Friday, January 31, 2020

" झाला गाव सुना कवितेचे प्रकाशन "

माझे व्यासपीठ मासिक मुंबई फेब्रुवारी 2020 अंकात माझ्या " झाला गाव सुना " या कवितेचा समावेश करण्यात आला. संपादकांचे खूप खूप आभार .

" सांगा कोणी निरोप माझा "

स्वप्न नकळत येतात
देऊन आनंद जातात ।
कुणी सांगा निरोप माझा
ठेऊ किती मी मनात ।

सागर विचारांचा भरला
मावेना आता अंतरात ।
मन करून आज मोकळे
विहरायचे मज अनंतात ।

प्रतीक्षा वाटे नको आता
घे सामावून मज तुझ्यात ।
दिसणार नाही तुला रे
थेंब आसवांचा डोळ्यात ।
Sanjay R.

Thursday, January 30, 2020

" बघू किती मी वाट "

नशीबातच माझ्या आहे
फक्त वाट पाहणं ।
ताटकळत बसायचं
उघडून डोळ्याचं पापनं ।

मनात वादळ विचारांचं
लागते श्वासांना धाप ।
कधी कधी तर होतो
अंतरात थरकाप ।

नको वाटतं आता
वाट कुणाची बघणं ।
स्वछंद कसं असत
बघावं ते जगणं ।
Sanjay R.

" कसे व्हायचे महान "

व्हायचे असेल महान
करून घ्यायचा सन्मान ।
योग्यता असो नसो
बस ठेवायचे स्वतःचे ध्यान ।

मी मोठा मी मोठा करत
मिळवायचा आपलाच मान ।
ओळखतात लोकं सारे
हे मिरवणुकीतलं निशान ।

स्वतःच्या स्वार्थापाई
होतो कसा तो बेभान ।
बुद्धी शुद्धी नसतेच त्याला
मिरवतो सारे ठेऊन गहाण ।

हिरा खरा दूरच असतो
असतो त्याला आत्मसम्मान ।
अंधारातही चमचमतो हिरा
त्याची तर अलगच शान ।
Sanjay R.

Wednesday, January 29, 2020

" मी प्रतिलिपिवर "


बघा जरा....

" जाऊ भूत पाहाले "

लय झालं जेवण
मुन टाकलं आंग ।
दोस्त आले सपनात
म्हने जाचं कुठं सांग ।

इचार केला थोडा
मनलं जाऊ भूत पाहाले ।
भेता का लेकहो
झाले आडदांड काहाले ।

झाले मंग सरळ
म्हने जाऊ भुताच्या घरी ।
घेऊ शोध जरासा
गोष्ट हाये का खरी ।

गेलो मंग सारेच
हाये तिकडं दरी ।
संग वंग होते सारे
पन भेव वाटे तरी ।

जवा पोचलो तेथ
अंधार लय भारी ।
पांढरे कपडे घालून
होती नाचत परी ।

झुंन झुंन तिचे चाळ वाजे
मनलं गोठ हाये खरी ।
बायको हालवे जोरात
पायतो त मी घरी ।
Sanjay R.

" विखुरले मणी "

तुटला धागा
विखुरले मणी
वेचू कसे मी
सांगा ना कोणी ।

धो धो पाऊस
पडतंय पाणी ।
सुचतात कशी
पावसाची गाणी ।

फुलते अंगणात
रात राणी ।
दरवळतो गन्ध
रात्र दिवाणी ।

निशब्द झाली
मुखातली वाणी ।
ऐकायची आता
विरहाची गाणी ।
Sanjay R.

" अभ्यासाचा भार "

लहानश्या वयात
अभ्यासाचा डोंगर ।
पुस्तकांचे ओझे
शाळा कॉलेजचा नांगर ।

लेखन वाचन घोकमपट्टी
शिक्षकांचा मार ।
आई बाबांची कटकट
होम वर्क चा भार ।

रोजच असते परीक्षा
लिहा अभ्यासाचा सार ।
25 वर्षे अशीच जातात
जीवन तार तार ।

मिळते शेवटी डिग्री
मानायचे कुणाचे आभार ।
नोकरीसाठी मग
फिरायांचे दारोदार ।

जीवनच सरते सारे
नाही कशाचाच आधार ।
जिवंतपनी मरणाचे
झेलायचे नुसते वार ।
Sanjay R.

" कोरोना व्हायरस "

चीन मध्ये झाला लोचा
पसरला सगळीकडे कोरोना व्हायरस....

माणसांवर आली मोठी आफत
वाचायचे कसे यातून उत्तर सांगा बस....

गंभीर हा आजार किती
डॉक्टर सारे मिळून शोधताहेत लस.....

हवेच्या वेगाने पसरतोय आजार
मरणाऱ्यांची संख्या वाढतेय छातीत होते धस्स....
Sanjay R.

" प्रेमकथा "

तुझ्या माझ्या प्रेमाची
आहे ही एक कथा ।
वाटे जशी आहे त्या
लैला मजनूची गाथा ।
झेलले वार किती
अंतरात साऱ्या व्यथा ।
नाही सरले प्रेम परी
झुकतो तयापुढे माथा ।
Sanjay R.

" कल्पनेतले विश्व "

आला जमाना इंटरनेटचा
कल्पनेतल्या विश्वाचा ।
गाठ भेट होते आता
स्पर्श हवा मोबाईलचा ।

दूर कितीही असाल तुम्ही
वेळ हवा फक्त क्षणाचा ।
न बघताही होते मैत्री
मित्र किती तो गुणाचा ।

मनात येता विचार कुठला
इतिहास दिसतो जगाचा ।
हवे नको ते सारेच मिळते
आधार झाला जनाचा ।

धोकेही यात आहे अपार
फळतो धंदा फसव्यानचा ।
विवेक बुद्धीचा करून वापर
आनंद उचला जीवनाचा ।
Sanjay R.

Wednesday, January 22, 2020

" ये ग चिऊ, ये रे काऊ "

ये ग चिऊ ये रे काऊ
या ना थोडे सोबत गाऊ ।
झाड पडले जंगल सरले
प्रश्न तुमचा आता कुठे राहू ।

गेलात सोडून सारे तूम्ही
सांगा तुम्हास कुठे पाहू ।
बालपणातले सोबती तुम्ही
शोध तुमचा कुठे घेऊ ।

लावले अंगणात झाड मी
तिथेच आता आपण राहू ।
सांगतो मी तुम्हास आता
नका नका रे कुठेच जाऊ ।

चला आता घरी जाऊ ।।
Sanjay R.

" मोह माया "

कधीतरी होईल बरे
विचारात जगतो या ।
झर झर जातात दिवस
भविष्याची मोह माया ।

उलगडता भूत काळ
वाटे दिवस गेले वाया ।
पण असतो तोच मजबूत
आज आणि उद्याचा पाया ।

चिंता किती भविष्याची
सारतो दूर सुखाची छाया ।
नकळत मग संपते सारे
कुठे उरते मग मागे काया ।
Sanjay R.

" काय माणसाची गती "

माणसाचे हो वर्ग किती
न कळणारी ही रीती ।

पैश्यानी तोलायचे
एवढंच आपल्या हाती ।

उच्च आणि मध्यम बघा
समावल्या यात किती जाती ।

खलच्याला हो वरच्यांची
नेहमीच असते भीती ।

मिटत आहेत आता
जुन्या जाती आणि पाती ।

नवीन वर्ग होतोय बघा
त्यात गरिबी आणि श्रीमंती ।

मरतो माणूस गरिबीने
श्रीमंतांना माज अती ।

वाटोळं होईल सारच आता
काय ही माणसाची गती ।
Sanjay R.

" ऊब प्रेमाची "

पावसाचे झाले आता
थंडीचा कहर ।
सगळं अंग हलते
होते कशी थर थर ।
सायंकाळी बघा
रिकामेच दिसते शहर ।
प्रेमाची ऊब देणारं
भरलेलं असते घर ।
Sanjay R.

Monday, January 20, 2020

" नाही मी कुणी देव "

देवांचा देव महादेव
नाही मी कुणी देव ।
मी तर साधा माणूस
मला दुराचाराचे भेव ।
विचारांपासून देवा अशा
दूरच मला रे ठेव ।
सद्विवेक सदाचारी जो
आहे तोच माझा देव ।
सुखी समाधानी आनंदी
सगळ्यांना देवा तू ठेव ।
Sanjay R.

" वाद संवाद "

तू तिथे दूर, मी इथे
मग येते मला याद ।
चिव चिव करत चिमणी
पोचवते तुझी साद ।

शब्दांचा शब्दांशी
होतो जेव्हा वाद ।
शब्द अंतरातले मग
करून जातात संवाद ।
Sanjay R.

Thursday, January 16, 2020

" संवाद "

असेल संवाद तर
येते आठवण ।
मनात भावनांची
होते साठवण ।
गुंतत जातं मग
विचारी मन ।
बंधनाच्या परिघात
अधीर होतो क्षण ।
Sanjay R.

Wednesday, January 15, 2020

" संक्रांतीच्या शुभेच्छा "

तिळगुळाची ना
चवच किती न्यारी ।
गोड बोलणं का
इतकं भारी ।
शब्दच शब्दांना
जपतात ना जरी ।
अंतरात विचारांना
जपा थोडं तरी ।
शब्दांनिच जुळतात
नाती किती तरी ।
आनंदी जिवनाचा
मंत्र ओठांच्या दारी ।
Sanjay R.

Tuesday, January 14, 2020

" हळदी कुंकू "

आली संक्रांत
तीळ गूळ घ्या ।
नसेल बोलायचे तर
तीळ साखर द्या ।

शेंगा बोराचं
वाण मोठं भारी ।
स्त्रिया मिरवायला
जातात शेजारी ।

चिंगी आज खुश
होणार तिची लूट ।
वातावरणात गारवा
पप्पाना हवी सूट ।

संक्रांत आली
घेऊन आनंदी रंग ।
बंटी ही आपला
पतंग उडवण्यात दंग ।
Sanjay R.

Monday, January 13, 2020

" आंबट गोड बोरं ".

गोड आंबट बोरं
वेचत होती पोरं ।

बालपण आठवलं
आलं डोळ्यापुढे सारं ।

घुसून कुणाच्या शेतात
तोडायचे पेरू आणि बोरं ।

कळलंच कुणाला तर
तयार खायला मार ।

मजा यायची खूप
सम्पलं आता सारं ।
Sanjay R.

Sunday, January 12, 2020

" अजून जगायचं मला "

तू बोलूच नको
मला आता बोलायचं आहे ।
तू बघूही नको
मला पण बघायचं आहे ।

काय करू काय नको
सगळंच तर करायचं आहे ।
वेळ नाही आता
अजून थोडं हसायचं आहे ।

लहानाचा झालो मोठा
मोठं अजून व्हायचं आहे ।
तो तिथं दारात उभा
खरंच का मरायचं आहे ।

नको नको थांब थोडा
जाऊन पुढे यायचं आहे ।
असलास तू मृत्यू जरी
थोडं मला जगायचं आहे ।
Sanjay R.

Saturday, January 11, 2020

" होशील का तू माणूस "

माणूस म्हणू कसा
तू सांग ना रे जरा ।
नाही तूझ्यात माणूस
म्हणू तुला कसा मी बरा ।

तुझ्यापेक्षा बघ
किडा मकोडा रे बरा ।
मन तुझं खोटं
नाही तू रे खरा ।

असा कसा रे तू
भासतो विद्वान जरा ।
माणुसकीचा नाही रे
गुण तुझ्यात खरा ।

हलते ते झाड
जेव्हा वाहतो वारा ।
मुळ देते मग आधार
भार सोसतात सारा ।

मूळ तुझे रे अधर
करतो तूच मारा ।
उद्धवस्त करून सोडतो
तू आपलाच पसारा ।

नको म्हणू तू माणूस
तू नाहीस रे बरा ।
कर विचार थोडा
होशील का तू माणूस जरा ।
Sanjay R.

Friday, January 10, 2020

" का दिली आम्हास खादी "

बापू तुम्ही आम्हास तेव्हा
का दिली हो ही अशी खादी ।
आम्हाला तर हवी
फक्त आणि फक्त आजादी ।।

नेते आमचे बघा कसे
चिकटले आहेत घेऊन गादी ।
भारताची तुमच्या बघा
झाली कशी हो बरबादी ।।

नाव तुमचे घेऊन कसे
मिरवतात हे मानवता वादी ।
म्हणतात सारे आम्ही
आहोत असेच सत्यवादी ।।

शुभ्र कपड्या आड बघा
आहेत कसे हे दहशतवादी ।
देश नको, लोक नको
कुठले हो हे समाजवादी ।।
Sanjay R.

" भ्रष्टाचार "

नाही ज्याला आचार
मनात क्षुद्र विचार ।

अंतरात होतो प्रचार
असतो खिसा लाचार ।

पसरतो पुढे हात चार
करून किती अत्याचार ।

सळसळतो भ्रष्टाचार
हा माणुसकीचा दुराचार ।

भरला सगळाच बाजार
साऱ्यास झाला आजार ।

नाही उरला उपचार
फक्त झेलायचे प्रहार ।
Sanjay R.

" हवे स्वातंत्र्य "

जिकडे तिकडे आवाज
हवे म्हणतात स्वातंत्र्य ।

शोधतो मी इथे आता
कोण भोगतो पारतंत्र्य ।

गांधी नेहरूंनी दिलं ते
नव्हतं का हो स्वातंत्र्य ।

आहुती दिली प्राणाची
होतं का निष्फळ सारं ।

परतून लावले परकीय
उघडून स्वातंत्र्याचे दार ।

घुमतात नारे अजूनही
कुठून आलं हे वारं ।

खरे खोटे कळले नाही
झाले जीवन एक भार ।
Sanjay R.

" लेकरू गुणाचे "

आई इतकं प्रेम
नसतं कुणाचं ।
लेकरू आवडतं
असतं बापाचं ।

कष्ट आई बापाचे
लाड होतात पोराचे ।
सर्वस्व लावतात
लेकरू किती गुणाचे ।

मोठं होत लेकरू
आई बाप म्हातारे ।
आधारच तुटतो
लेकराला काय त्याचे रे ।

एकाकी होतं जीवन
सोबत नसते कुणाची ।
वृद्धाश्रम असा जिथे
माणसं मोठ्या मनाची ।
Sanjay R.

" वर्हाडी साहित्य सम्मेलन 2020 "

संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे सम्पन्न झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय वर्हाडी साहित्य संमेलनात माझा सहभाग .
दिनांक 04.01.2020.



" विदर्भाची माती "

अशीच आहे
माझ्या विदर्भाची माती ।
फुलतात इथे
नाती आणि गोती ।
वाटेल तुम्हाला
वेगळी इथली रीती ।
पण ओलावा त्यात
बघा आहे किती ।
Sanjay R.

Friday, January 3, 2020

" अकाली पाऊस "

पावसाने अजून हो
सोडला नाही पिच्छा ।
घे म्हणा पूर्ण करून
उरल्या सुरल्या इच्छा ।

यंदा तर पावसाने
पीक गेले वाया ।
सांगा आता तुम्ही
पडू कुणाच्या पाया ।

नशीबच हे असं
काय आता करावं ।
शेती माती सोडून का
दुसरं काम धराव ।
Sanjay R.

" स्वीकार शुभेच्छांचा "

नको रंग नको गंध
तुझ्या या पुष्पगुच्छला ।
स्वीकारतो अंतरातून
तुझ्या या शुभेच्छेला ।
Sanjay R.

Thursday, January 2, 2020

" रे बळीराजा कवितेचे प्रकाशन "

माझे व्यासपीठ मासिक मुंबई जानेवारी 2020 अंकात माझ्या " रे बळीराजा " या कवितेचा समावेश करण्यात आला. संपादकांचे खूप खूप आभार .

" वर्ष वीस वीस"

जुने गेले आणी नवे आले
वर्षा मागून किती वर्ष झाले ।
नववर्षाची तर रात्रच न्यारी
नाचून काढली करून तयारी ।
लहान थोरांना पण खुशी मोठी
सारेच जमले नाचाय साठी ।
बारा वाजता ओरडले हॅपी ।
कुणी कुणाचा घेतला पपी ।
झिंगले किती पडले किती
ती पण दिसली वेगळीच रीती ।
जुन्या वर्षाच्या आठवणी मनात
भरायचा उत्साह नवीन वर्षात ।
राहिलं सुटलं सारं करायचं
आनंदात अगदी मस्त जगायचं ।
Sanjay R.

" आली थंडी "

पहिला यंदा पावसाचा हिसका
आली थंडी थोडे सरका ।

पेटवा ना शेकोटी अहो काका
प्रसंग आहे मोठाच बाका ।

नका विचारू चहा घेता का
थर थर कापतोय वाटतो धोका ।
Sanjay R.