नको तो विचार
डोक्यावरती भार ।
शांततेने जगा
हाच एक सार ।
तापतो किती सूर्य
पाणी हवे गार ।
होतो गळा थंड
गर्मी वरती प्रहार ।
कधी तापते डोके
होतो विचित्र आचार ।
सवयीचा तो गुलाम
नेमका होतो लाचार ।
हवी थोडी शांती
नको कुठले विचार ।
आनंदाची शिदोरी
उत्साहाचा संचार ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment