आला जमाना इंटरनेटचा
कल्पनेतल्या विश्वाचा ।
गाठ भेट होते आता
स्पर्श हवा मोबाईलचा ।
दूर कितीही असाल तुम्ही
वेळ हवा फक्त क्षणाचा ।
न बघताही होते मैत्री
मित्र किती तो गुणाचा ।
मनात येता विचार कुठला
इतिहास दिसतो जगाचा ।
हवे नको ते सारेच मिळते
आधार झाला जनाचा ।
धोकेही यात आहे अपार
फळतो धंदा फसव्यानचा ।
विवेक बुद्धीचा करून वापर
आनंद उचला जीवनाचा ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment