Friday, May 31, 2019

" तंबाकू चुना '

पाण्यानं थोडं  बाबू
तोंड तू धुना ।
देना सोडून आता
तंबाकू चुना ।
सवयच बेकार
नाही तुझा गुन्हा ।
कॅन्सर नि गेला तं
दिसशील का पुन्हा ।
सोडून दे आता
तंबाखू चुना ।
Sanjay R.

" जिंदगी हो तुम "

याद जब तुम आती हो
कितना मुझे सताती हो ।
आहट जब सूनता दिल
तबही निकल जाती हो ।

दिलमे है ख्वाब बहोत
निंदसे क्यू जगाती हो ।
जी लेती एक ख्वाब कभी
क्यू युही मुस्कुराती हो ।

बित गई अब कितनी राते
रोज एक चिराग जलाती हो ।
जिंदगी हो तुम मेरी
कभी हसाती कभी रुलाती हो ।
Sanjay R.

Thursday, May 30, 2019

" काजळ "

बघून डोळ्यातलं
तुझ्या काजळ ।
का होते मनात
माझ्या सळसळ ।
थांबते मग नजर
भावनांची जळजळ ।
हरवतात शब्द ओठातले
लागे छातीला धडधड ।
गोंधळ होतो श्वासाचा
स्तब्ध होतो क्षणभर ।
Sanjay R.

Wednesday, May 29, 2019

" दो मुझे इंसान "

चाहीये अब इंसान
ना हो वह महान
ना हो भगवान
बस हो थोडा ज्ञान
चलेगा कुछ अज्ञान
पुरा करे कुछ अरमान
और लगे मेरी शान
धुंड रहा हु मैं जहान
दो मुझको वो इंसान
होगा मुझपे एहासान
Sanjay R.

Monday, May 27, 2019

" गुपित "

मनातलं गुपित
कळलंय तुला ।
तरीही का तू
विचारतेस मला ।
गंध का बेधुंद
सांग ना फुला ।
अधीर मन का
घेतंय झुला ।
Sanjay R.

" ओंजळ "

तूच तर आहेस
मनात माझ्या ।
वाटत द्यावं सार
ओंजळीत तुझ्या ।

विचारांचा फुलोरा
कल्पनेतला तारा ।
वाहणारा वारा आणि
पावसाच्या धारा ।

फुलांचा सुगन्ध
दरवळणारा गंध ।
अंतरातला आनंद
होऊ दे बेधुंद ।
Sanjay R.

Saturday, May 25, 2019

" पाणी पाणी करायचं कोणी "

उन्हाळा आला की सगळ्यांच्या पुढे एकच प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे पाणी . भारताच्या बहुतांश भागात पाण्याची खूप मोठी समस्या आहे .
काही भाग तर असेही आहेत कि जिथे वर्षभर पाण्याची समस्या असते . आणि जिथे पाणी आहे त्या भागात पाण्याचे नियोजन नाही, पाण्याचा अपव्यय जास्त आहे . जशे कुणालाच काही देणे घेणे नाही . या विषयाच्या मुळाशी आपण गेलो तर असे लक्षात येईल कि हि पाणी समस्या आपणच आपल्यावर ओढवून घेतलेली आहे.
पाणी समस्येचे पहिले प्रमुख कारण म्हणजे वृक्ष तोड . आपण बघतोच आहोत हळूहळू जंगल नाहीसे होत आहेत आणी ठीक ठिकाणी कारखाने, माणसांच्या वस्त्या झपाट्यानं वाढत आहेत. जंगल कमी होत असल्यानं तिथले पशु पक्षी प्राणी यांची संख्या पण कमी होत आहे. आणि मग त्यांचे अतिक्रमण माणसांच्या वस्त्यांमध्ये होत आहे .पूर्व शेतांमध्ये आंबा चिंच वाद पिंपळ जांभूळ मोह लिंब या मोठमोठया वृक्षांची लोक शेताच्या कडेने जोपासना करत. त्या मुळे शेतात वातावरण थंड राहून पाण्याची पूर्तता व्हायची , पाण्याची पातळी पण जास्त खोल नसायची. परंतु आज सगळे कडे वृक्ष तोड सुरु आहे. शेतकरी शेतातील आणि बांधावरील झाडं तोडून त्यांच्या वाहितीची जागा वाढवत आहेत. शेतातील वृक्षतोडीचे दुसरे कारण म्हणजे शेतातील झाडांवर माकडांचे कळप येऊन वस्ती करायला लागलेत आणि पिकांचं नुकसान करायला लागलेत , म्हणून शेतकरी ही झाडच कापून नष्ट करत आहेत . जंगल कमी झाल्याने तिथल्या प्राण्यांनी त्यांचा मोर्चा गावाकडे वळवला आणि शेतात घुसून आपले पोट भरू लागलेत. हयात प्रामुख्याने रोही, रान डुक्कर, हरीण, नीलगाय मोर, ससे, उंदीर आणि इतर जंगली पशु, पक्षी, प्राणी, आहेत. यामुळे सारे निसर्गाचे चक्रच बदलले दिसत आहे. नद्या, नाले, तळे, डबके सगळेच संपुष्टात आले आहेत. जंगलात पाण्याचे स्रोत सुकून गेलेत, पशु, पक्षी, प्राणी अन्न आणी पाण्याच्या शोधात गाव, शहरापर्यंत येऊन पोहोचलेत. त्यामुळे मानवाच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे.

पाणी समस्येचे दुसरे प्रमुख कारण पृथ्वीच्या तापमानातील वाढ. सूर्य आणि पृथ्वी यांच्या कक्षेतील अंतर हळू हळू कमी होत आहे त्यामुळे पृथ्वीवरील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. याच्या परिणामामुळे पृथ्वी वरील पाण्याचे बाष्पीभव होऊन पाण्याचे साठे प्रभावित होत आहेत. पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. जमिनीतील पाण्याची पातळीही खूप खोल जाऊन पोहोचली. तापमानातील वाढी मुळे लोकांचा कल हवा थंड करणाऱ्या उपकरणाच्या वापराकडे वळला. हि उपकरणे वातावरणात स्वतःची गर्मी सोडत असल्या मुळे वातावरण अजून गरम व्हायला लागले. तसेच लोकसंख्या वाढी मुळे वाहनांची संख्या वाढली. त्या मुळे वातावरण अजूनच गरम होत आहे. आणि वायूचे प्रदूषण जास्त प्रमाणात व्हायला लागले . या सर्व परिणामांमुळे निसर्गाचा असमतोल निर्माण झाला आणी पाण्याची भीषण कमतरता होऊ लागली.

पाणी समस्येचे तिसरे प्रमुख कारण म्हणजे लोकसंख्येची वाढ. जगात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून गाव आणि शहरांच्या सीमा झपाट्याने वाढत चालल्या आहेत, शेती, जंगल आणि वृक्ष कमी होत आहेत. सिमेंट कॉंक्रिट ची घरे, रस्ते मोठ्या प्रमाणात बांधली जात आहेत ज्यामुळे भूतलावरील तापमानात अजून भर पडत आहे. लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्या यासाठी कारखाने आणी उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तिथे पाण्याचा वापर वाढलेला आहे. कारखान्यात लागणाऱ्या सयंत्रांमधून निघणाऱ्या धूर, विषारी गॅसेस, सांडपाणी या मुळे परिसरातील हवा पाणी आणि जमीन प्रभावित होत आहे, प्रदूषित होत. सभोवतालचे तापमान वाढत आहे . या सर्व कारणांमुळे निसर्गाचा असमतोल निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झालं , आणि दुष्काळाचे सावट अधिक गंभीर रूप धारण करायला लागले, विहारी, नद्या, नाले, तळे आटायला लागलेत. उन्हाळ्यात तर सगळे पाण्याचे स्रोत ठण ठण व्हायला लागलेत. जमिनीतील पाण्याची पातळी अति खोलात जाऊन पोहोचली आहे. लोकसंख्या वाढी मुले पाण्याची गरज वाढली आहे. घरोघरी विहिरी, बोअर झालेत आणि जमिनीतील पाण्याचा उपसा वाढला. त्या मुळे जमिनीतील पाण्याची पातळी जास्तच खोल गेली. आणि सर्व सृष्टी वरील जीव जंतू प्राणी वृक्ष यांना पाण्याच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

गावात शहरात आपण बघतोच आहोत पाण्याची किती भीषण समस्या आहे. नद्या नाले विहिरी सुकून गेलेत. जमीन कितीही खोदली तरी पाण्याचा एक थेम्ब सुद्धा हाती लागत नाही. मनुष्य प्राण्यांचे स्थलांतरण होत आहे. निसर्गाच्या असमतोलपणामुळे पाऊस पाडण्याचे प्रमाण काम झाले . उन्हाळ्याचा काळ खंड वाढला आणि पाऊस थंडी चा कमी झाला. हिवाळा पण उन्हळ्यासारखाच भासायला लागला. पावसाळ्यात कुठे पाऊस बिल्कु पडत नाही आणि कुठे पडलाच तर अतिवृष्टीच्या होऊन पुराचे थैमान बघायला मिळते. गर्मी जास्त आणि पाऊस कमी या अश्या निसर्गाच्या असमतोलपणा मुळे माणसाचे जीवन फारच कठीण होऊन गेलेलं आहे. शेती व्यवसाय संपूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्या मुळे शेतामध्ये धान्याचे उत्पादन कमी झालेले आहे. शेतकरी हलाखीचे जीवन जगण्यास बाध्य झाला आहे. अन्न धान्याच्या किमती शिगेला जाऊन पोहोचल्या. भाज्यांच्या किमती नियंत्रणाच्या बाहेर गेल्या. माणसाचे जीवन अगदी खडतर झाले. याचा परिणाम संपूर्ण मनुष्य जातीला भोगावा लागत आहे.

निसर्गाचे चक्र जर असेच सुरु राहिले तर हळू हळू माणूस, प्राणी, पशु , पक्षी यातील काहीच या भूतलावर उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण होत आहे. म्हणूनच म्हणतात पुढचे महायुद्ध जे होई ते पाण्यासाठी लढले जाईल आणि ते भाकीत खरे होईल असे वाटते.

या पाणी समस्यांवर वेळीच उपाय योजना करण्याची फार मोठी गरज निर्माण झालेली आहे. सरकार आपल्या परीने यावर उपाय करण्याचे प्रयत्न करीत आहेच. पण त्याला प्रत्येकाने आपला वाटा उचलण्याची गरज आहे. यासाठी नद्यांची जोडणी, पर्यावरणावर नियंत्रण , वृक्षारोपण, जंगलांचे सवंर्धन, धरण बंधारे यांचे बांधकाम, वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे जमिनीत पुनर्भरण, पाण्याचे नियोजन, पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर , वाहनांचा कमीत कमी वापर, उद्योग कारखाने यात सोलर ऊर्जेचा वापर इत्यादी अनेक उपक्रम हाती घेण्याची फार मोठी गरज आहे.

आंम्ही आजच या समस्ये विषयी सतर्क होऊन पुढची वाटचाल केली नाही तर आमच्या येणारी पिढीला फार मोठी चिंता आम्ही देऊन जाणार आहोत. तेव्हा वेळीच सावध होऊन निसर्ग, पाऊस आणि पाणी यांचे यांचे समायोजन संवर्धन करण्याची गरज आहे.

संजय रोंघे

मोबा- 8380074730




" नाद "

कपाळावर केसांची बट
देते हृदयास माझ्या साद ।
मनासही ऐकायचा तुझ्या
अंतरातला प्रेमाचा नाद ।
Sanjay R.

Friday, May 24, 2019

" काटे गळून गेले "

हृदय मी जेव्हा तुला दिले
काटे गुलाबाचे गळून गेले
दरवळतो सुगंध आता
अंगण बघ कसे बेधुंद झाले ।
Sanjay R.

Thursday, May 23, 2019

" वाटे सुने सारे "

शोधतो तुलाच मी
वाटत
असावी तू शेजारी ।

तुझ्याविना सुने सारे
सांगतो
आहेस तूच अंतरी ।

हसणे तुझे रागावणे
वाटते
मजला किती भारी ।

तरी शोधतो तुलाच मी
अंतरातल्या
त्या दिशा चारी ।
Sanjay R.

" गोष्ट एक "

संगतो ना गोष्ट एक मी
तुह्या माह्या प्रेमाची ।
भाव लयच खात तू
पर हायेस लय गुणाची ।
राग तुया नाकावर पर
पेरमळ लय ओ मनाची ।
हायेस ना तू संग माह्या
फिकीर न्हाई मले कोनाची ।
जीव महा आता तुयात
जागल करजो माया प्रेमाची ।
Sanjay R.

Wednesday, May 22, 2019

" दाखवा टोला "

झाली निवडणूक
निकाल आता ।
पडलो जर तर
काय खाता ।

कोळसा झाला
चारा झाला ।
माल सगळाच
खिशात आला ।

रस्ते विकास
पाहिजे कुणाला ।
पाणी हवं आता
जगवा माणसाला ।

जमत नसेल तर
उचला झोला ।
मोदी राहुलला
दाखवा टोला  ।
Sanjay  R.

Tuesday, May 21, 2019

" प्रगटते गीता "

डोक्यात जेव्हा येते कविता
मनानं होतो मग मी रिता ।
शोधतो भाव शब्दांचा
प्रगटतात ओळी होऊन गीता ।
Sanjay R.

Monday, May 20, 2019

" ना हो दिवार "

तुम हो जहाँ
वहा दिवार ना हो ।
हम भी हो वहा
पर दिदार ना हो ।
दिलमे आस वही
पर इजहार ना हो ।
इंतजार दो लब्जोका
पर खो न जाये कही ।
कह दो तुम आज
होगा दिल सही ।
Sanjay R.

Sunday, May 19, 2019

" है यह सपना "

तुम दूर ना जाना
हमे भूल ना जाना ।
याद दिलमे रखना
नाही है यह सपना ।
कहते आखे हमे कुछ
थोडा गालोमे हसना ।
खडे हम वही है जहाँ
तुमसे है मिलना ।
और दिलमे तमन्ना है
तुम खिलखिलाते रहना ।
Sanjay R.

Saturday, May 18, 2019

" रे बळीराजा.... "

रे बळीराजा.....
सहनशक्ती तुझी सांग
किती आहे रे अपार ।
कळणार नाही कधीच तुला
त्या चाकूची रे धार ।
नाही ठाव अजब रे 
आहे हे सरकार ।
पोटावर तुझ्या होता
किती किती रे वार ।
सांग तूच आता तुला
आहे कुणाचा आधार ।
किती रे झेलशील तू
हे असलेच प्रहार ।
काळ्या मातीत राबतो
नाही तुज दिस वार।
घरात जगतात किती
सांग किती तुझा भार ।
पै पै लागतो मातीत
घेतो पाऊसच इसार।
सावकारापुढे कसा
होतोस तू लाचार ।
तिसरा मधेच कुणी येतो
करतो तुझा व्यापार ।
खिसा घेतो हिसकावून
आणि सरतात विचार ।
सांग ठणकावून जरा
तूच जगवतो सारा भार ।
नको रे सोसू असा
एकटाच सारे वार ।
फेक फंदा फाशीचा
दे घराला तू आधार ।
टाक उलटून आता
सरकारचा हा दरबार ।
जळून तू रे जळणार किती
राखे विना काय उरणार ।
टाक जाळून तू आता
पडू दे त्यांचेच निखार ।
Sanjay R.

Friday, May 17, 2019

" भावार्थ "

शब्द च तर भाव
सांगून जातात ।
बाकी काय असतं
आपल्या हातात ।

शब्दांची होते कविता
भावार्थ तिचा किती ।
हृदयात जेव्हा ठसते
भावना होते रीती ।

चार ओळींची चारोळी
नजरेतून जाते गळी ।
मन होते आनंदी
फुलवत गालावर खळी ।
Sanjay R.

" तू रणरागिणी "

तू स्वप्नपरी
सुन्दरी खरी ।
रूप गुण
तू मनोहारी ।
भासते मज
सुशांत विचारी ।
भूषण तूझेच
इंद्र दरबारी ।
लौकिक तुझा
दिशा चारी ।
रण रागिणी तू
आहे परोपकारी ।
संजय R.

Thursday, May 16, 2019

" तुझ्याच साठी "

तुझ्याच साठी सखे
असते माझी कविता ।
मनात भाव कितीक
करतो घडा रिता ।

पदो पदी क्षणो क्षणी
तू असतेस माझ्या मनात ।
शब्द होऊन अवतरतेस
झुलते मन क्षणात ।

शब्दांच्याही पलीकडे
लपल्या आहेत व्यथा ।
सांगू कसे तुला मी
अंता वीणा ती कथा ।

थांबवू नको तू हसणे
नको वाटे तुझे रुसणे ।
जीवन ही एक गाथा
हवे त्यात तुझे असणे ।
Sanjay R.

" अरमान "

ना भुले है कुछ
ना भुलेंगे कुछ  ।
है अरमान वही
दिलसे तो पुछ ।

बाते है वही
जो दिलने कही ।
आज भी है
दिलमे सही  ।

यादे अब वही
न भुलना कभी ।
दिल ही दिलका
है साथी अभी ।
Sanjay R.

" कसारे पावसा "

कशाला ऐकतो रे हा पाऊस
बुडवायची तर त्यालाच हाऊस ।

आलाच तर येणार खूप
पाणी पाणी होणार पाऊस ।

नाहीतर कोरडे आभाळ सारे
घोर जीवाला नको रे लाऊस ।

पाण्याविना जीवन नाही
गीत पावसाचे नको गाऊस ।

जंगल झाडे लयास गेले
हिसका तुझा रे नको दाऊस ।

थोडा थोडा रोज तू पड
सोडून आम्हा नको तू जाऊस ।
Sanjay R.

Wednesday, May 15, 2019

" मुंबई शहर लय भारी "

मुंबई ची लोकल लय भारी
आत घुसण नशिबाची दोरी ।

पायदळ करा कितीही वारी
लोकल मधेच मज्जा न्यारी ।

चढा उतरा ती कसरत खरी
जमत नसेल तर बसा घरी ।

वेळेला पण  किंमत भारी
धावपळ असते जन्मभर सारी ।

मुंबई शहर हो लईच भारी
नाशीबावरच असते दोरी ।

म्हातारे कोतारे असाल जरी
मरायसाठीच जगतात सारी ।
Sanjay R.

Tuesday, May 14, 2019

" इंतजार "

कल उनको था इंतजार
आज हमको ।
रुठ गये है वो आज हमसे
पुछे अब किनको ।
तरस गये मानानेको आज
कह दो अब उनको ।
सामने जब आये वो हमारे
कहेंगे दिलसे दिलको ।
Sanjay R.

" आई "

सत्यातली दुनिया
त्यात अतूट प्रेमाच्या माळा ।
आई जोजवते लेकराला
निज निज रे माझ्या बाळा ।
Sanjay

Sunday, May 12, 2019

" किनारा "

बेधुंद हा वारा
खळखळतो  किनारा
सखे संगे तुझ्या मी
कळला का तुज इशारा

आठवण तुझी मज
करते अशी बेधुंद ।
मनाचा ग माझ्या
सोड ना तू बंध ।

दुरून या येतात
सागराच्या लाटा ।
चल ना सखे जाऊ
नेतील जिथे वाटा ।

दूरवर दिसतो
स्वप्नांचा एक आडोसा ।
जगू स्वप्न तिथेच
मिळेल मनास दिलासा ।
Sanjay R.

Saturday, May 11, 2019

" घे बाबू ईळा "

भारी लय झाला हो
अमदाचा ह्या उन्हाळा ।

येईन आता  डौलन
ऋतू पावसाळा ।

शेतकरी शोधन मंग
आकाशात ढग काळा ।

तयार हाये जमीन
आता बियानाचा घोळा ।

पैसा अडका सरला
शोधा सावकाराचा खळा ।

पीक न्हाई झालं तं मंग
झाडाले लटकवाचा गळा ।

चाल बाबू कहाड आता
सरण तोडले इळा ।
Sanjay R.

" मोठ्ठा घोय "

दिस हाये उन्हायाचे
पाहून बापू जेव ।
नाईतन मग तुले
दिशीन सारे देव ।

घोयंच्या भाजीनं
केला मोठ्ठा घोय ।
सकाय झाली बेकार
अंदर कोन होय ।

लय झाले गा येले
गेला सगळा चेव ।
डाकटरनं बी लुटलं
वाटते आता भेव ।
Sanjay R.

" सूर '

तू तिथे दू...र
मी इथे आतुर ।
छेड ना बासरी
दे मजला सूर ।
अंतरातलं माझ्या
संपू दे काहूर ।
Sanjay R.

Friday, May 10, 2019

" काय माझा कसूर"

तुझ्या भेटी साठी
मीही आहे आतुर ।
सांग ना वेळेला थोडं
होऊ नको म्हणा फितूर ।

मन थोडं हळवं माझं
भटकत असतं दूर दूर ।
तुझीच त्यास प्रतीक्षा
लावतं मलाच हूर हूर ।

कधी उठे पेटून मग
होई काळा काळा धूर ।
ठेच लागता छोटीशी
डोळ्यातून वाहे पूर ।

चाहूल तुझी मग लागता
गावसतो त्यासी सूर  ।
विसावते तुझ्यात मग
सांग काय माझा कसूर ।
Sanjay R.

Thursday, May 9, 2019

" असणं नसणं "

गोड तुझं हसणं
हळूच थोडं लाजण ।
मनाचा माझ्या ग
ठाव घेते तुझं बघणं ।
हवं हवसं वाटत मला
जवळ तुझं असणं ।
हुरहूर लावते मनाला
तुझं सोबत नसणं ।
Sanjay R.

" आवड निवड "

काय असेल माझी आवड
केली म्हणूनच ना तुझी निवड ।

नेहमीच असतेस किती बिझी
मिळायची केव्हा तुला सवड ।

बघ जीवाची किती होते परवड
चालते मनाची मग धडपड ।

निघावं वाटत घेऊन कावड 
कोमेजेनार नाही ना ही आवड ।
Sanjay R.

Sunday, May 5, 2019

" देखो सभी "

पुरा ना हो कभी
देखते सपना वह सभी ।
पाना है कुछ अगर
करो कोशीश फिर अभी ।
थोडे कष्ट थोडी मेहनत
न जाये व्यर्थ कभी ।
जिंदगी होगी रंगीन
खुशीयल होगे देखो सभी ।
Sanjay R.

Saturday, May 4, 2019

" काय हे जीवन "

काय हे जीवन
कसे हे जीवन  ।
बघायचं सारं
ठेऊन खुले नयन ।
डोकावलो आत तर
प्रश्न किती गहन ।
चालतांना इथे
करायचं सारं सहन ।
कुठे आनंद कुठे दुःख
प्रश्न पोटाचे भरण ।
स्वतःच जमवायचे
स्वतःसाठी सरण ।
शेवटाला मात्र
होते सारेच दहन ।
Sanjay R.

Friday, May 3, 2019

" खबर "

ना उनको है खबर
ना हमको है खबर ।
बात दिलकी हो जब
थोडा तो हो सबर ।
दिल दे आवाज जब
दिलको कहा खबर ।
आखे धुंडती तब
नहीं दिलको सबर ।
कुछ कहती है आखे
और हो जाता असर ।
ओठ ना कह पाते कुछ
बस सहता दिल ही असर ।
Sanjay R.

Thursday, May 2, 2019

" मन हे वेडं "

मन खरच हे वेडं
थांबत नाही थोडं ।
घेतं भरारी दूर दूर
कशी कुणाची ही छेड ।
मन खरच हे वेडं ।

मन प्रेमाचा हा झरा
वाहे हळुवार वारा ।
अंतरात फुलवी आनंद
सुगंधित परिसर सारा ।
मन प्रेमाचा हा झरा ।

मन अधीर अस्थिर
लागे कुठे कुठे तिर ।
कधी घेई वेध कशाचा
कधी वाटे घायाळ तितीर ।
Sanjay R.