मनातलं खुप सारं
मनातच असू द्या ।
गालावर फक्त
हास्य दिसू द्या ।
डोळ्यातली आसवं
डोळ्यातच असू द्या ।
आसवांची फुलं
डोळ्यातून गळू द्या ।
कान किती तीक्ष्ण
सारच त्यांना ऐकू द्या ।
चांगलं ते सोडून
बाकी सारं विसरू द्या ।
मुखी शब्दांचे भंडार
त्यांनाही थोडं हलू द्या ।
जिंकायचे असते मन
शब्द तशेच बोलू द्या ।
आभाळ विचारांच उरी
त्यालाही थोडं धावू द्या ।
गर्जनाऱ्या आभाळातून
बरसात सुखाची होऊ द्या ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment