होतात इथे कुणाच्या
पूर्ण इच्छा सर्व ।
काय नको मनाला
हवे दिसेल ते सर्व ।
इच्छा तर असंख्य
काहीच होतात पूर्ण ।
म्हणू नका त्यासी
सारेच ते अपूर्ण ।
हवे थोडे भान
मनाला समाधान ।
मिरवता येते मग
वाटते त्यातच शान ।
Sanjay R.
होतात इथे कुणाच्या
पूर्ण इच्छा सर्व ।
काय नको मनाला
हवे दिसेल ते सर्व ।
इच्छा तर असंख्य
काहीच होतात पूर्ण ।
म्हणू नका त्यासी
सारेच ते अपूर्ण ।
हवे थोडे भान
मनाला समाधान ।
मिरवता येते मग
वाटते त्यातच शान ।
Sanjay R.
जायचे पुढेच पुढे
नाही साथ कुणाची ।
क्षितिजा च्या पलीकडे
जाते वाट ही आयुष्याची ।
दगड धोंडे मढेच येती
पार करायच्या अडचणी ।
झेलायचे घाव सारेच
जखमा होतील क्षणोक्षणी ।
माघारीचा नाही रस्ता
फक्त पुढे चालायचे ।
एक दिवस होईल संध्या
तोवर आपण जगायचे ।
Sanjay R.
एकट्याचीच ही यात्रा
कोण असतो सोबतीला ।
जन्मदाती ती आई
पुरते कुठे जन्मला ।
जन्मभर मग चाले फेरा
सह प्रवासी भेटे वाटेला ।
जुना सुटतो नवा जुळतो
थांम्बतो कोण जीवनाला ।
नाती गोती सारी मिथ्या
असतो कोण शेवटाला ।
चार जण देतात सोडून
जातो एकटाच अंताला ।
Sanjay R.
एकट्याने कुठे जायचे
कामानिमित्त निघायचे ।
काम सम्पताच मग
टाईमपास भटकायचे ।
ठरले नसते काहीच
रस्ता नेईल तिकडे जायचे ।
पाय थकले की थांबायचे
करून थोडा पोटोबा
परत मग निघायचे ।
भटकण्यात जातो वेळ
अनुभव गाठी बांधायचे ।
Sanjay R.
दुःख बघायला जरा
गरीबा घरी जावे ।
दुखातही हसतो तो
त्याच्या संसारास बघावे ।
दुःखाचे घेऊन ओझे
जगतो रोजचा दिवस ।
घरात नसतो दाना
करेल कशाचा नवस ।
कुणी असतो आजारी
सदा असतो कर्जबाजारी ।
औषध डॉक्टर कुठे
नसतो मदतीला शेजारी ।
रोज तिथे उपवास
संथ चालतात श्वास ।
चार भाग होतात
असेल जर एक घास ।
अंगात फाटक्या चिंध्या
त्यावर निघतो आज ।
तेच तर उरले आता
बाळगू कुणाची लाज ।
डोक्यावर कुठले छत
येतो ऊन पाऊस वारा ।
ठिगळ लावून सरले
उरला फटका पसारा ।
Sanjay R.
मनातले दुःख
मनातच असू दे ।
चेहऱ्यावर मात्र
मला तू हसू दे ।
दुःखाला असते
कुणाची साथ ।
पाठीवर नाही
कुणाचा हात ।
आसवांची काय
किंमत इथे ।
डोळ्यातच असे दे
जिथले तिथे ।
फाटले हृदय तरी
हुंदका नको गळ्यात ।
निर्विकार असू दे
मज चार चौघात ।
माझे मीच झेलील
दुःख असू दे किती ।
वेदना आतली
झाली आता रीती ।
Sanjay R.
हसतो मी सदा
दुःख जरी मागे ।
बंद डोळयांत अश्रू
डोळे उघडे जागे ।
देतो कोण हो साथ
नाही मदतीची आशा ।
कुणास काय तुमचे
देतील फक्त निराशा ।
भोग भोगेले कोण
दोष हा नशिबाचा ।
सहन करतो सारे
प्रहार तो प्रारब्धाचा ।
लपलेले दुःख सारे
कुणास हवा पुरावा ।
फक्त जाणतो देवच
करतो त्याचाच धावा ।
Sanjay R.
जीवनात नशीबाचा जोर
कुणी गरीब कुणी थोर ।
जिद्द चिकाटी हवी थोडी
मेहनतीची ही हवी जोड ।
प्रयत्नाची ही हवी साथ
कष्टाची तर नाहीच तोड ।
नको मग चिंता कशाची
फळ मिळते गोड गोड ।
यशाचाही गर्व नकोच
लावू नका कशाशी होड ।
Sanjay R.
काय कसला व्यवसाय
वाटतो जसा अन्याय ।
जेव्हा तेव्हा पकडा
ग्राहकांचेच हो पाय ।
लोकांना पटवणे कठीण
खरेखोटे सांगा काय काय ।
चालतो दिवसभर सदा
हा नेहमीचाच व्यवसाय ।
उरतात चार पैसे तेव्हा
प्रश्न पोटाचा हाच हाय ।
Sanjay R.
कामाची कशाला लाज
डोक्यावरती चढतो साज ।
स्वकष्टाला किंमत फार
उद्या करायचे ते करा आज ।
कर्म हाच तर धर्म आहे
मनास वाटतो त्याचाच नाज ।
Sanjay R.
मानतो मी आभार
केला चुकीचा स्वीकार ।
स्वप्न नव्हते माझे
झाले तरी साकार ।
ठरवलेच कुठे काही
नव्हता कशाला आकार ।
कळेचना काय हे
कुठला हा प्रकार ।
गुंतलो विचारात जर
सारे झालेची बेकार ।
चुकीला माफी नाही
मानतो मी आभार ।
Sanjay R.
भरून आकाश ढगांनी
सूर्य वेढला त्यात ।
दिसेना आहे कुठे तो
दिली सावलीने साथ ।
वारा थोडासा गार
नाही पावसाची धार ।
वाहे इकडून तिकडे
होऊन झाडावरती स्वार ।
मधेच जातो डोकावून
रवी राज त्या नभातून ।
सायंकाळ होत आली
हसेल चांदणी गालातून ।
मैफलीत नसेल चन्द्र
अमावसेचा दिवस आज ।
होईल उदास मग चांदणी
देईल रात्रीला तिचा साज ।
Sanjay R.
नको ते घडले
झाली मोठी चूक
जीव धडधडतो
होते धुक धुक ।
कसे कुणास ठाऊक
कसे काय घडले ।
रस्ताच चुकलो नि
काम सारे अडले ।
प्रत फिरायचे आता
तेही हाती न उरले ।
जीवनाच्या शेवटाला
दिवसच किती उरले ।
राहिले अजून बाकी
खूप होते करायचे ।
जगू द्या अजून जरा
नाही आत्ताच मरायचे ।
पाहता पाहता गेले दिवस
काहीच न कळले ।
मनातले विचार सारे
मनातच हो जाळले ।
Sanjay R.
चला काढू या
विशेष शस्त्र ।
अंतिम क्षणाला
तेच तर अस्त्र ।
नसतो इलाज
शेवटचा पर्याय ।
यश अपयश
कशाचे काय ।
होताच संघर्ष
काय परिणाम ।
डोळ्यात अश्रू
नाही विश्राम ।
Sanjay R.
आली हो आता
जागतिक मंदी ।
हळूच येईल
कशा वर बंदी ।
उठा उठा आता
सोडा ही धुंदी ।
मान नका हलवू
होऊ नका नंदी ।
वाढेल महागाई
बंद मग चंदी ।
आली आता हो
जागतिक मंदी ।
Sanjay R.
शास्त्रांचे किती प्रकार
देते शक्ती होतो प्रहार ।
शस्त्रा विना विजय नाही
पराजयाच्या दिशा दाही ।
तोंडाने पण होते काम
बाण शब्दांचे काढते घाम ।
विध्वंसाला देई शस्त्र साथ
घडतो तिथे मग रक्तपात ।
लढाईचे परिणाम काय
अनाथांची लागते हाय ।
Sanjay R.
शब्दाइतकी कशात शक्ती
वेगळी प्रवृत्ती जितक्या व्यक्ती ।
असे कोणी असा धार्मिक
चाले त्याची सदा भक्ती ।
कुणास असे इतकी चिंता
हवी त्याला नुसती मुक्ती ।
जीवनाचा हा मार्गच कठीण
पैशाची आहे इथे आसक्ती ।
करू नका हो छळ कुणाचा
पडेल उघडी सारी युक्ती ।
Sanjay R.
हॉस्टेल म्हणजे घर नव्हे
चालते नुसती दंगा मस्ती ।
अभ्यासाचे ढोंग सारे
पोरा पोरांचीच तिथे वस्ती ।
Sanjay R.
हॉस्टेल चे जीवन कसे
वाटे कसे ते स्वच्छंद ।
पण बंधने तिथे फार
नसतो कुठलाच आनंद ।
जेवणाचे होतात हाल
वाटते खावे याहून कंद ।
द्यावे सोडून सारेच नि
टाकावे तोडून सारे बंध ।
Sanjay R.
स्वप्न बघितले काल
लागली मला लॉटरी ।
काय करावे सुचेना
म्हटलं टाकावी फॅक्टरी ।
कारखान्याचा मालक मी
कामगारांनी वेढले ।
सुचेना मला काहीच
स्वप्न ते मी सोडले ।
थाटामाटात गेलो मी
मोठ्या एका मॉल मध्ये ।
भरपूर केली खरेदी
पैसेच नव्हते खिशा मध्ये ।
Sanjay R.
नशिबात नाही जोर
लॉटरी कशी लागेल ।
कष्टविना मिळेना काही
मेहनतीनेच नशीब जागेल ।
सहज मिळाले आयते तर
त्यास असतो एक धोका ।
किंमत नसते मग कशाची
घडतात आयुष्यभर चुका ।
कष्टविना सुख नाही
त्यातच मन होते प्रसन्न ।
आत्मचिंतन करून बघा
वाटेल तुमचे तुम्हास धन्य ।
Sanjay R.
क्षणात इथे तर
क्षणात असते तिथे ।
गगनात घेते भरारी
पोचते हवे तिथे ।
मधेच येते फिरून
नसेल कोणी कुठे ।
नाही अंत कशाचा
पचते मन तिथे ।
Sanjay R .
मनाचे रंग किती
आहे किती गती ।
भ्रमण चाले सारे
नाही कुणाच्या हाती ।
अनंत त्याचे रूप
सखा तो सोबती ।
क्षणात देई सुख
पेटवी दुःखाच्या वाती ।
अभंगाचे होता भंग
दुरावते नाती गोती ।
Sanjay R.
दणका दिल्याशिवाय
सांगा एकतं कोण ।
रोज रोज आपणच बोला
त्यांच्याकडे नसतो क्षण ।
एक घाव दोन तुकडे
असंच मग तुटतं मन ।
आकांत तांडव होईल आता
गाजेल मग सम्पूर्ण रण ।
Sanjay R.
बघताच तुला
मन भटकलं ।
नजरेत तुझ्या
मला बघितलं ।
विचारांच भूत
डोक्यात शिरलं ।
विचार तुझेच
मनही हरलं ।
प्रेमाची ती आस
तुझेच आभास ।
विसरलो कसा
माझाच मी श्वास ।
ओढ आता तुझी
शोधतो तुलाच ।
हरवली कुठे
छळते स्वप्नात ।
बघू किती वाट
छळू नको अशी ।
जाऊ चल दूर
देईल मी खुशी ।
Sanjay R.
सांगू मी कोण काय
जीवन एक अध्याय
जन्म होताच म्हणतात
पाळण्यात दिसतात पाय ।
एकेक परत जाते निघत
जीवन दुधावरची साय ।
बाल्य तारुण्य गृहस्थ वृद्ध
जीवनात मिळते एकच माय ।
खेळ अभ्यास सरते जेव्हा
पैशासाठी कष्ट हाय हाय ।
वृद्धत्व तर कठीण फार
दिवस रात्र मोजण्यात जाय ।
नकळत मग येतो दिवस
तोवर सारेच करा ट्राय ।
Sanjay R.
कसे कसे ते दिवस
कशातच नव्हता रस ।
एकाकी होते जीवन
मन असायचे नर्व्हस ।
गाठभेट कुठे कुणाशी
भीतीचा होता आभास ।
सहन नव्हते होत काही
मोजायचे नुसते श्वास ।
सुन्न व्हायचे डोके
कशावर नव्हता विश्वास ।
कढाच वाटायचे अमृत
अडकायचे तोंडात घास ।
नको परत ते तसे दिवस
जगण्यात होता कुठे रस ।
हसतो खेळतो आता सारे
गुलाबाने फुलाला परस ।
Sanjay R....
परत नको त्या आठवणी
नकोच परत ते तसे दिवस ।
माणसांची दिसली बहु रूपे
दुखाचाच होता तो प्रवास ।
घरात होते बंद सारेच
माणसाला माणसाचा ध्यास ।
शिकलो सारेच आम्ही
दुःखात सुखाचा होता प्रयास ।
Sanjay R....
वाटे थोडा गार गार
वाहतो कसा वारा ।
दर्शन नाही सूर्याचे
पडला त्याचा पारा ।
झाकले आभाळ सारे
उठे कळ्या ढगांचा नारा ।
गगनात चमचमते वीज
गडगडाट देतो इशारा ।
झमाझम पडतो पाऊस
ओंजळीत मावेना धारा ।
Sanjay R.
कठीण होता तो
कोरोना काळ ।
जणू फाटले होते
वरती आभाळ ।
उठवसे वाटेना
झाली जरी सकाळ ।
सतत जीवाचा होता
नुसताच छळ ।
खिडीतूनच हो
बघायचो आभाळ ।
वाटायचं रोजच जणू
पडते का गळ्यात माळ ।
मीच बघायचो मला
दिसताच दूर जाळ ।
परतलो सुखरूप
शिजली आपली डाळ ।
म्हणतात लॉकडाऊनने
बरेच जन्मले बाळ ।
पण कठीणच होता हो
कोरोनाचा काळ ।
Sanjay R.
होती एक राणी
नाव तिचे चांदणी
राजा होता चन्द्र
त्याची ती दिवाणी ।
अवकाश तिचे साम्राज्य
सोबतीला मंगळ शुक्र शनी ।
रडायची ती ढगाआडून
पृथ्वीवर पाणी पाणी ।
अंधारात ती महाराणी
उजेडाला नसे कोणी ।
Sanjay R......
संसार हा माझा
मी राजा ती राणी ।
सुख आणि आनंदाची
आहे ही कहाणी ।
साम्राज्य जरी माझे
करते तीच पहाणी ।
नजर करील कोण वाकडी
फिरेल त्याच्यावर पाणी ।
प्रत्येकाच्या संसारात
राणीच असते ज्ञानी ।
म्हणून घरोघरी चालते
गॉड मधुर गाणी ।
Sanjay R....
इंग्लंडची ती महाराणी
जगभरात तिचे साम्राज्य ।
एक शतकाचे तिचे वर्चस्व
एकाच क्षणात सरले ।
इतिहास झाली ती आता
बघा जीवनापुढे हरली ।
भारताचा कोहिनुर मुकुटात
आयष्यभर तिने मिरवला ।
घेऊन गेली काय सोबत
हक्क भारतीयांचा हिरावला ।
Sanjay R.
धडधड कोसळतो पाऊस
जिकडे तिकडे थैमान पुराचे ।
घराघरात पोचले पाणी
हाल किती हो जगण्याचे ।
होते नव्हते सारेच बुडाले
करू काय आता शेताचे ।
करू कसा मी संघर्ष आता
दिसते स्वप्नही फक्त मरणाचे ।
Sanjay R....
आकाशाला कुठे अंत
क्षितीज ही कती अनंत ।
दाटते आभाळ काळे
वारा सोबतीला संथ ।
बरसतात पाऊस धारा
धारा मात्र असते शांत ।
मिलनाचे ते क्षण कसे
कोण कुठे असे निवांत ।
Sanjay R....
तेव्हा कधी तरी एकदा
वारा अगदीच होता शांत ।
तू आणि मी दोघेच तेव्हा
बसलो असेल निवांत ।
त्यादिवशीचा तो आपला
असेल पहिलाच एकांत ।
बोलायला नव्हते सुचत
शब्दही झाले होते संथ ।
सहजच मग बोलून गेलो
कशाला बघतेस तू अंत ।
बोल मनातलं तुझ्या काही
बाळगू नकोस तू खंत ।
बोलणे तूच सुरू केलेस
बाकी अजूनही ते अनंत ।
तेच शब्दांचे होते मिलन
संपूच नये आता अंता पर्यंत ।
Sanjay R....
पावसाने केला गोंधळ
थांबायलाच नव्हता तयार ।
जिकडे तिकडे पाणी पाणी
पडत होती नुसती धार ।
थकून गेलो घरात बसून
कंटाळा हो आला फार ।
रविवार पूर्ण गेला वाया
मनात राहिले मनातले विचार ।
Sanjay R....