चेतवू नको ही वाणी
दुःखाची आहे कहाणी ।
पडेल अपुरे विझविण्या
टाकशील कितीही पाणी ।
बघ डोळ्यात जरा दिसेल
आटलेल्या अश्रूंची निशाणी ।
मुखावर आहे खोटेच हास्य
अंतरात आहेत गाऱ्हाणी ।
Sanjay R.
चेतवू नको ही वाणी
दुःखाची आहे कहाणी ।
पडेल अपुरे विझविण्या
टाकशील कितीही पाणी ।
बघ डोळ्यात जरा दिसेल
आटलेल्या अश्रूंची निशाणी ।
मुखावर आहे खोटेच हास्य
अंतरात आहेत गाऱ्हाणी ।
Sanjay R.
थाम्ब जरा तू नको जाऊ
करू किती मी विनवणी ।
बघ वळून जरा काय मागे
दिसेल जुनीच ती निशाणी ।
हृदयात ठेवली जपून मी
तुझी माझी ती गोड कहाणी ।
घट्ट हृदयात अजूनही रुतलेली
सांग काढू कशी निशाणी ।
येतो आठवणींचा पूर जेव्हा
थांबेचना डोळ्यातले पाणी ।
नको करुस मनावर आघात
सांगून तू गेलीस की चेतावणी ।
Sanjay R.
कधी पडतो पाऊस खूप
कधी दिसेचना त्याचे रूप ।
येतात कधी वादळ वारे
हाती निसर्गाच्या हे सारे ।
नसते कमी मेहनत माझी
पण नाही कुणा कदर त्याची ।
फळ मेहनतीचेही का मिळेना
गुन्हा काय माझा काहीच कळेना ।
Sanjay R.
गर्दी किती माणसांची
भरला इथे बाजार ।
वेगळे सारेच इथे
जणू जडला आजार ।
निस्वार्थ शोधू कुठे
आहे सारखाच शेजार ।
डाव साधतो कुणी
कुणी आहे लाचार ।
मजली लूट कशी
नाही कशाचा विचार ।
जो तो करी माझे माझे
फक्त स्वतःचाच प्रचार ।
नाही उरली माणुसकी
शोधतो मी आधार ।
मिळेल का कुठे माणूस
की सगळीकडे अंधार ।
Sanjay R.
वाट संसाराची कठीण
खडतर किती हा प्रवास ।
पोटाशिवाय असतो का
दुसरा कुठला ध्यास ।
भरले जरी पोट गच्च
सरत नाहीच हव्यास ।
अनाचारी होतो मग
घेतो हिसकून घास ।
स्वतःचाच विचार असतो
इतरांना देतो त्रास ।
राक्षस होतो कधी तोच
लालची पणाचे सारे प्रयास ।
अंत्य समयी काय नेतो
सोडून इथेच जातो श्वास ।
माणुसकीला असता जगला
नसता झाला कसला त्रास ।
चार सुखाचे दिवस सुटले
कुठे मिळाला त्याला विश्वास ।
Sanjay R.
पुढे पुढे सरकत काटे
चाले घड्याळ अविरत ।
वेळ कशी ही कुठे थांबते
जगतो मी दिवस सारत ।
काल नव्हता आज सारखा
येणार कुठे तो परत ।
उद्या ची मी वाट पाहतो
नको आज, उद्या करत ।
Sanjay R.
पडेल आता पाऊस
वाट नको तू पाहुस ।
नागर वखर हाक जरा
मागे तू नको राहुस ।
पाऊस पडेल यंदा
घाबरून नको जाऊस ।
भरभरून होईल पीक
पुर्ण तुझी होईल हौस ।
पैसा येईल खूप हाती
बजेट आता नको लाऊस ।
खर्च करूनही उरेल काही
टेन्शन असे नको घेऊस ।
महागाई तर ही जन्माची
सावकार कसा नको पाहुस ।
कर्जाचा बोजाच वाईट
फ़ंद्या कडे नको धाऊस ।
वळून थोडे बघशील जरा
रडगाणे तू नको गाऊस ।
बायको मुलांना हसव जरा
सोडून सारे नको जाऊस ।
तुझ्यासारखी हिम्मत कुणात
काळजी घराला नको लाऊस ।
नशिबाचा खेळ जरी हा
यंदा नक्कीच येईल पाऊस ।
Sanjay R.
नको येउस तू
मी दूरच बरा ।
बघून का हसते
सांग ना जरा ।
लावले वेड मज
काय तुझी तऱ्हा ।
नजरेला दे नजर
सुखवेल ही धरा ।
Sanjay R.
मनात आहे ती वेडी आशा
करू किती मी तुझी प्रतीक्षा ।
कुठे शोधू मी सांग तुला
नाही उरल्या कुठल्या दिशा ।
थकले आता हे डोळे माझे
का कळेना तुज माझी दशा ।
येणारच नाहीस तू परत
कशास देतेस मजला शिक्षा ।
Sanjay R.
जीवन झाले दुर्धर
प्रेम हवे नको द्वेष ।
राहतो जिथे आम्ही
जसा देश तसाच वेश ।
नकोत विचार मनाचे
कळ्या दगडावरची रेष ।
लागतील भोगावे मग
आयुष्यभर ते क्लेश ।
प्रेम द्या आणि प्रेम घ्या
करू नका हो द्वेष ।
Sanjay R.
दिवस कालचा
होता खास ।
झालो आनंदी
घेऊनही त्रास ।
अंतरात सदा
होता ध्यास ।
मार्गी लागले
सारे प्रयास ।
घट्ट झाला
मनात विश्वास ।
जगण्यासाठी
हवेच श्वास ।
क्षणात सारे
सरले भास ।
तुजविण नाही
कोणी खास ।
Sanjay R.
सदा असतो ध्यास
होतात किती आभास
मग संथ होतात श्वास
कर्तव्याचा होतो प्रयास
पूर्णत्वाचा असे विश्वास
मार्गी लागते सारेची
सफलतेचा क्षण खास
Sanjay R.
अंगावर असू दे
घाव कितीही ।
निघतील भरून
साऱ्या जखमा ।
मनात झाल्यात
ज्या वेदना माझ्या ।
नाही दुःख मज
काही कशाचे ।
सांगतील अश्रू
वाहत्या डोळ्याचे ।
चोळू नकोस मीठ
जखमेवर माझ्या ।
उरेल काय सांग
ओंजळीत तुझ्या ।
नाही होत सहन
भडकतीळ ज्वाला ।
होईल भस्म सारे
उरेल राख टिळ्याला ।
Sanjay R.
प्रेमाची तर एकच भाषा
माया करते जशी आजी ।
नजरेत असे तिच्या ओढ
नि अंतरात काळजी ।
प्रेम आईचे कसे सांगू
कमी पडेल शब्द सारे ।
माया ममता फक्त दिसे
येऊ दे झंझावात वारे ।
मैत्रीतही दिसे प्रेम
शब्द लागे मनाला ।
जीव तुटतो कधी
देतो जीव जीवाला ।
तुझे माझे प्रेम असेच
सांगू मी कुणाला ।
जपून मी ठेऊ किती
कळू दे थोडे तुला ।
Sanjay R.
प्रेमाला कुठे भाषा
नसते कुठली दिशा ।
मनात एकच आशा
प्रेमाची हीच परिभाषा ।
कधी होते निराशा
मग वाईट किती दशा ।
Sanjay R.
बघून साधी झलक
म्हणतात प्रेम होतं ।
रोज रोज बघून मग
सांगा प्रेम कुठे जातं ।
हलकीच एक झलक
क्षणात टिपते नजर ।
आठवण मात्र येताच
चित्र डोळ्यापुढे हजर ।
Sanjay R.
जुनी किती ही संस्कृती
वाटावा कुणासही अभिमान ।
प्रत्येक जण पाळायचा
प्रत्येकाचाच सन्मान ।
जाती धर्म पंथ अनेक
हीच या देशाची शान ।
राजकारणाने केला घात
दिसे आता फक्त अज्ञान ।
लोभ मोह द्वेष पसरला
कोण मोठा कोण लहान ।
निघा एकदा बाहेर यातून
नका करू असा अपमान ।
देशासाठी जगू मरू या
सारेच म्हणू भारत महान ।
Sanjay R.
कहाणी झाली पाहणी झाली
जुळले एकदाचे लग्न ।
मुलगा मुलगी झाले मग
स्वप्न पाहण्यात मग्न ।
बाप लागला मग कामाला
दागिने कपडे नवऱ्याला मुंदी
हॉल वाजंत्री काय काय हवे
जेवणात ठेवू म्हणे बुंदी ।
दिवसामागून लोटले दिवस
पत्रिकाही झाल्या आता वाटून ।
लग्नाच्या दिवशी नवरा नवरी
आले मांडवात नटून थटून ।
आली लग्न घटी म्हणता
उधळल्या साऱ्या अक्षदा ।
ब्यांडवाला तयार होता
बडवू लागला बदा बदा ।
लग्न लागले पंगती उठल्या
नवरा नवरी होते खुशीत ।
लेक निघाली सासरला मग
होते सगळेच आसवे पुसीत ।
Sanjay R.
सुचेना काहीच मला
आज शब्दही जड झाले ।
बघून वाट मी थकलो
मन अंतरात जाऊन आले ।
आठवणींचा गुंता तेथे
काय त्यातून घेऊन आलो ।
मनच मग सांगून गेले
दूर तर मी तेव्हाच झालो ।
कोण मी कुठला कसा
मनात थोडा दुःखी झालो ।
खोटे खोटे का हसतो
पोरका मी तेव्हाच झालो ।
Sanjay R.
वाहत्या पाण्याची
कशी संथ धार ।
तुझ्या माझ्या मैत्रीचा
अगदी तसाच सार ।
नाव निघाली मैत्रीची
तिला मैत्रीचा आधार ।
दूर असूनही वाटे
जवळ किती तो पार ।
जुळवल्यानी जुळतात
असू दे वेगळे विचार ।
मित्र दिसताच मात्र
होतो मैत्रीचा संचार ।
Sanjay R.
का तापतो सूर्य असा
आगीचा तो गोळा जसा ।
पाण्यासाठी व्याकुळ सारे
जीव झाला वेडा पिसा ।
दूर दसते ते मृगजळ
दूर किती जाऊ कसा ।
शोधतो सावली जराशी
वृक्षतोडीचा घेऊन वसा ।
Sanjay R.
सांगू मी कुणास
काय किती मनात ।
सुखाचा करतो शोध
गुरफटतो दुःखात ।
बोचती काटे किती
आठवणींच्या वाटेत ।
धडपड चाले सारी
डुबनाऱ्या लाटेत ।
धरतो प्रकाशाची वाट
अंधार मात्र डोळ्यात ।
Sanjay R.
सांभाळ तू जरा
आहे पुढे धोका ।
नको समजू तू
मिळालाय मोका ।
दिसते तसे नसते
म्हणून जग फसते ।
दुःख या जीवनाचे
भोगायचेच असते ।
निर्धार तू नको सोडू
यश हातात आहे ।
नको बघुस मागे
पुढेच जायचे आहे ।
Sanjay R.