कोण खरा
समजणे कठीण आहे ।
ओढून मुखवटा निघतात सारे
ते तर त्यांचे रुटीन आहे ।

धडधाकट ही करतो सोंग
ढोंग समजणे कठीण आहे ।
पैशासाठी करतील काही
ते तर त्यांचे रुटीन आहे ।
Sanjay R.

" समृद्ध भारत "

देश भारत माझा
समृद्धीने भरलेला ।
भिन्न भाषा भिन्न धर्म
विविधतेने फुललेला ।

प्राचीन इथला इतिहास
संस्कृतीने सजलेला ।
शूरवीरांची गाथा इथली
पराक्रमानी धजलेला ।

स्वातंत्र्याची घेऊन धुरा
तिरंग्यापुढे झुकलेला ।
देऊन आहुती प्राणाची
केले स्वतंत्र भारताला ।

गांधी नेहरू भगतसिंह
इथेच आले जन्माला ।
संत महात्मे इथलेच सारे
वंदन करतो मी मातीला ।
Sanjay R.

" माणसापुढे माणूस लाचार "

कोण कुणाचा आधार
माय बाप ही वाटे भार ।

बदलले सगळेच आचार
अंतरात या कुठले विचार ।

झाले पुसट सारे उपकार
माणसाचाच होतो प्रहार ।

काळजाला विकृत आकार
जडत चालला हा विकार ।

जगतो करून तो दुराचार
माणसापुढे माणूस लाचार ।
Sanjay R.

" आसवही आहेत भिजण्यास आतुर "

एकटा असतो मी जेव्हा
विचारांचं उठतं मनात काहूर ।

वाढते गती श्वासांची आणि
भिर भिर नजर मग होते स्थिर ।

शोधतो काय आकाशात पण
बघत बसतो क्षितिजा आड दूर ।

कळतच नाही मग येतो कसा
डोळयांच्या कडेला आसवांचा पूर ।

अंतराळात गवसतो एकटाच नभ
टाकतो देऊन त्यास मी माझा सूर ।

मग वाट बघतो मी पावसाची
आसवंही आहेत भिजण्यास आतुर ।
Sanjay R.

" थंडी "

पहाटेला उठावे तर
वातावरण थंड ।
वाटतं झोपावं अजून
मन करतं बंड ।

सहा वजताही बाहेर
अंधारच असतो ।
सूर्याची वाट बघत मग
चहा पीत बसतो ।

चिमण्यांची चिव चिव
होते मग सुरू ।
कुडकूड करत वाटतं
कसा मी फिरू ।

रजई देते हाक मला
घे थोडं पांघरूण ।
पहाटेची स्वप्न येतात
का कुणाला सांगून ।

स्वप्न अशी खरी होतात
बघ तू जरा ।
फिरून गार गार थंडीत
होशील का बरा ।

निघाला सूर्य की मग
उन्हात तू बस ।
अनुभव ना जरा तू
जीवनाचा रस ।
Sanjay R.

अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य सम्मेलन अमरावती ला

चला, अखिल भारतीय वर्हाडी साहित्य सम्मेलनाला जाऊ या ।

Saturday, December 14, 2019

" म्हातारपण "

सरतो आहे पुढे पुढे
आयुष्याचा एक एक टप्पा ।

सुटत चालली एक एक कडी
कोण उरेल करायला गप्पा ।

मी मी म्हणणारा प्रत्येक जण
तू चा घेतोय आधार ।

पेलवत नाही बघा आता
म्हातारपणाचा भार ।

कठीण किती जीवन हे
दिसे अंताला जीवनाचा सार ।

वाट बघतो बघत आकाशी
नेतील कोण मला चार ।
Sanjay R.

" सून सासुवर भारी "

सून सासुवर भारी
होते सासू बिचारी ।

सत्ता सुनेची सारी
ही संसाराची वारी ।

बघून सून टीव्ही
होते कशी दुराचारी ।

अवतार सुनेचा बघून
सासू होते मग विचारी ।
Sanjay R.

Tuesday, December 10, 2019

" लय झाला वांदा "

भौ घरी न्हाई कांदा
झाला लय हो वांदा ।

भाव टेकले अभायाले
बेपारायचा होते धंदा ।

ज्यानं पिकवला त्याले
भेटला का हांडा ?

शेतकऱ्याच्या मालाले
दुसराच करते गंदा ।

ज्याची रायते मेहनत
गळ्यात त्याच्या फंदा ।

काय सांगाव बावा
पडते गळ्यावरच रंदा ।
Sanjay R.

Monday, December 9, 2019

" मी लाचार या कवितेचे प्रकाशन "

माझे व्यासपीठ मासिक मुंबई डिसेंबर 2019 अंकात माझ्या " मी लाचार " या कवितेचा समावेश करण्यात आला. संपादकांचे खूप खूप आभार .

" प्रवास चाले अविरत "

मज जगण्याची ही कला झाली अवगत
जमले मला हे सारे सांगतो तुझ्याच सोबत ।

उगवतो सूर्य प्रवास चाले त्याचा अविरत
सायंकाळ होता मग विसावतो पर्वतात ।

बहरते रातराणी तिच्याच सुगंधात
बेधुंद होतो काळोख काळ्या अंधारात ।

सजीव निर्जीव सामील सारे या उत्सवात
बघतो दूर मी धावते आभाळ गगनात ।
Sanjay R.

Sunday, December 8, 2019

" आयुष्याचा पाढा "

दिवस रात्र अभ्यास करा
घेऊन डिग्री उपाशी मरा ।

नोकरी साठी तडफड करा
धंदा शेती की रिकामा बरा ।

काही तरी करून थोडे कमवा
लग्ना साठी ही चप्पल झिजवा ।

होत नाही सेटल तर वाढते वजन
डॉक्टरचे मग छान जमते भजन ।

आरोग्य चिंता त्यात मुलांचे शिक्षण
आयुष्य गेले बदलले नाही लक्षण ।

नातू पणतू सारेच जमा झाले पण
वृद्धाश्रमात हो कोणीच नाही आले ।

आठवत नाही आता शेवट काय झाले
सगळेच असून खांद्यावर कोणी नेले ।
Sanjay R.

" पाहिले मीच जाईल "

नाही जीवाची चिंता मला
जो तो म्हणतो मीच जाइल ।
नष्ट तुमचे जीवन करून
पृथ्वी तलावर मीच राहील ।
घाई मला साऱ्या दुनियेची
मालक सडकेचा, मीच जाईल ।
देऊन धडक तुम्हास मी
उभा आडवा मी पाडील ।
नियम सारे खिशात माझ्या
पैशांनी मी विकत घेईल ।
जीव तुमचा गेलाच तर
कोण माझे वाईट करील ।
चिंता असेल तुम्हास जीवाची
नका निघू हो बाहेर कोणी ।
मरून पडाल रस्त्यावर तर
पाजेल तुम्हा कोण पाणी ।
Sanjay R.

Wednesday, December 4, 2019

" अभंग "

मुखे गातो तुकोबांचा अभंग
सोबत संत महात्म्यांचा संग
चहूकडे दिसे ज्ञानियांचा रंग
हाती टाळ चिपड्या घेऊनि
भक्त झाला हरी नामात दंग
अंतरात वसे त्याच्या विठ्ठल
महिमा तुझीच देवा पांडुरंग
Sanjay R.

" जळतो तीळ तीळ "

झाली आता सांज वेळ
सम्पला सूर्याचा खेळ
होईल अंधाराचा मेळ
वाजते दुर कुठे शीळ
जळतो जीव तीळ तीळ
Sanjay R.


Monday, December 2, 2019

" माणसा तू केलेस लाचार "

रात्रीचा काळा अंधार
वाटे जीव मोठा भार ।
एकटी स्त्री असेल कुठे
तिला मग कुठला आधार ।
जंगल झाडे जनावर सारी
नसते भीती त्यांची फार ।
माणसातल्या हैवानाचा
पावलो पावली दिसे बाजार ।
कुणाकडेच उरला नाही
इथे माणुसकीचा विचार ।
आई बहीण मुलगी कशी
आपल्याच लोकात लाचार ।
Sanjay R.

Sunday, December 1, 2019

" किती निष्ठुर रे तू "

किती निष्ठुर रे
तू सांग माणसा ।
का झालास तू रे
असा बलात्कारी ।
जगशील कसा रे तू
होऊंन व्यभिचारी ।
आई बहीण घरी तरी
नाही कुणी विचारी ।
फासली काळिमा
विसरला दुनियादारी ।
करून दुःखी असा तू
सांग जगशील कसा
तू हयात सारी ।
Sanjay R.

Saturday, November 30, 2019

" काळजावर घाव "

परत एक डाव
वादळात नाव
जगण्याची हाव
अंतरात धाव
काळजावर घाव
कावळ्यांची काव
स्तब्ध झाली नाव
Sanjay R.

" गावाकडच्या गोष्टी "

आज गावाला जायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो. मात्र लहान असतांना गावाला जायचं म्हटलं की खूप आनंद व्हायचा. जायचा दिवस येईपर्यंत मग नुसती स्वप्न रंगायची . कसं जायचं, केव्हा जायचं, कुठे कुठे जायचं, गेल्यावर काय काय करायचं, कुना कुणाला भेटायचं. शेतात काय असेल, आंब्याच्या झाडाला आंबे लागले असतील मग ते कसे तोडायचे. राखणदार असेल मग त्याला चुकवून कसे झाडावर चढायचे. सगळ्या गोष्टीवर विचार व्हायचे.
आणि मग गावाला गेल्यावर मस्त मजा करायची.
आंबे , बेल फळ, शिंदीच्या झाडाचा बुंधा चिंचा खाताना खूप मस्त मजा यायची, गावातल्या मुलांसोबत गाई बैलांना घेऊन शेतात चरायला न्यायचे, नदीत सकाळी पोहायला जायचे, सायंकाळी नदी काठी फिरायला जायचे, कधी जाळे लावून मासे पकडायचे, रात्री अंगणात खाटेवर पडून चांदणे मोजायचे तर सप्तर्षी म्हणजे चार चांदण्या म्हणजे बुढीचे खाटले आणि तीन चांदण्या म्हणजे तीन चोर , ते तीन चोर बुढी झोपायची वाट बघत आहेत,आणि चोरीच्या भीती पाई बुढी कशी रात्रभर जागी राहते या कथेवर चर्चा व्हायची. झोप येईस्तो कथा कथन चालायचे, त्यात राजा राणी, राक्षस अशा अनेक कथा असायच्या.
आज मात्र गावातील ते जीवन पूर्ण पणे बदललंय.
नद्यांच्या ठिकाणी नुसती एक नाली वाहतेय.
आमराईतले आंब्याचे बन पूर्णतः गायब झाले आहे. शिंदीचे बन पण संपले आहे, एखादं दुसरे झाड फक्त साक्ष द्यायला उभे आहे.
गावातले जीवनच पूर्णतः बदलून गेले.
मातीच्या घरा ऐवजी विटा सिमेंट ची घरं झालीत.
सोबत गावातली माणसं पण बदलली.
त्यावेळची माया, प्रेम, जिव्हाळा आता उरलाच नाही.
आता ते गावच राहिले नाही. त्याचे पण शहरीकरण झाले आहे. लोकं पण कोरड्या मनाची झालेली दिसतात.
काळानुसार बदल तर व्हायलाच हवा. पण जो एक कोरडेपणा जाणवतो, तो बघून मन दुःखी होते.
गाव गावच राहिला नाही.

संजय रोंघे
नागपूर

Friday, November 29, 2019

" शिक्षण वाटे एक भार "

वाटे शिक्षण साऱ्यास
जीवनाचा आधार ।
होईल कमी थोडा
या गरिबीचा भार ।

पण हा तर आहे
फक्त एक विचार ।
होते बंद कसे
उपजीविकेचे दार ।

उच्च शिक्षित किती
झालेत कसे बेरोजगार ।
नोकरी विना भटकती
बघा सारेच हुशार।

सांगा हुशार किती
आपले हे सरकार ।
अर्ध्या आयुष्याचा
केला कसा बाजार ।

दिला शिक्षणाने
युवकांना कसा आजार ।
घेतला हिसकावून
जगण्याचा आधार ।

काम धाम नाही कुणा
वाटे घरात तो भार ।
हाच तर आहे बघा
शिक्षणाचा सार ।
Sanjay R.

Thursday, November 28, 2019

" जाऊ नकोस दूर "

जाऊ नकोस दूर
मन माझे आतुर
गुंजतो कानात सूर
झरे आसवांचा पूर
का झालास फितूर
हृदय झाले चुरचुर
नको होऊस क्रूर
अंतरात रे तूच
जाऊ नकोस दूर
Sanjay R.

Wednesday, November 27, 2019

" पडकी विहीर "

कान अधीर
डोळे भिरभिर ।
श्वास थांबले
सुटला धीर ।
शब्द सुचेना
मन अस्थिर ।
सांज ढळली
झाला उशीर ।
रात किडेही
करती किरकिर ।
काळोखात ती
पडकी विहीर ।
कुणी हसले
सुटले तिर ।
स्वप्न सरले
मिटली लकीर ।
Sanjay R.

Tuesday, November 26, 2019

" लोकशाहीला जीवच नाही "

ही कशी हो
लोकशाही ।
हसताहेत सारे
दिशा दाही ।
हरले जिंकले
पुढारी काही ।
बहुमत मात्र
कुणालाच नाही ।
खुर्ची साठी
त्राही त्राही ।
सत्ते साठी
स्वप्न पाही ।
कुणी सारतो
शर्टाची बाही ।
बोलतो दुसर्यास
नाही नाही ।
नीतीमत्ता तर
धारा शाई ।
लोक शाहीला
जीवच नाही ।
Sanjay R.

" मनातलं खूप सारं "

मनातलं खुप सारं
मनातच असू द्या ।
गालावर फक्त
हास्य दिसू द्या ।

डोळ्यातली आसवं
डोळ्यातच असू द्या ।
आसवांची फुलं
डोळ्यातून गळू द्या ।

कान किती तीक्ष्ण
सारच त्यांना ऐकू द्या ।
चांगलं ते सोडून
बाकी सारं विसरू द्या ।

मुखी शब्दांचे भंडार
त्यांनाही थोडं हलू द्या ।
जिंकायचे असते मन
शब्द तशेच बोलू द्या ।

आभाळ विचारांच उरी
त्यालाही थोडं धावू द्या ।
गर्जनाऱ्या आभाळातून
बरसात सुखाची होऊ द्या ।
Sanjay R.

" नाही अबला ती तर सबला "

रे माणसा तूच रे बदलला
माणुसकी तर तूच विसरला ।
स्त्री तर होते माता, बहीण कुणाची
अर्धांगिनी ती आपूल्या पतीची ।
भार घराचा तीच उचलते
तिच्या विना रे पान न हलते ।
नाही अबला ती तर सबला
माया ममता ठाऊक तिजला ।
दुर्गा ती अनुसया ती
होते कधी तीच चण्डिका ।
घेऊनि तलवार रणांगणात ती
लढते येता प्रसंग बाका ।
पूजन करते जग सारेची
का विसरला तू माणसा ।
सन्मान हवा थोडा तिजला
मान देऊनी तू बघ जरासा ।
Sanjay R.

Monday, November 25, 2019

" ये तू पुन्हा "

तू ये पुन्हा
पण लावू नको चुना ।
सांगतो तुला
कोण करतो गुन्हा ।
आरोप तुझा रे
आहे हा जुना ।
विचार न थोडं
तू आपल्या मना ।
सांगतो तुला
पुन्हा पुन्हा
आमच्या रे विना
होशील तू सुना ।
वळून बघ जरा
वाट बघतो पुन्हा ।
Sanjay R.

Saturday, November 23, 2019

" राजकारण म्हणजे गोंधळ "

राजकारण म्हणजे गोंधळ
सत्तेसाठी चाले पळापळ ।
कुणी लावी फसवायला गळ
तर कुणी वाजवी नुसते टाळ ।
स्थान कुणाचे सत्तेत अढळ
धुवायचे हात वाहतोय नळ ।
Sanjay R.

Friday, November 22, 2019

" साम्राज्य धुक्याचे "

जिकडे तिकडे
साम्राज्य धुक्याचे ।
दिसत नाही काही
अस्तित्व कुणाचे ।

श्वासाला कळ
डोळ्यात जळजळ ।
थांबतील का ठोके
एकदम हृदयाचे ।

हवेला इथे बंध
पसरला दुर्गंध ।
उपायच नाही
कृत्य हे माणसाचे ।
Sanjay R.

" हस्यकल्लोळ "

हास्य कल्लोळ
भावनांचा घोळ
हसता हसता
डोळे तू चोळ
विचित्रच सारं
म्हणतो सोळ
हसत राहा
पाडू नको झोळ
Sanjay R.

" हस ना जरा "

हो जरा तू आनंदी
मलाही तीच धुंदी ।

सागर दुःखाचा इथे
आहेत सारेच बंदी ।

फिरून बाजार आलो
दिसते फक्त मंदी ।

हलवू नकोस मान
नाहीस रे तू नंदी ।

बदल रे भाव थोडा
आहे हसण्याची संधी ।

सोड दुःखाचा पसारा
होशील मग आनंदी ।
Sanjay R.

Tuesday, November 19, 2019

" सुंदर हे जीवन "

काय कसे हे जीवन
कधी हिरमुसते मन ।
होते दुःखी कधी तर
वेदना देते आलिंगन ।
परी सुंदर आहे जीवन
रागावर करा सय्यम ।
प्रसंगासी व्हा सामोरे
फुलवा आनंदाचा कण ।
जगणे तर नाही सोपे
सुख दुःख हेचि जीवन ।
मृत्यू हा जीवनाचा अंत
मधले सारे आपलेच क्षण ।
Sanjay R.

" दूर दूर "

वाटतच नाही आहेस तू दूर
मन तर नेहमीच असतं आतुर ।
वाटतं आत्ताच तर ऐकला
गोड शब्दांचा तुझ्या सूर ।
Sanjay R.

Sunday, November 17, 2019

" सांगा कसे जगायचे "

आज दिनांक 17 नोव्हेंबर 2019 ला दैनिक तरुण भारत, आसमंत पुरवणीत माझी " सांगा कसे जगायचे " ही कविता प्रकाशित झाली, संपादकांचे खूप खूप आभार .
" सांगा कसे जगायचे "
ताण तणाव किती सारा
सांगा कसे जगायचे ।
नाही सुख कुठेच उरले
सांगा दुःखात कसे हसायचे ।
घरी टेन्शन दारी टेन्शन
टेन्शन मधेच का राहायचे ।
बीपी जडला श्वास अडला
रात्रभर फक्त जागायचे ।
टांगलेला चेहरा घेऊन
कसे दिवसभर फिरायचे ।
तीळ तीळ मनात कुढत
एक दिवस असेच मरायचे ।
सोडा टेन्शन हसा थोडे
म्हणा मना मला जगायचे ।
जे होईल ते होऊ दे
पण हसत हसत मरायचे ।
संजय रोंघे
नागपूर
मोबाईल - 8380074730

Saturday, November 16, 2019

" पक्षी तिथवर उडे "

बघू नकोस मागे
चालले जग पुढे ।
बदलला बघ काळ
क्षणात सारे घडे ।
मन घेई भरारी
नजर नजरेला भिडे ।
निळे आकाश जिथे
पक्षी तिथवर उडे ।
Sanjay R.

" व्हायचं मला लहान "

व्हायचं मला हो
नन्हा मुन्ना ।
हौस नाही फिटली
सांगू मी कुना ।

कट्टी बट्टी
घ्यायची मला अजून
आई चा धपाटा
खायचा मला भिजून ।

बाबांची भीती
किती मला वाटायची
तरीही मस्तीची
लहर फिरून यायची ।

मित्रा मित्रांच्या
गोष्टी असायच्या भारी ।
दंगा आणी मस्तीत
खुशी मिळायची सारी ।

बालदिवसाला पप्पा
घेऊन यायचे मिठाई ।
अजूनही वाटतं
आईने करावे गाई गाई ।

कर ना रे देवा
परत एकदा लहान ।
मनातलं सारं
करून बघिल छान ।
Sanjay R.


Tuesday, November 12, 2019

" आयुष्याचे मोल काय "

आयुष्याचे मोल काय
अजून का हे कळले नाय ।

अधांतरीच स्वप्न सारी
जसे वाळूवरती उभे पाय ।

लाट येताच पाण्याची
कण कण वाळू निघून जाय ।

नाती गोती सरती सारी
नसती सोबत बाप माय ।

स्वाहा होते नश्वर शरीर
राख उरते किंमत काय ।
Sanjay R.

Monday, November 11, 2019

" फिफ्टी फिफ्टी "

फिफ्टी फिफ्टी ने
केला मोठा लोचा ।
सुचत नाही काही
बंद झाली वाचा ।

लोकशाहीत अशाच
आहेत खूप खाचा ।
बहूमता शिवाय हो
कच्चा सारा ढाचा ।

मी मी चा पाढा मोठा
चालत नाही कुणाचा ।
घ्या बेलणं हाती आणि
खूप तुम्ही हो नाचा ।
Sanjay R.

Saturday, November 9, 2019

" मार्ग भक्तीचा "

काय आमची शान
मनी लागते ध्यान ।
नाम स्मरण विठ्ठलाचे
विसरती मग भान ।
गेले सांगून सारेच
संत महंत महान ।
नाही मोठा इथे कोणी
ठेव मजसी लहान ।
सोड करुनि शिक्षित
दे अपार मजला ज्ञान ।
शुद्ध आचरणाचा पाठ
तोचि देईल मजसी मान ।
माऊलीचा भक्त मी
गातो प्रभूंचे गान ।
Sanjay R.