Thursday, September 30, 2021

" कहर केला पवासाने "

कशी करू नको चिंता
दिला पावसाने धोका ।

आशा होत्या किती तरी
रंग पडला कसा फिका ।

नशिबाचाच खेळ सारा
पदोपदी का मिळे धोका ।

कहर केला ना पावसाने
पोटावरच दिला ठोका ।

पाण्यात गेली मेहनत
प्रसंग जीवनाचा बाका ।

मुलाबाळांची स्वप्न सारी
काहीच विचारू हो नका ।

निसर्गच कोपला आता
पडला जीवनावर डाका ।

वर्षानु वर्षे तर हेच होते 
आहे हीच जीवनाची रेखा ।
Sanjay R.

" चिंता "

डोकंच झालं खोका
या चिंतेला कुणी रोका 
डोक्याला नाही आराम
होईल हृदयाला धोका ।
विचारच नको कुठले
काढून दूर सारे फेका ।
हलके होईल मस्तक
घाबरू तुम्ही नका ।
मन होईल मग शांत
उठाहो चला काका ।
Sanjay R.

" मार्ग जीवनाचा "

मार्ग जीवनाचा
कठीण किती ।
असते  जेव्हा साथ
नसे कशाची भीती ।
जपायची आपुलकीने
सगळी नाती गोती ।
हृदयाच्या कोनाड्यात
जागा नको रीती ।
हसत खेळत जगायचे
घेऊन हात हाती ।
Sanjay R.


Wednesday, September 29, 2021

दिवाळी - राणी भाग दहा

       नितु आता आपले उच्च  शिक्षण आटोपून अमेरिकेला एक मोठ्या कँपनी मध्ये जॉईन झाला होता. मीतू पण आपले शिक्षण सम्पवून लग्न करून ऑस्ट्रेलियाला सेट झाली होती. नाईक ही रिटायर्ड झाले होते. त्याना पेन्शन बरीच मिळत होती. राणी आणि नाईकांचे दिवस ही कधी अमेरिका कधी ऑस्ट्रेलिया तर कधी भारतात निघत होते.  मुलांचे सुख बघून राणी आणि नाईक निश्चिन्त झाले होते.  त्यांचेही म्हातारपणाचे दिवस आता आनंदात निघत होते. दोघांनाही एकमेकांचा आधार होता.  मधे मधे नाईकांची बहीण सारीता ही येऊन जायची. तिला वाटलं तर चार दिवस ती पण नाईकांकडे राहून जायची. तिचे मिस्टर गेल्या पासून ती एकटीच झाली होती. तिचा मोठा मुलगा तिथल्याच कॉलेज ला प्रोफेसर झाला होता. तोही आपल्या संसारात खुश होता. नाईकांना अडीअडचणीच्या वेळी मदत करायचा .नाईकांना त्याचा खूप आधार होता. ताईचा छोटा मुलगा मुंबई ला नोकरीला होता. तोही सुट्ट्यांमध्ये येऊन जायचा. येकून सम्पूर्ण कुटुंब व्यवस्थित सेट झालं होते. सगळेच आपल्या संसारात खुश होते.

       नाईकांना आता कशाचीच चिंता उरली नव्हती. पुढल्या आठवड्यात दिवाळी येणार होती. दिवाळी साठी नितु अमेरिकेहून सुट्ट्या घेऊन येणार होता. त्याने मीतूला तसे कळवले होते.  मीतू पण येण्यासाठी प्रयत्न करत होती.  अगदी वेळेवर तिच्या सुट्ट्या मंजूर झाल्या होत्या आणि तिचे येण्याचे तिकीट कन्फर्म झाले होते. दिवाळीला सम्पूर्ण कुटुंब एकत्र येणार होते. राणी खूप खुश होती. तिची दिवाळीच्या तयारी साठी धावपळ सुरू होती.  नितुला काय काय आवडते मितूला काय काय आवडते आता राणीला चांगलेच माहिती होते.दोघांच्याही आवडीचे सारे पदार्थ राणीने करून ठेवले होते.  वारंवार फोन करून नितु मीतूला सारखे विचारत होती आता निघायला किती दिवस उरलेत, कधी निघणार, कधी पोचणार. तिला मुलं कधी येतील आणि कधी मी त्यांना बघेन असे झाले होते.

       दुपारी काम आटोपून राणी नाईकांसीबत गप्पा करत बसली होती. तितक्यात सरिता चा आवाज आला राणी राणी. राणीने उठून दार उघडले. सरिता आत आली. ती नाईकांकडे बघत म्हणाली दादा मी सगळे ठरवले. तुला आता काळजी करायची बिलकुल गरज नाही.  नाईकांना काहीच कळले नाही. ते म्हणाले अगं कशाबद्दल बोलत आहेस. तशी सरिता बोलली अरे ते पाटील आहेत ना त्यांची मुलगी निशा आपल्या नितु साठी परफेक्ट मॅच होईल. मी तिच्या आई बाबांशी बोलून आले. आपला नितु त्यांना पसंत आहे. आता नितु आला की दोघांची भेट करवून देऊ. त्यांचा होकार झाला की . ताबडतोब मुहूर्त काढून बँड वाजवून टाकू. नाईकांच्या अर्ध्या चिंता त्यांची बहीण सारिताच पार पाडत होती. नाईकांनाही ते प्रपोजल खूप आवडले.निशा पाहायला सुंदर होती. पोस्ट ग्रॅज्युएशन आताच पूर्ण झाले होते .  ती नितु साठी अनूरूपच होती. नितु मीतू सोमवरला पोचणार होते. आज रविवार होता. राणीची दिवाळीची सगळी तयारी झाली होती. आता मुलांचीच तेवढी कमी होती. सोमवार उजाडला सकाळी सकाळीच नितु मीतू दोघेही घरी पोचले. नितुने बाहेरूनच राणी ला आवाज दिला आई आई अगं कुठे आहेस, बघ आम्ही आलो आहेत. तशी राणी ने दार उघडले . तिने दोघांनाही जवळ घेतले. मीतू चा नवराही आला होता. तो पण खूप स्मार्ट उंच पुरा हँडसम होता. फक्त तो शांत स्वभावाचा होता. सगळे आत आले. राणीने त्यांना चहा दिला. चहा पिऊन सगळे फ्रेश झाले. फराळ आटोपला. राणीने जेवणाची तयारी केली. तोवर सारिताही आली. दुपारी पाटलांच्या घरी जायचे होते. निशाला बघायला. जेवण करून थोडा आराम झाला. मग सगळे निशाला बघायला पाटलांच्या घरी पोचले. निशाला बघून नितु अगदी खुश झाला. त्याला निशा  आणि निशाला नितु पसंत आले.  सहीच दिवसांनंतरचा मुहूर्त काढून लग्नाचा दिवस पक्का झाला.

        आता दिवाळी आटोपली नितुचे लग्न आटोपले. निशा चा व्हिसा मिळायला तीन महिने लागणार होते. म्हणून नितु एकटाच अमेरिकेला निघून गेला होता. निशा राणी सीबत च राहत होती. दोघी सासू सुना असूनही माय लेकी इतके प्रेम त्यांच्यात जुळले होते. तशातच एक दिवस नितु चा फोन आला. त्याच्या कम्पनीने त्याला भारतातच ट्रान्स्फर दिली होती. तो आपल्या घरीच राहून भारतात कंपनीचे भारतातले त्यांचे ऑफिस त्याला सुरू करायचे होते. आणि सम्पूर्ण भारतात कंपनीचा बिझनेस डेव्हलप करायचा होता. जवाबदारी मोठी होती पण ते चॅलेंज नितु ने स्वीकारले होते. नाईक राणी निशा सरिता आता खूपच खुश होते.
Sanjay R.


मुक्ती - राणी भाग नऊ

      राणी वडील गेल्या पासून थोडी शांत झाली झाली होती. तिला सारखी आई आणि वडील यांची आठवण यायची. वडिलांचे विक्षिप्त वागणे आई चा आजार. सम्पूर्ण कुटुंबाची होणारी परवड. उपाश्यापोटी ते काढलेले दिवस. सारच तिला आठवायचं. मग ती अजूनच अस्वस्थ व्हायची. वडील का तसे वागत होते. याचे ती उत्तर शोधायचा प्रयत्न करायची. पण ते एक नेहमीसाठी तिच्यापुढे प्रश्नचिन्ह होऊन पुढे राहायचे. कोणी काही सांगेल का ते तसे का होते. जर ते तसे होते तर मरताना इतके प्रेमळ मायाळू का वागले. का आपली इतकी आठवण करत होते. आपली भेट होईपर्यंत ते कुठली आस मनात ठेवून ते जिवंत होते. आपली भेट होताच आपल्या मांडीवरच त्यांनी का प्राण सोडले. विविध प्रश्न तिच्या डोक्यात गुंता करत होते. उत्तर तिलाही माहीत नव्हते. आई ही तिच्याशी बा बद्दल कधीच काही बोलली नव्हती. आई आणि बा कधीच त्याना तिने सोबत बसून बोलताना बघितले नव्हते. बा फक्त झोपायला तेवढा घरी यायचा. सकाळ होताच निघून जायचा. परत यायचा तो दारूच्या नशेतच असायचा. का तो असे करायचा. राणीला काहीच कळत नव्हते, सुचत नव्हते.
तिने आपल्या मनातले सारे प्रश्न नाईकांकडे मांडले. नाईकांनाही ते एक कोडेच वाटले. त्यानी राणीला समजवायचा प्रयत्न केला. ते म्हणाले. राणी विसर आता सगळं. त्यांचं आयुष्य ते जगलेत. तुझ्यापुढे आता भविष्य आहे. ते तू आनंदात काढ. तसेही ते दोघेही आता जिवंत नाहीत तुला उत्तर द्यायला. का स्वतःला असा ताप करून घेतेस. आठवण येणे तर स्वाभाविकच आहे परंतु, सारखा तोच तो विचार करणे बरे नाही. तू स्वतःच आजारी पडली तर मग आमच्याकडे कोण बघणार. खरच आता तू ते सगळं विसरून जायला हवे. नाईकांचे ते बोलणे राणीलाही सुटायचे. ती मग त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्नही करायची. पण जेव्हा ती एकटी असायची तेव्हा तिला तो तिच्या बा चा शेवटचा क्षण आठवायचा आणि मग ती त्या सगळ्या विचारात गुरफटून जायची.

       बा च्या तेराव्या दिवसाला तिने नैवेद्य काढून गाईला अर्पण केला. पूजा केली. नाईकांनी काही वस्तू आणून ठेवल्या होत्या त्या साऱ्या वस्तू ती त्या राहत असलेल्या गरिबांना वाटायला घेऊन जाणार होती. नाईक त्यासाठी आज ऑफिसमधून लवकर घरी परत येणार होते. ती नाईकांची वाटच बघत होती. तेवढ्यात नाईक आलेत. दोघेही मिळून ते साहित्य घेऊन तिच्या त्या घराच्या भागात पोचले. त्यांनी घरोघरी जाऊन  सगळ्या वस्तू तिथल्या लोकांना वाटून दिल्या. बा चा निरोप घेऊन येणारे ते गृहस्थही तिला भेटले. तिने त्यांना कधीतरी वेळ मिळेल तेव्हा घरी येण्याचे निमंत्रण दिले आणि ते दोघेही घरी परत आले.

       आज तिला थोडे बरे वाटत होते. ती तिकडे राहत असताना तिथल्या लोकांनी तिच्या बा आईला जी मदत केली होती. तिला तिथे जे प्रेम मिळाले होते त्याची परतफेड तर शक्य नव्हती, पण तिनेही त्यांच्यासाठी काही केल्याचे समाधान तिला वाटत होते. तिथे राहणारी सगळीच कुटुंब गरीब रोज दिवसभर कष्ट करून पोट भरणारी होती. त्यामुळे त्यांना दिलेल्या त्या वस्तू त्यांच्या कामात येणार होत्या.  तिचे सम्पूर्ण बालपण तिथल्या त्या लोकांच्या सानिध्यातच गेले होते. तिथले लोक सगळे गरीब जरूर होते. पण वाईट बिलकुल नव्हते. त्यानाही आपला आत्मसन्मान खूप मोठा वाटायचा. त्यासाठी ते स्वतःला खूप जपत होते. तेच संस्कार राणी ला मिळाले होते . कष्ट इमानदारी आणि आत्मसंमान सगळेच गुण राणीने  पूर्णतः अंगिकारले होते.स्वभाव तर मुळातच तिचा शांत,साधा, सरळ, सालस होता. नाईकांना म्हणूनच राणी आवडत होती.

      हळू हळू दिवस जात होते. आता राणीही आई वडिलांचे दुःख विसरत होती. घरात कामाच्या व्यापात तिचा वेळ कसा निघून जायचा ते तिला कळत नव्हते. नाईक आणि मूलं ही आता राणी सोबत छान मिक्स झाले होते. आता सगळे व्यवस्थित सुरू होते. असेच एक दिवस सायंकाळी सगळे आनंदात गप्पा करत होते. तेवढ्यात दरवाजावर खटखट झाली. राणीने दरवाजा उघडला तर तेच गृहस्थ दारात उभे होते. त्यांनीच राणीच्या वडिलांचा शेवटचा निरोप आणला होता. तोवर नाईकही दारात आले. नाईकांनी त्याना घरात बोलवले.  राणी त्यांच्या साठी चहा ठेवायला आत गेली. नाईकांनी त्यांना बसवले आणि येणाचे कारण विचारले. त्यांनी सांगितले काही कामा निमित्त ते त्या भागात आले तर राणी ची आठवण झाली म्हणून सहज आल्याचे सांगितले. नाईक त्यांच्या सोबत गप्पा करत होते. तेवढ्यात राणी त्यांच्याकरिता चहा घेऊन आली. त्याना राणीला बघून बरे वाटले होते. मग राणीनेच    त्यांना विचारले काका मला एक प्रश विचारायचा होता.  विचारू की नको सुचत नाही आहे. मला विचारायचे होते की माझे बा असे का वागायचे ते घरी कधीच नव्हते बोलत फक्त रात्री यायचे आणि सकाळी निघून जायचे असे का करत होते ते.  आणि आई  माझ्यावर खूप प्रेम करायची पण बा त्याने कधीच माझ्यावर प्रेम केले नाही कधी बोलत पण नव्हता. पण अंत समयी काय झाले की तो मला आयुष्यभरासाठी आशीर्वाद देऊन गेले.

      राणीचा प्रश्न ऐकून त्या गृहस्तांचे डोळे पाणावले. राणी बेटा तू एक वर्षाची असतानाची गोष्ट असेल. बेटा तुझी एक बहीण होती. ती तुझ्या पेक्षा मोठी होती दोन वर्षांनी. तुझे बा चांगल्या नोकरीत होते. घर दार सगळंच चांगलं होत. पण एक दिवस तुझे बा तुझ्या बहिणीला घेऊन कुठे बाहेर निघाले होते. ती त्यांचा हात पकडून चालत होती. पण अचानक तिने त्याचा हात सोडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या फुगे वाल्याकडे धाव घेतली आणि नेमक्या त्याच वेळी येणाऱ्या बस ने तिला चिरडले. तिचा जागेवरच मृत्यू झाला. तुझ्या बा ला त्याचे खूप दुःख झाले इतके की त्याचे मानसिक संतुलन बिघडले. त्या दिवसापासून तो कधीच एकही शब्द बोलला नाही. त्याची वाचाच गेली. नोकरी गेली पैसा सम्पला. मग ते इकडे आमच्या भगत रहायला आले. या दोन्ही घटनांचा तुझ्या आईवरही फरक पडला ती पण आजारी राहायला लागली. तरी त्या माउलीने सगळे सांभाळले. तुला मोठे केले. तुझा बा बघ संतुलन गमावलेले असतांनाही शेवटी मात्र त्याला तुझी आठवण झाली आणि घरी परत आला. सारखे तुला आठवत राणी राणी करत होता. बेटा बरेच झाले. तू येऊन त्याला जवळ घेतलंस. मुक्त झाला तो या जन्मतून. नाही तर त्याचा आत्मा तुझ्यासाठी भटकत राहिला असता.

       ती गोष्ट ऐकून राणी खूप दुःखी झाली. तिच्या डोळ्यातून आसवे गळत होती. बराच वेळ झाला होता. ते काका आता निघून गेले होते. राणीला आता खूप बरे वाटत होते कारण तिचे बा या जन्मतून मुक्त झाले होते.
Sanjay R.




बाप - राणी भाग आठ

      आता हळूहळू मुलांचे आणि राणीचे जमायला लागले होते. राणी मुलांना मुद्दाम वेळ काढून त्यांच्याशी कधी गप्पा कधी मुलांना बाहेर घेऊन जाणे, कधी त्यांच्या अभ्यासात मदत करणे, कधी त्यांच्या आवडीच्या वस्तू आणून देणे, तीन के हवे काय नको त्याकडे लक्ष ठेवणे याकडे जास्त लक्ष देत होती. त्यामुळे मुलं खुश होती. मुलांना खुश बघून नाईकही खुश असायचे. त्यांच्याकडेही राणी तेवढेच लक्ष द्यायची. त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करायची. दोघनमध्ये प्रेमही वाढले होते. नाईक स्वतःच राणीला तिच्या कामात पण छोटी मोठी मदत करायचे. त्यामुळे दोघांमधली जवळीक अजूनच घट्ट झाली होती. नाईक कधी कधी राणी साठी मोगऱ्याचा गजरा आणायचे.  राणी तो गजरा मळून नाईकांच्या रम मध्ये जेव्हा जायची. वातावरण मोगरीच्या सुगंधाने धुंद व्हायचे. नाईकांचा कल ओळखून ती त्यांच्या मिठीत विसावायची. मग ती रात्र त्या दोघांची सम्पूर्ण सुखाची रात्र असायची. इतकं प्रेम इतका आनंद राणी साठी मात्र एक पर्वणी असायची. तिने अगोदर कधीच तो आनंद ते प्रेम तो सहवास अनुभवला नव्हता. ते तिच्यासाठी स्वर्ग सुखच होते.

       राणीचे आता आनंदाचे दिवस परत सुरू झाले होते. तिला आपल्या संसाराला आनंदी करायची जणू किल्लीच गवसली होती. मुलं पण आता तिच्या सोबत खूप आनंदी होते. त्यांना आता समज आली होती. राणी त्यांच्या साठी किती धडपडत असते हे ते बघत होते. तेही राणीला छोटी मोठी मदत करायचे. दुपारी एकटी असताना मात्र तिला बिलकुल करमत नसे. मग ती काहीतरी काम काढून त्यात आपले मन रमवायची तर कधी सरिता ताई कडे जाऊन यायची. कधी त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जायची. त्यामुळे सरीतालाही राणी बद्दल आपुलकी प्रेम वाटायचे. तिनेही राणीला आपली भावजय म्हणून स्वीकारले होते.

       आज राणी एकटीच घरात बसून आपले काम आटोपत होती. मुलं शाळेला गेली होती. नाईक ऑफिसला गेले होते. अचानक दार वाजले तिने कोण म्हणून दार उघडले . तर समोर तिच्या  जुन्या घरापुढे राहणारे गृहस्थ उभे होते. क्षणभर राणीला काही सुचलेच नाही. ती आपले जुने आयुष्य पूर्णतः विसरली होती. आता तिला कुणाचीच आठवण येत नव्हती. आई तिच्या दुःखातून मुक्त झाली होती. बाप कुठे गेला ते कळलेच नव्हते. आणि आज अचानक ते गृहस्थ दारा पुढे बघून तिच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या . शेवटी ते गृहस्थच बोलले. राणी कशी आहेस . ठीक आहेस ना बेटा. मी सहजच इकडन जात होतो तर तुझी आठवण आली. तुला बघावसं   वाटलं. म्हणून आलो बघ. तुला एक निरोप पण द्यायचा होता. त्यांना राणीला तो निरोप देऊ की नको असे होत होते. मग तीच म्हणाली अहो काका सांगा ना काय निरोप आहे. कुणाचा निरोप आहे. काही झालं का सांगा ना. राणीची उत्सुकता वाढली होती. सोबत काळजी ही वाढली होती. ते गृहस्थ भानावर येत म्हणाले. राणी अग तुझा बाप, तो आजारी आहे. झोपडीत आता एकटाच पडून असतो. चार पाच दिवसच झाले तो आल्याला. मध्ये कुठे होता, कसा होता काहीच सांगत नाही. खूप आजारी आहे. शेवटच्या घटका मोजत आहे. फक्त तुझे नाव तेवढे घेतो. काही खात नाही पिट नाही. आम्हीच त्याला बघतो. आता त्याला कोण दवाखान्यात नेणार. बघ तुला जमलं तर तू जाऊन भेटून ये त्याला. कदाचित तुझ्या भेटीने त्याला मुक्ती मिळेल. बघ बेटा तो तुझा बाप होता. कसाही असेना पण बाप तर होता ना. एकदा भेट त्याला. आणि मुक्त कर या जीवनातून. आणि ते गृहस्थ निघून गेले.

        राणीला काय करावे काहीच सुचत नव्हते. तिच्या डोळ्यांना मात्र अविरत धारा लागल्या होत्या. शेवटी धीर एकवटून तिने आपला तोल सांभाळला. तिने नाईकांना घरी बोलवून घेतले. आणि त्या गृहस्थाने सांगितलेले सगळे नाईकांना सांगितले. नाईकही ते ऐकून व्यथित झाले. त्यानी ताबतोब राणीला सोबत घेतले आणि राणीच्या त्या झोपडीकडे दोघेही निघाले. झोपडीची बरीच तूट फूट झाली होती. दार उघडेच होते. आत राणीचा बाप पडून होता. त्याची हालत खूपच खराब दिसत होती. पोट पाठीला लागले होते. हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. चेहरा सुकून गेला होता. डोळे खोल गेले होते. तो डोळे मिटून पडून होता. जोरजोरात श्वास सुरू होते तोंडातून काही अस्पष्ट पुटपुटत होता. राणीने त्याला आवाज दिला बा बा पण त्याने बघितलेच नाही तेव्हा राणीने त्याला हलवून जागे केले. त्याने हळूच डोळे उघडले. आणि पुटपुटला राणी. राणी म्हणाला होय बा मी राणी आहे, बघ ना माझ्याकडे. मी आली आता, तू नक्की बरा होशील रे. राणीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तशी त्याच्या चेऱ्यावर समाधानाची लकीर उमटली. त्याने कसा बसा आपला हात उचलून राणीचा हात आपल्या हातात घेतला. आणि मुखाने उद्गारला बाई सुखी राहा. श्वास थांबले होते. चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसत होती. राणीच्या डोळ्यातून आसवे गळत होती.

        नाईकांनी अंतसंस्काराची पूर्ण तयारी करून अंत संस्कार आटोपले. आणि दोघेही घरी परतले.राणीला आपल्या बालपणासुनचे सम्पूर्ण चित्र दिसत होते. तिचे अश्रू थांबत नव्हते. आयुष्यभर कधीच लक्ष न देणारा बाप मरतेवेळी मात्र भरभरून आशीर्वाद देऊन गेला होता. त्याने तिच्या मांडीवर डोके ठेऊन आपले प्राण सोडले होते.
Sanjay R.


" चुकीला नाही माफी "

चुकीला नाही माफी
बरोबरला कुठे टॉफी ।
स्वतःच व्हायचे खुश
गालावर थोडी लॉफी ।
गुणगुणायची एक ओळ
जसा गायचा तो रफी ।
मनातच स्वतः घ्यायची
मोठी सुवर्णाची ट्रॉफी ।
मनच सांगते मनाला
चुकीला नाही माफी ।
Sanjay R.



" आनंद थोडा जगायचे "

सारून दुःख बाजूला
आनंद थोडा जगायचे ।
बडबड गीत गाऊन मग
खुदकन गालात हसायचे ।
रडायला नाहीत डोळे
त्यातून तिरके बघायचे ।
गाल थोडे फुगवूनच
मस्त पैकी रूसायचे ।
जग बघा सुंदर किती
कशाला दुःख भोगायचे ।
Sanjay R.

Tuesday, September 28, 2021

" दूर किती तो तारा "

दूर किती तो तारा
चमचमतो बिचारा ।
मधेच येऊनि नभ
करी पावसाचा मारा ।
जातो भिजवून चिंब
वाटे मज तो इशारा ।
गन्ध प्रेमाचा तयात
आभास किती न्यारा ।
Sanjay R.


" रंग प्रेमाचा "

का पण कुणास ठाऊक
वाटतं करावी अनोखी मैत्री ।

यावा कधी मुसळधार पाऊस
असावी तिथे मग एकच छत्री ।

तू आणि मी असू दोघेच
बघावीत स्वप्न तुझीच या नेत्री ।

ओढ लागावी मज तुझी
यावी स्वप्नात माझ्या तूच रात्री ।

घेऊनिया जवळ मग
द्यावी तुजला या मनाची खात्री ।
Sanjay R.


Monday, September 27, 2021

" येणार किती तू पावसा "

येणार किती तू पावसा
नको वाटते तुझे येणे ।
थांब ना  आता जरासा
कठीण झाले रे हे जिणे ।

नदी भरली भरले तलाव
 सगळीकडे पाणीच पाणी ।
शेत डुबले पीक सडले
मदतीला रे नाही कोणी ।

डोंगर कर्जाचा माथ्यावर
सावकार वाटतो रे शनी ।
विष प्याया लागेल पैसा
विचार मरणाचा येतो मनी ।

थांबव जरा तुझा तांडव
सूर्य जरासा दिसू दे ना ।
पिकले जरी थोडे तरी
अश्रू पुसून जगू पुन्हा ।
Sanjay R.

" काय माझा अपराध "

सांग मला शेवटचे
काय माझा अपराध ।
प्रश्न अजूनही आहे 

करू नको मज बाद ।


टाक बोलून एकदा
सांग कशाचा हा वाद ।
दूर किती मी एकाकी
घेते अजूनही साद ।

शब्द हवा मज तुझा
ऐकण्या आतुर नाद ।
राहू नकोस तू चूप
कोण रे इथे आजाद ।

ये परतून तू असा
वाटे रिकामा प्रासाद ।
अनमोल हे जीवन
घेऊ जगण्याचा स्वाद ।
Sanjay R.


Sunday, September 26, 2021

" मनात चाले काय "

चाले मनात काय काय
त्यातले किती सुविचार ।

अखंड चालली परिक्रमा
मन करी तयाचा प्रचार ।

नको नको त्या आठवणी
आणि बुद्धी होते लाचार ।

कधी मी मी चाच भाव
अंगात शक्तीचा संचार ।

पदरात येई कधी मग
आपलाच धिक्कार ।

नको वाटे मज आता
काही कशाचे विचार ।

जीवनाच्या वाटा किती
होतील अशाच पार ।
Sanjay R.



Saturday, September 25, 2021

" जपायचं सारं अंतरात "

वेळ लागतो थोडा
काही मिळवायला ।
मन असेल ते तर
त्यालाही ओळखायला ।
क्षणही असतो अपुरा
सर्वस्व गमवायला ।
नातं असो वा वस्तू
नको कधी हरवायला ।
जपायचं सारं अंतरात
पुरेल जन्मभर जगायला ।
Sanjay R.


Friday, September 24, 2021

" मन कुणावर जडते "

सारंच काही अडते
जेव्हा मन कुणावर जडते ।
सांगून कुठे काय होते
नकळतच सारे घडते ।

विसर पडतो सारा
मिळता प्रेमाची साथ ।
सुचेना काही कशाचे
सदा मन असते गात ।

प्रीतीची तऱ्हाच वेगळी
ऐकेना मन मनाचे ।
विचार असे फक्त एकच
करू काय या मनाचे ।
Sanjay R.


बाप - राणी भाग आठ

      आता हळूहळू मुलांचे आणि राणीचे जमायला लागले होते. राणी मुलांना मुद्दाम वेळ काढून त्यांच्याशी कधी गप्पा कधी मुलांना बाहेर घेऊन जाणे, कधी त्यांच्या अभ्यासात मदत करणे, कधी त्यांच्या आवडीच्या वस्तू आणून देणे, तीन के हवे काय नको त्याकडे लक्ष ठेवणे याकडे जास्त लक्ष देत होती. त्यामुळे मुलं खुश होती. मुलांना खुश बघून नाईकही खुश असायचे. त्यांच्याकडेही राणी तेवढेच लक्ष द्यायची. त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करायची. दोघनमध्ये प्रेमही वाढले होते. नाईक स्वतःच राणीला तिच्या कामात पण छोटी मोठी मदत करायचे. त्यामुळे दोघांमधली जवळीक अजूनच घट्ट झाली होती. नाईक कधी कधी राणी साठी मोगऱ्याचा गजरा आणायचे.  राणी तो गजरा मळून नाईकांच्या रम मध्ये जेव्हा जायची. वातावरण मोगरीच्या सुगंधाने धुंद व्हायचे. नाईकांचा कल ओळखून ती त्यांच्या मिठीत विसावायची. मग ती रात्र त्या दोघांची सम्पूर्ण सुखाची रात्र असायची. इतकं प्रेम इतका आनंद राणी साठी मात्र एक पर्वणी असायची. तिने अगोदर कधीच तो आनंद ते प्रेम तो सहवास अनुभवला नव्हता. ते तिच्यासाठी स्वर्ग सुखच होते.

       राणीचे आता आनंदाचे दिवस परत सुरू झाले होते. तिला आपल्या संसाराला आनंदी करायची जणू किल्लीच गवसली होती. मुलं पण आता तिच्या सोबत खूप आनंदी होते. त्यांना आता समज आली होती. राणी त्यांच्या साठी किती धडपडत असते हे ते बघत होते. तेही राणीला छोटी मोठी मदत करायचे. दुपारी एकटी असताना मात्र तिला बिलकुल करमत नसे. मग ती काहीतरी काम काढून त्यात आपले मन रमवायची तर कधी सरिता ताई कडे जाऊन यायची. कधी त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जायची. त्यामुळे सरीतालाही राणी बद्दल आपुलकी प्रेम वाटायचे. तिनेही राणीला आपली भावजय म्हणून स्वीकारले होते.

       आज राणी एकटीच घरात बसून आपले काम आटोपत होती. मुलं शाळेला गेली होती. नाईक ऑफिसला गेले होते. अचानक दार वाजले तिने कोण म्हणून दार उघडले . तर समोर तिच्या  जुन्या घरापुढे राहणारे गृहस्थ उभे होते. क्षणभर राणीला काही सुचलेच नाही. ती आपले जुने आयुष्य पूर्णतः विसरली होती. आता तिला कुणाचीच आठवण येत नव्हती. आई तिच्या दुःखातून मुक्त झाली होती. बाप कुठे गेला ते कळलेच नव्हते. आणि आज अचानक ते गृहस्थ दारा पुढे बघून तिच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या . शेवटी ते गृहस्थच बोलले. राणी कशी आहेस . ठीक आहेस ना बेटा. मी सहजच इकडन जात होतो तर तुझी आठवण आली. तुला बघावसं   वाटलं. म्हणून आलो बघ. तुला एक निरोप पण द्यायचा होता. त्यांना राणीला तो निरोप देऊ की नको असे होत होते. मग तीच म्हणाली अहो काका सांगा ना काय निरोप आहे. कुणाचा निरोप आहे. काही झालं का सांगा ना. राणीची उत्सुकता वाढली होती. सोबत काळजी ही वाढली होती. ते गृहस्थ भानावर येत म्हणाले. राणी अग तुझा बाप, तो आजारी आहे. झोपडीत आता एकटाच पडून असतो. चार पाच दिवसच झाले तो आल्याला. मध्ये कुठे होता, कसा होता काहीच सांगत नाही. खूप आजारी आहे. शेवटच्या घटका मोजत आहे. फक्त तुझे नाव तेवढे घेतो. काही खात नाही पिट नाही. आम्हीच त्याला बघतो. आता त्याला कोण दवाखान्यात नेणार. बघ तुला जमलं तर तू जाऊन भेटून ये त्याला. कदाचित तुझ्या भेटीने त्याला मुक्ती मिळेल. बघ बेटा तो तुझा बाप होता. कसाही असेना पण बाप तर होता ना. एकदा भेट त्याला. आणि मुक्त कर या जीवनातून. आणि ते गृहस्थ निघून गेले.

        राणीला काय करावे काहीच सुचत नव्हते. तिच्या डोळ्यांना मात्र अविरत धारा लागल्या होत्या. शेवटी धीर एकवटून तिने आपला तोल सांभाळला. तिने नाईकांना घरी बोलवून घेतले. आणि त्या गृहस्थाने सांगितलेले सगळे नाईकांना सांगितले. नाईकही ते ऐकून व्यथित झाले. त्यानी ताबतोब राणीला सोबत घेतले आणि राणीच्या त्या झोपडीकडे दोघेही निघाले. झोपडीची बरीच तूट फूट झाली होती. दार उघडेच होते. आत राणीचा बाप पडून होता. त्याची हालत खूपच खराब दिसत होती. पोट पाठीला लागले होते. हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. चेहरा सुकून गेला होता. डोळे खोल गेले होते. तो डोळे मिटून पडून होता. जोरजोरात श्वास सुरू होते तोंडातून काही अस्पष्ट पुटपुटत होता. राणीने त्याला आवाज दिला बा बा पण त्याने बघितलेच नाही तेव्हा राणीने त्याला हलवून जागे केले. त्याने हळूच डोळे उघडले. आणि पुटपुटला राणी. राणी म्हणाला होय बा मी राणी आहे, बघ ना माझ्याकडे. मी आली आता, तू नक्की बरा होशील रे. राणीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तशी त्याच्या चेऱ्यावर समाधानाची लकीर उमटली. त्याने कसा बसा आपला हात उचलून राणीचा हात आपल्या हातात घेतला. आणि मुखाने उद्गारला बाई सुखी राहा. श्वास थांबले होते. चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसत होती. राणीच्या डोळ्यातून आसवे गळत होती.

        नाईकांनी अंतसंस्काराची पूर्ण तयारी करून अंत संस्कार आटोपले. आणि दोघेही घरी परतले.राणीला आपल्या बालपणासुनचे सम्पूर्ण चित्र दिसत होते. तिचे अश्रू थांबत नव्हते. आयुष्यभर कधीच लक्ष न देणारा बाप मरतेवेळी मात्र भरभरून आशीर्वाद देऊन गेला होता. त्याने तिच्या मांडीवर डोके ठेऊन आपले प्राण सोडले होते.
Sanjay R.


गुलाबजाम - राणी भाग सात

     जसजसे दिवस जात होते राणी बद्दलची मुलांच्या मनात धुसफूस वाढतच होती. राणी आपल्या परीने मुलांना खुश करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती पण त्यात ती असफलच होत होती. आज सकाळचीच गोष्ट बघा. मीतू ला आज शाळेला एक तास अगोदर जायचे होते पण त्याची कल्पना तिने राणीला दिलीच नाही. ती राणीला सांगायला विसरली. मग मात्र वेळेवर तिची खूप घाई झाली. राणीला पूर्व कल्पना नसल्याने ती आपल्या नेहमीच्या गतीने घरातली कामे करत राहिली. मीतूचा टिफिन, युनिफॉर्म प्रेस करणे, शूज पोलिश सगळेच व्हायचे होते. वेळ झाला असल्याने मीतू मग चीड चीड करायला लागली. ती राणीला म्हणाली बघ आई आता मला तुझ्यामुळेच वेळ होत आहे, माझा टिफिन, स्कुल बॅग, युनिफॉर्म, शूज तू काहीच तयार करून ठेवलं नाहीस. टीचर  उशीर होण्याचं कारण विचारतील तर मी तुझंच नाव सांगणार. तूच मला तयार केलं नाहीस. आता लेट तर नक्कीच होणार. तू नेहमी अशीच करते. आमच्याकडे लक्षच देत नाहीस. नेहमी आपलीच कामं करत असतेस.  आम्हाला मुळीच मदत करत नाही. तुझ्यामुळे आमचं नुकसान होत आहे. पप्पा बघा ना आता मला किती वेळ होणार, आज टीचारनी एक्स्ट्रा क्लास साठी एक तास अगोदर बोलवले, पण आईने माझे अजून काहीच करून दिले नाही. मी आता आईमुळेच लेट होणार. सांगा ना तिला काही. ती आमचे काहीच ऐकत नाही.


     मीतूचे बोलणे ऐकून नाईकांच्या मनातही राणी बद्दल थोडा रोष निर्माण झाला. मात्र तिकडे राणीची सारखी धावपळ सुरू होती. तिची ती धावपळ बघून ते शांतच राहिले. राणीने मीतूचा युनिफॉर्म प्रेस केला. तिची स्कुल बॅग रेडी केली. आणि तिला स्कुल साठी तयार करायला लागली. त्यात तिचा टिफिन भरायचा राहिला. तशी ती मितूला म्हणाली . मीतू बेटा तू सावकाश स्कुल मध्ये जा. मी तुझा टिफिन नितु जवळ देते. स्कुल मध्ये तो आणून देईल तुला. जा आता लवकर जा स्कुल मध्ये , तुला वेळ व्हायला नको. पण अगोदरच चिडचिड करणारी मीतू अजूनच चिडली. काही नको मला टिफिन आज मी उपाशीच राहणार. तू टिफिन नितु जवळ पाठवूच नको. तुला बरंच आहे ना मी नाही जेवली तर. राणी नितुच्या बोलण्याने खूप नर्व्हस झाली. तिच्या डोळ्यात आसवे आली . तिने ते हळूच आपल्या पदराने पुसले आणि ती आपल्या कामाला लागली. तिला आता नाईकांची तयारी करायची होती. ती त्या तयारीला लागली. नाईक ऑफिसला निघून  गेले मागोमाग नितुही स्कुलला जाय साठी तयार झाला. तिने मीतूचा टिफिन नितु कडे दिला पण नीतूही मीतूचा टिफिन घेऊन जायला तयार नव्हता. तो म्हणाला , आई तू तिला टिफिन नाही दिला ना, मग मी कशाला नेऊ. आता तूच तिला नेऊन दे. मी टिफिन नेणार नाही. राणीने नितुला समजवायचा खूप प्रयत्न केला पण नितु ऐकायलाच तयार नव्हता. आणि तो तसाच स्कुल ला निघून गेला. राणीला मात्र आता रडणे आवरले नाही. तिच्या डोळ्यातून सर सर आसवे गळत होती.


      सगळी कामं तिने भराभर आटोपून घेतली आणि मग मीतूचा टिफिन घेऊन ती स्कुल ला जायला निघाली. वाटेतच तिला सरिता भेटली. सरिता नाईकांची बहीण. ती काही काम निमित्त बाहेर निघाली होती. राणी ला बघून तीच थांबली. तिनेच राणीला आवाज दिला. राणीचे सरीताकडे बिलकुल लक्ष नव्हते. ती आपल्याच विचारात घाई घाईने स्कुल कडे निघाली होती. सारिताचा आवाज ऐकून राणी थांबली आणि सारिताच्या जवळ पोचली. सारिताने तिला विचारले, काय ग राणी इतक्या घाई घाई ने कुठे निघालीस. घरी सगळे ठीक आहेत ना. कुणाला बरं नाही का. आणि कुठल्या विचारात आहेस तू. राणी फक्त सरिता कडे बघतच राहिली. तिला काय बोलावे तेच कळेना . तशी सरिता म्हणाली अगं तुलाच विचारतेय. काय झालं , तुला बरं नाही का. तू ठीक आहेस ना. तसे राणीच्या डोळ्यातून आसवं टपटप गळायला लागली. सरिता राणीच्या डोळ्यात आसवं बघून अजूनच घाबरली. अगं काय झालं सांग ना. तशी राणी बोलली ताई अहो आज मीतू  टिफिन न घेताच स्कुलला गेली. माझंच वेळेवर झालं नाही चूक झाली माझी. तिला मी टिफिन पोचवून येते. त्यासाठी निघाली होती. तशी सरिता बोलली,  ते ठीक आहे ग पण तू रडत का आहेस. दादा काही बोलला का तुला. तू टेन्शन नको घेऊस, मी सांगते दादाला .  तो असाच आहे. काही न समजून घेताच काहीही अर्थ लावून घेतो. मी समजवते दादाला. चल मी येऊ का तुझ्या सोबत. मला काही जास्त काम नाही. लवकर होईल माझे काम  वेळाने गेले तरी चालेल. चल मी  येते तुझ्या सोबत. म्हणून सारिताही तिच्या सोबत स्कुल कडे निघाली.


      दोघीही स्कुल मध्ये पोचल्या. त्या नितुच्या क्लास मध्ये पोचल्या. क्लास सुरू होता. राणीने टिचरला मीतूचा टिफिन आणल्याचे सांगितले. तसे टीचारनी मितूला बोलवून तिला तिचा टिफिन घेण्यास सांगितले. मीतू जवळ येताच राणीने मितूच्या डोक्यावरून हात फिरवला  आणि तिच्या हातात टिफिन देत म्हणाली मीतू बेटा , जेवण करून घेशील. छान हं  माझं बाळ . जा बस आता क्लास मध्ये. मी निघते. सारितानेही मीतूची पप्पी घेतली . मीतू क्लास मध्ये जाताच दोघीही परत निघाल्या . वाटेतच सारिताने आपले काम आटोपले. राणीने सरीताला घरी चलण्याचा आग्रह केला. मग दोघीही नाईकांच्या घरी आल्या. राणीने सरिता साठी चहा ठेवला. दोघीनीही आपला चहा संपवला. सारिताच्या मनात अजूनही प्रश्न कायम होता. राणी का रडत होती.  सारिताने राणीला परत विचारले काय गं मघाशी तू रडत का होतीस. मला काही सांगशील का.  तसे राणी परत रडायला लागली. तिने आपल्या मनात होणारी ओढाताण सरिता जवळ व्यक्त केली. मुलांची तिच्यावर होणारी चिडचिड , घरच्या कामात तिची होणारी ओढाताण सांगितली. सारिताने राणीला समजावले. अगं घरात हे चालतच असते. सगळं मॅनेज करावे लागते. हळूहळू जमेल तुला. आता मुलं मोठी होत आहेत. कळेल त्यानाही तू त्यांच्यासाठी किती धावपळ सहन करतेस ते. प्रेम द्यायचे प्रेम घ्यायचे हा नियमच आहे. तसही तू छान सांभाळलं आहेस सगळं. मुलांना आनंद कशात होतो ते शोधायचं. त्यांना आनंदी ठेवायचं. ते खुश असलेत की सगळे खुश असतील. तू टेन्शन नाही घ्यायचं. राणीला काही संसारतल्या टिप्स देऊन सरिता निघून गेली.


       राणीने दुपारचे आपले सगळे काम आटोपले. आज स्कुल मधून मुलांना खुश करायचेच त्यांना आनंदी करायचे असे तिने ठरवले. त्यासाठी काय करावे. राणीला काहीच सुचत नव्हते. तेव्हा राणीला आठवले की नितु मीतू बरेच दिवसापासून राणीला गुलाब जाम करायला सांगत होते. त्यांना गुलाब जाम खूप आवडायचे. तीने पक्के केले आज गुलाबजाम करायचे. राणी ताबडतोब उठून तयार झाली आणि गुलाबजाम साठी खवा घेऊन आली मुलं घरी यायच्या आधीच तिने गुलाबजाम करून ठेवले.  सायंकाळी मुलं येताच ती फ्रेश होऊन आपल्या रूम मध्ये गेली. राणीने मुलांसाठी डिश मध्ये गुलाब जाम काढले आणि ती मुलांना बोलवायला त्यांच्या रुम मध्ये गेली. नितु मीतू  चला डायनिंग टेबल वर चला आज मी न तुमच्यासाठी एक स्पेशल डिश बनवली आहे. चला चला. चला पटकन आणि बघा काय आहे ते. मुलं डायनिंग टेबलवर आली. गुलाब जाम बघून तर दोघेही नाचायलाच लागली. तेवढ्यात नाईकही घरी आले. राणीने त्यांच्यासाठी पण डिश तयार केली. नाईक मुलांना खुश बघून स्वतःही खुश झाले होते. सगळ्यांनाच गुलाब जाम खूप आवडले होते.

Sanjay R.


Thursday, September 23, 2021

" हरवला कुठे तो शब्द "

तो एकच शब्द
देतो मदतीचा हात ।
मनास मग वाटे
जन्मोजन्मीची साथ ।
देतो दुःख झुगारून
होई सुखाची बरसात ।
आनंद मावेना मग
येतो फिरून गगनात ।
प्रकाशाचा एकच किरण
सरते अंधारी रात ।
झगमगते जीवन
होते आनंदाची प्रभात ।
हरवला कुठे तो शब्द
शोधू कुठे मी ती साथ ।
शब्दांचेच मायाजाळ
शब्दानाही हवा हात ।

Sanjay R.




Wednesday, September 22, 2021

नाईलाज - राणी भाग सहा

      नाईक आता आजरातून बरे झाले होते. ते आपल्या नेहमीच्या कामात लागले होते. रोज ऑफिसला जाणे घरातील, बाहेरील साऱ्या जवाबदाऱ्या पार पाडणे यात मग्न झाले होते. सगळेच व्यवस्थित सुरू होते. राणी वरही आता त्यांचे प्रेम जडले होते. राणीही त्यांच्यावर खूप प्रेम करायला लागली होती. नाईक घरात असे तोवर ती सारखी त्यांच्या मागे पुढे राहून नाईकांना खुश ठेवण्या साठी जेही करावे लागायचे ते सगळं अगदी आनंदाने खुशीने करायची. तिला तर आता नाईक ऑफिसला गेल्या नंतर सगळी कामं आटोपून नाईकांच्या आठवणी काढण्यात आनंद वाटायला लागला होता. नाईकांची परतीची वेळ झाली की ती अस्वस्थ व्हायची. सारखी नाईकांची वाट बघायची. नाईक घरी पोचे तोवर तिच्या कितीतरी चकरा अंगणात व्हायच्या. नाईक दारात दिसताच ती आनंदी व्हायची. ते येताच ती त्यांच्यासाठी चहा घेऊन जायची. चहा पिणे होईतोवर त्यांच्याकडेच बघत बसायची. सतत काही ना काही तरी बोलत रहायची. नाईकही तिच्या वर खूप खुश होते. त्यानाही राणीचा सहवास खूप आवडायचा. तेही दिवसभराच्या त्यांच्या ऑफिसमधील गोष्टी तिच्या सोबत शेअर करायचे. रात्री जेवण आटोपल्यावर मुलं झोपी गेल्यानंतर ती नाईकांच्या रुम मध्ये जाऊन नाईकांशी गप्पा गोष्टी करत नाईकांचे हात पाय, डोके दाबून द्यायची. विविध विषयांवर त्यांची चर्चा चालायची.  राणी आता सम्पूर्णतः नाईकांची अर्धांगिनी झाली होती.  दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटायचा. राणी नाईकांच्या कुशीतच मग झोपून जायची.

      असेच दिवस जात होते. दोघांमधले प्रेम दिवसागणिक अजूनच फुलत फळत होते. मुलंही आता मोठी होत होती. मात्र दोघांच्या या जवळीकीमुळे मुलांना आपली आई आपल्या पासून दूर जात आहे असे वाटायचे. कारण नाईक ऑफिसमधून घरी आल्यानंतर राणीचा जास्त वेळ नाईकांसोबत जायचा. तशात मग मुलं थोडी चीड चीड करायचे.सारखं तिला बोलवून बोलवून काही न काही सांगून आपल्या जवळ गुंतवून ठेवायचा प्रयत्न करायचे. पण तेव्हाच मग नाईकही तिला आवाज देऊन स्वतःकडे बोलवून घ्यायचे. तिला इकडे बघू की तिकडे बघू असे होऊन जायचे. ती मुलांचं मन जपायचा खूप प्रयत्न करायची. पण तिला नाईकांना टाळणेही जमत नसे. अशात तीच स्वतःची ओढाताण करून घेत होती. नाईक घरी नसतानाचा सम्पूर्ण वेळ ती मुलांना द्यायची पण नाईक घरी असले की पूर्ण वेळ मुलांना देणे तिला कठीण व्हायचे.

      असेच एक दिवस नितुला त्याचे शाळेतून होमवर्क मिळाले पण त्यासाठी लागणारे पूर्ण साहित्य आणायचे कामाच्या गराड्यात राहून गेले होते. आज तिने घरातले जास्तीचे काम काढले होते. ते करता करताच सगळा वेळ निघून गेला होता. बाजरात जाणे तिला शक्यच झाले नाही. त्यामुळे नितु सारखा चीड चीड करत होता. नाईकांची ऑफिस मधून यायची वेळ झाली होती. पण नितुची चीड चीड बघून राणीने सगळ्या लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट करून ती बाजारात गेली. सगळ्या वस्तू तिने खरेदी केल्या आणि घरी परत निघाली. पण येता येता तिला बराच वेळ लागला. नाईक ऑफिसमधून घरी पोचले होते. पण आज रोजप्रमाणे त्यांना राणी घरात दिसली नाही. आज चहा ही मिळाला नाही. ऑफिसमध्येही कामात काही चुका झाल्यामुळे साहेबांशी त्यांचा खटका उडाला होता. त्यामुळे त्यांचे मन अशांत होते. घरात राणीला न पाहून ते जास्तच अशांत झाले.

      राणीलाही परत यायला बराच वेळ लागत होता तशी त्यांचीही चीड चीड व्हायला लागली.
बाजारातून घरी येताच नितु राणी वर जणू ओरडलाच, आई तू आता हे सामान आणून दिलंस आता मी होमवर्क केव्हा करणार. रात्रभर मला आता करत बसावे लागेल. तशी राणी म्हणाली, रागावू नको राजा, होईल सगळं अगदी व्यवस्थित, तू काळजी करू नकोस. मी करते ना तुला मदत. चल आपण दोघे मिळून करू या. पण नितुचा राग मात्र शांत होईना. तशातच ती नितु सोबत त्याला मदत करत राहिली. वेळ फार झाला होता. स्वयंपक ही अजून व्हायचा होता. आज नाईकांकडे बघायला सुद्धा तिला वेळ मिळाला नव्हता. नाईकांना चहा पण देता आला नव्हता. नाईकही चीड चीड करत होते . सारखा तिला आवाज देऊन तिला बोलवत होते. सगळं केल्या शिवाय तिला जाणे जमलेच नाही. आता दहा वाजायला आले होते. तिने स्वयंपाक आटोपून ताट केले आणि मुलांना व नाईकांना जेवायला बोलवले, तर मीतू झोपी गेली होती. राणीने तिला जागे करून जेवणाच्या टेबलवर बसवले. त्यामुळे तीही चिडत होती. राणी सगळ्यांची चीड चीड बघून आणखीच थकून गेली होती. तिला सगळ्यांना कसे खुश करावे काहीच कळत नव्हते.

      जेवण आटोपून सगळे आपापल्या रुम मध्ये गेले. राणीने ताट उचलून सिंक मध्ये नेऊन ठेवले सगळं साफ सुफ करून ती नितु च्या रुम मध्ये गेली. त्याचे होमवर्क आटोपले होते. आणि तो झोपायच्या तयारीत होता. राणीला बघून तो ओरडलाच बघ तुझ्या मूळे मला किती लेट झालं. माझं होमवर्क नसत झालं तर टीचरनी मला पनिश केले असते. राणीने त्याला थोपटण्याचा प्रयत्न केला पण नितुने तिचा हात ढकलून दिला. आणि म्हणाला जा तू आता मीच झोपतो. राणीने त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला पण सारेच निश्फळ झाले. तिला खूप वाईट वाटत होते. पण काहीच इलाज नव्हता. तशी ती मीतू कडे वळली तर तीही झोपी गेली होती.  लाईट बंद करून दुःखी मनाने ती नाईकांच्या रुम मध्ये आली. तर नाईकही झोपी गेले होते. सगळेच आज तिच्यावर नाराज होते. सगळ्यांना खुश करण्याचा तिने पूर्ण प्रयत्न केला पण आजच्या घटनेला तिचा नाईलाज होता. तीही या सगळया मुळे थकून गेली होती. ती तशीच मग लाईट बंद करून नाईकांच्या शेजारी झोपी गेली. आज कितीतरी दिवसानंतर नाईकांनी तिला आपल्या कुशीत जवळ घेतले नव्हते.
Sanjay R.


आजार - राणी भाग पाच

     दिवसामागून दिवस जात होते. आता नाईक आणि राणी मध्ये संवाद सुरू झाला होता. नाईकांना राणी आणि राणीला नाईक आवडायला लागले होते. नाईक वेळ मिळेल तसे राणीला घेऊन बाहेर कुठेतरी फिरूनही यायचे. दोघनमध्ये प्रेम जिव्हाळा हळू हळू वाढत होता. नाईकांची आवड निवड आता राणीलाही कळायला लागली होती. त्यांना जे जे आवडते ती तसे करायची. तिलाही त्यात आनंद मिळायचा. मुलांसोबत ती नाईकांना ही खुप जपत होती. नाईकही राणीला हवे नको सारे करायचा प्रयत्न करायचे. नाईकांचा संसार आता फुलायला लागला होता. घरात नेहमी आनंद उत्साह असायचा.

     अचानक एक दिवस नाईकांची तब्येत बिघडली. अंगात थंडी वाजून ताप भरला. तशी राणीला खूप काळजी वाटायला लागली. लागलीच तिने डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि नाईकांना घेऊन ती डॉक्टरांकडे पोचली. डॉक्टरांनी चेक करून काळजी चे कारण नाही , व्हायरल फिवर असल्याचे सांगितले, पण तीन दिवस काढावे लागतील असे सांगितले. काही औषधे त्यांनी लिहून दिले. राणीने परत येता येताच ती औषधे घेतली आणि ते घरी आले. नाईकांना बेड वर झोपवून ती कामाला लागली. नाईकांसाठी तिने सोजी आणि वरणाचे पाणी काढले. आणि ती नाईकांच्या रुम मध्ये गेली. नाईक शांत पणे झोपले होते. ती तिथेच नाईकांकडे पहात बसून राहिली. थोड्या वेळात नाईक जागे झाले. तसे राणीने त्यांना थोडे खाऊन घेण्यासाठी विनवले. नाईकांना खाण्याची इच्छाच होत नव्हती पण राणीच्या आग्रहाखातर त्यांनी थोडी सोजी आणि वरण घेतले. नंतर राणीने त्यांना औषधे दिली. आणि ती नाईकांच्या शेजारी बसून राहिली. नाईकांनी राणी चा हात घेऊन तो आपल्या कपाळावर ठेवला. तसे राणी समजली की नाईकांचे डोके दुखत आहे, तिने ते दाबायला सुरवात केली. आता नाईकांनाही बरे वाटत होते. राणीने नाईकांचे कपाळ, डोके, हात पाय. दाबून दिले, तसे नाईकांना बरे वाटायला लागले. ते सारखे राणीकडे टक लावून बघत होते. राणी मात्र मन लावून नाईकांची सेवा करण्यात मग्न होती. तिच्या चेहऱ्यावर नाईकांची काळजी पूर्ण पणे दिसत होती. नाईकांना तिची ती सेवा घेण्यात खूप समाधान वाटत होते. त्यांनी मग हळूच राणीचा हात आपल्या जवळ घेतला . आणि तिच्या हातरुन ते आपला हात कितीतरी वेळ फिरवत राहिले. राणीलाही त्यात खूप समाधान मिळत होते. आज पहिल्यांदाच दोघे इतक्या जवळ येक दुसऱ्याचे हात हातात घेऊन  नजरेत नजर टाकून बघत होते.  दोघनच्याही चेहऱ्यावरून प्रेम भाव व्यक्त होत होता.

     आता सायंकाळ होत आली होती. तशी राणी आपल्या कामात लागली. मुलंही खेळण्यात मग्न झाली होती. राणीने आपला स्वयंपाक आटोपला. आणि परत ती नाईकांच्या जवळ जाऊन बसून राहिली. सायंकाळचे आठ वाजायला आले तसे राणीने मुलांना जेवायला वाढून दिले आणि नाईकांसाठी गरम गरम खिचडी घेऊन गेली. नाईकांना आता बराच आराम वाटत होता. राणीनेच नाईकांना चमच्या चमच्याने नाईकांना खिचडी भरवली. त्यांना पाणी देऊन ती मुलांकडे आली. मुलांचे जेवण आटोपले होते. तिने मग स्वतःसाठी वाढून घेतले आणि जेवण करून सगळी ठेव रेव करून मुलांचे बिछाने व्यवस्थित केले. मुलं ही आता झोपायच्या तयारीला लागले होते. थोडा वेळ ती मुलांच्या रुम मधेच बसून मुलांना थोपटत राहिली.  मुलं आता झोपी गेले होती. तशी ती  परत नाईकांच्या रुम मध्ये आली. नाईक तिला बघून हळूच हसले. तिने नाईकांचे औषध काढून नाईकांना त्यांच्या हातात दिले. आणि त्यांच्या साठी पाणी घेऊन आली. नाईकांनी औषध घेतले. आता त्यांना खूप बरे वाटत होते. तापही उतरला होता. त्यांना चांगले पाहुन राणीलाही बरे वाटत होते. नाईकांनीच तिला आपल्या बाजूला कॉटवर बसवून घेतले. राणी नाईकांकडे बघत बसून राहिली. मग नाईकांनीच तिचा हात आपल्या हातात घेऊन त्यावरून आपला हात फिरवत राहिले. त्यातच राणीचा  साडीचा पदर थोडा खाली गेला. ते राणीच्या लक्षात आले नाही. नाईकांच्या मात्र ते लक्षात आले. राणी आता खूप सुंदर दिसत होती. तिच्या शरीराची ठेवणही तिच्या रुपाला अजून खुलवत होती. नाईक आज पहिल्यांदाच राणीला इतकं जवळ घेऊन  तिचे रूप न्याहाळत होते. राणी खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत होती. तिच्या साडीचा रंग तिचे सौंदर्य अजूनच खुलवत होता. नाईकांनी राणीला आपल्या अजून जवळ घेतले. आणि त्यांचा स्वतः वरचा ताबाच सुटला. नाईकांनी हळूच तिला आपल्या मिठीत घेतले. त्यांचे ओठ राणीच्या ओठावर टेकले. तशी त्यांची मिठी अजूनच घट्ट झाली. राणी नाईकांच्या प्रत्येक कृत्याला नकार देऊच शकली नाही. दोघांमध्ये आज प्रथमच स्पर्शाची देवाण घेवाण होत होती. नाईक आणि राणी सर्वस्वाने एक झाले होते. नाईकांच्या मिठीत ती केव्हा झोपी गेली ते तिलाही कळले नाही.

सकाळ झाली होती. पक्षांची किलबिल सुरू होती. तशातच राणीला जाग आली. ती अजूनही नाईकांच्या मिठीतच होती. आणि त्याच स्थितीत दोघेही झोपी गेले होते. ती मिठी अजूनही सैल झाली नव्हती. राणीने हळूच नाईकांच्या मिठीतुन स्वतःला सोडवून घेतले. नाईकांना ती बराच वेळ त्याच अवस्थेत निरखत राहिली. तिने हळूच त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले.  मग हलकेच तिने नाईकांच्या अंगावर पांघरूण घातले. पांघरून वयवस्थित करून मग उठून तिने आपली साडी व्यवस्थित करून घेतली आणि आंघोळीला गेली. आज प्रथमच नाईकांनी राणीला सर्वस्वाने स्वीकार केले होते. राणीही पूर्णपणे नाईकांची झाली होती.  दोघांच्या मधे असलेला पडदा पूर्णपणे दूर झाला होता. ती खुशी तो आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. तिचा उत्साह द्विगुणित झाला होता.

संजय रोंघे


" प्रश्नोत्तर "

कधी प्रश्नाला प्रश्न
नसे उत्तर तयास ।
उत्तरासाठी चाले
किती किती ते प्रयास ।

असो प्रश्न कसाही
मनात उत्तराचा ध्यास ।
प्रश्नच कधी वाटे
करेल का विनाश ।

शोधतो उत्तर जेव्हा
वाटे प्रश्नच आकाश ।
उत्तरात मिळे कधी
जीवनाचा सारांश ।
Sanjay R.

Tuesday, September 21, 2021

" नकळत घडले सारे "

नकळत घडले सारे
अचानक आले वारे ।
कोसळले का आकाश
गेलीत वाहून घरे ।
ना उरला माणूस
ना उरले गुरे ढोरे ।
होत्याचे झाले नव्हते
कोपला का असा रे ।
सांगू कुणास आता
मन मनास विचारे ।
Sanjay R.

Monday, September 20, 2021

" असा कसा रे तू पावसा "

असा कसा रे तू पावसा
नेमका वेळेवर तू आलास ।
भर रस्त्यात मला रे
चिंब भजवून तू गेलास ।

वाट बघतात तुझी जिथे
तिथून तू निघून आलास ।
भिजव थोडी शेती बागा
तिथेच करतो कशाला मिजास ।

गरीब बिचारा तो शेतकरी
अश्रूही नाही त्याच्या डोळ्यास ।
जास्त कधी कमी कधी
नाही उतरत तू भरवश्यास ।

पड जरा जाऊन तिकडे
दाखवू नकोस नुसते आभास ।
तुझ्याविना जीवन व्यर्थ
करतात सारेच तुझा ध्यास ।
Sanjay R.


" नाचे मोर मनात "



नाचे मोर मनात
हर्ष उठे तनात ।
उल्हास होई जागा
आनंद गगनात ।
सोडून दुःख आता
हसायचे क्षणात ।
सुख दुःख येतीजाती
हवे काय जीवनात ।
Sanjay R.

Saturday, September 18, 2021

" काय बोलायचं "

बोलायला नको विषय
हवे नको ते बोलायचे ।
गुपित मनातले सारेच
उघड करून सोडायचे ।
वाणी तारी वाणीच मारी
नाही कुणाला कशाचे ।
शब्दच करी कधी अनर्थ
मात्र मग चूप बसायचे ।
Sanjay R.

Friday, September 17, 2021

" ज्योत जळते दारात "

उठले वादळ मनात
विखुरले स्वप्न क्षणात ।
आता शोधू कुठे विसावा
झालो परका का जनात ।

वाहतो एकटाच मी ओझे
नाही उरले त्राण उरात ।
वाटही दूर किती अजून
वाटे वहात चाललो पुरात ।

मंद मंद झालेत श्वास
प्राण कंठाशी आले सुरात ।
उलटून देह हा पडला
आता ज्योत जळते दारात ।
Sanjay R.

Thursday, September 16, 2021

" चहा कॉफी कामाची "

चहा कॉफी किती कामाची
किमतीला कमी दामाची ।
थकला असो वा भागला
बुटी जणू किती कामाची ।

मैत्री असो वा नाते असो
घट्ट मिठी तिच्या स्वादाची ।
आठवण येता हवीच वाटे
दुनिया सारी तिच्या नादाची ।

वेळ असो वा नसो कुणाला
देई फुरसत काही क्षणाची ।
गोडवा तर इतका तिचा
मिटवते दरी दोन मनाची ।
Sanjay R.



Wednesday, September 15, 2021

" किरण एक आशेचा "

नको ते विपरीत सारे
का हे असे घडते ।
सांभाळायचे  मन कसे
जाऊन तिथेच जडते ।

आठवणींचा डोंगर विशाल
करू किती मी पालथा ।
त्राणच उरले नाहीत
एकट्याने येईल का चालता ।

क्षणनी क्षण अवघड  किती
डोळे असतात वाटेवर ।
थांबत नाही एक थेंब
जणू लाटच येते गालावर ।

हुंदकाही कुठे आवरतो
आवेग दुःखाचा सोसेना ।
तुझ्याविना जगू कसे
काहीच मजला सुचेना ।

ये परत तू सोडून सारे
नको विचार कशाचा ।
रोज बघतो सूर्य नवा
हवा किरण एक आशेचा ।
Sanjay R.


Tuesday, September 14, 2021

" काळा कुट्ट अंधार "

गर्द काळा कुट्ट अंधार
अवजड आयुष्याचा भार ।

मनात असंख्य विचार 
कठीण जीवनाचा पार ।

शोधतो घडीभर आधार 
तोही मिळेना मी लाचार ।
Sanjay R.


Monday, September 13, 2021

" दिसे मृगजळ जेथे "

ही वाट कुठे जाते
दिसे मृगजळ जेथे ।
अविरत सावरे भार
पडते पाऊल तेथे ।
वाटे पहुडली निश्चिन्त
ताप उन्हाचा सोसते ।

कोसळतो पाऊस जेव्हा
पाण्यासही वाट देते  ।
रात्रीलाही असते तत्पर
हवे तिथे ती घेऊन जाते ।

जंगल दरी वा असो खोरे
जाई पुढेच कधी न सरते ।
धोंडे दगड येई मधेच
तरी कधीही ती न हरते ।
Sanjay र.

Sunday, September 12, 2021

" कसे असते हे प्रेम "

सांगेल का कोणी मला
कसे असते हे प्रेम ।
एकदा जुळले की मग
कशाचाच नसतो नेम ।

सुचेना काही कशाचे
घेईतसे मन सदा धाव ।
हवे हवे वाटे  सारेच
मनि फक्त प्रेमाची हाव ।

तहान भूकही हरते सारी
विचार फक्त असतो एक ।
प्रेमासाठी काहीही करेल
चाले मनात तोच आलेख ।
Sanjay R.

Saturday, September 11, 2021

" पिकनिक " - राणी भाग चार

आज नाईकांना यायला थोडा उशीरच झाला. सोबत ते भाजी किराणा घेऊन आले होते. राणी दारात बसून नाईकांचीच वाट बघत होती. नाईकांना बघून ती पुढे झाली नाईकांनी तिच्या हातात भाजी ची पिशवी दिली आणि त्यांनी किराण्याची पिशवी स्वतः घेऊन ते घरात आले. राणीने भाजी किराणा व्यवस्थित भरून ठेवला. आज नाईक थोडे उत्साहात दिसत होते. राणीची आणि त्यांची नजरानजर झाली. नि राणीला कळले की नाईकांना काहीतरी सांगायचे आहे. अजूनही त्या दोघांमध्ये फारसा संवाद होत नव्हता. नाईक राणी पासून थोडे दूर दूरच राहायचे. राणीनेही कधी नाईकांच्या जवळ जाण्याचा कधी प्रयत्नही केला नव्हता . मात्र ती मुलांमध्ये खूप मिक्स झाली होती. मुले नसली की तिला करमत नसे. तिला एकटे एकटे वाटायचे. मात्र मुलं घरात असली की ती खूप आनंदी असायची. मुलं सारखी आई हे दे , आई ते दे असे काही तरी चालू असायचे. त्यात राणी नेहमीच व्यस्त असायची. तिला त्यात खूप आनंद मिळायचा.  मुलं अभ्यासात असली की राणीही त्यांच्या रूममध्ये जाऊन बसायची. मुलांचेच पुस्तक घेऊन वाचत बसायची. मग कधी मुलांना अडचण आली की त्यांना ते समजावून सांगायची. हळू हळू राणीचेही ज्ञान वाढत होते. एकदा नजीकच तिला म्हणाले तुला पण शिकायची इच्छा असेल तर आपण तुझी ऍडमिशन मुक्त विद्यापीठाला करू शकू. पण तुला अगोदर दहावी आणि बारावीची परीक्षा द्यावी लागेल. तुला इच्छा असेल तर तसे सांग. राणीनेही ठरवले होते की परीक्षा द्यायची आणि जितके शिकता येईल तितके शिकायचे. नाईक या वेळी तिचा दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरणार होते. आणि सगळी पुस्तके पण राणीला आणून देनार होते. पण तिने ठरवले होते की आपल्यामुळे मुलांचे नुकसान मात्र होऊ द्यायचे नाही. तिने तशी तयारीही सुरू केली होती.  आता फक्त पुस्तकांची ती वाट बघत होती. 
आज नाईकांना काय सांगायचे असेल याचा राणी विचारच करत होती. तसे नाईक बोलले. यावेळी मला लागून तीन दिवस सुट्ट्या येत आहेत. मला वाटते आपण कुठे तरी पिकनिकला जावे. मुलांना पण थोडा चेंज होईल . आणि त्यांना आनंद वाटेल. मी करतो प्लान पक्का. तू बाकी काय काय लागेल त्याची तयारी कर. तसे जास्त काही लागणार नाही. जेवण राहणे आपण हॉटेललाच ठरवू. फक्त मध्ये मुलांना फराळ नास्ता आणि कपडे प्याकिंग एवढंच करावं लागेल. शुक्रवारी सकाळी आपण घरून निघायचे रविवारी सायंकाळ पर्यंत परत वापस यायचे. म्हणजे जास्त त्रासही होणार नाही. जवळचाच एखादा स्पॉट मी शोधतो. राणीलाही नाईकांचा पिकनिक चा बेत खूप आवडला. तिने ते मुलांना सांगितले. मुले तर खुपच खुश झाली. आजचा मंगळवार होता. म्हणजे दोन दिवस बाकी होते. तीही आनंदात तयारीला लागली. तिने थोडे फराळाचे तयार केले . मुलांचे  नाईकांचे आणि स्वतःचे कपडे , नाईट ड्रेस काढून प्याक केले. टॉवेल, सॉक्स, चपला, टूथ ब्रश, पेस्ट, तेल, कंगवा, आरसा, थोडी औषधं, सगळं बाजूला काढलं. ब्यागा भरून तयार झाल्या. पाण्याची वॉटर ब्याग आणि इतर सगळे समान आठवून आठवून काढले. 
शेवटी शुक्रवार ची पहाट उजाडली. सगळे पहाटेच अंघोळी करून तयार झाले. गाडीही दारापुढे हजर झाली. नाईकांनी चिखलदरा मेळघाट चा बेत आखला होता. हॉटेलचे बुकिंग पण झाले होते.  नागपूर पासून चखलदरा फार लांब नव्हते. पाच ते सहा तासात ते पोचणार होते. देवाची पूजा करून सगळे गाडीत बसले. आणि गाडी सुरू झाली. मुलं खूपच आनंदात होती. त्यांची सारखी टकळी सुरू होती. नितु म्हणत होता पप्पा आपल्याला तिकडे वाघ बघायला मिळेल का हो. तिकडे खूप दाट जंगल आहे ना. किती मजा येईल. तशी मीतू म्हणाली नाही पप्पा आपण जास्त आत जायचे नाही. वाघांनी आपल्याला पकडले तर. आपण गाडीच्या बाहेरच नाही निघायचे. गाडीतूनच सगळं बघू या. तसा नितु बोलला येहे घाबरट बाई , इतकं काय भ्यायचं. मी आहे ना सोबत. मी पकडलील वाघाला. आणि देईल हाकलून. मला बघून तो आपल्या जवळच येणार नाही.  अशीच मुलांची सारखी बडबड सुरू होती.
तशातच अमरावती आले. रस्त्यात एक धाबा बघून नाईकांनी गाडी थांबवली. त्यांनी राणी आणि स्वतः साठी चहा मागवला. राणीने मुलांना सोबत आणलेला नास्ता आणि फ्रुट दिले. सगळे खाणे पिणे करून परत गाडीत बसले. आणि गाडी पुढे निघाली. मध्ये जंगल, टेकड्या, छोटे छोटे गाव लागले. मुलांना खूप आनंद होत होता. 
मग मुलांनी गाडीतच अंताक्षरी सुरू केली. नितु आणि नाईक एका बाजूला आणि मीतू आणि राणी दुसऱ्या बाजूला झाले. नाईकांना खुप जुणे गाणे पाठ होते. तर राणी लाही काही गाणे येत होते. नाईकांचा आवाज जसा चांगला होता तसाच राणीचाही आवाज गोड होता. हसत खेळत गाडी पुढे जात होती. आता घाट सुरू झाला होता. तशी मुलं घाट दऱ्या आणि जंगल बघण्यात दंग झाली. 
मध्ये काही प्राणी पण दिसत होते. 
अशातच गाडी चिखलदऱ्याला पोचली. हॉटेल जवळच होते. तेही खूप मस्त लोकेशन ला होते. ते टेकडीच्या मध्ये असल्यासारखे वाटत होते. आजूबाजूला दाट जंगल होते.  दुपार असूनही खूप थंड वाटत होते.  सगळे  गाडीतून उतरले. नाईक हॉटेलमध्ये आत जाऊन रूम बुक असल्याची खात्री करून आले. मग सामान काढून रुम मध्ये गेले. रूम पण खूप छान सजवलेली होती . बाथ पण खूप स्वच्छ आणि सुंदर सजवलेला होता. 
नाईक रूम बघून खूप खुश झाले. रुम मधेच छोटासा फ्रीज होता. त्यात कोल्ड ड्रिंक आणि फ्रुटस, काही ड्राय फ्रुटस, चॉकलेट्स ठेवलेले होते. मुलं तर ते बघून खूपच खुश झाले. रूमच्या मागच्या बाजूने टेरेस होता. टेरेसमध्ये टेबल चेअर्स लावलेले होते. टेरेस मधून सुंदर टेकडी, पलीकडे झुळझुळ वाहणारी नदी आणि मोठमोठी झाडे दिसत होती. ते दृश्य फारच मनमोहक होते. रुम बघून सगळेच खूप खुश झाले होते. थोड्याच वेळात दरावर गॉड रिंग वाजली. दार उघडून बघितले तर दारात आकर्षक पोशाखात वेटर सर्व्हर ट्रॉली घेऊन उभा होता.  त्याने नाईकांना चहा,  कॉफी विचारली. नाईकांनी कॉफी सांगितली . वेटरने राणी आणि नाईकना कॉफी दिली. मुलांना दूध आणि बिस्कीट दिले. आणि जेवण केव्हा  घ्याल विचारून गेला. कॉफी दूध घेऊन सगळे फ्रेश झाले. थोड्याच वेळात जेवण आले.  टेरेस मध्ये टेबलवर सगळे जेवायला बसले. जेवण ही खूप टेस्टी होते. सगळे जेवण करून आरामात कॉट वर थोडे लोटले. सायंकाळी सनसेट पॉईंट बघायला जायचे होते. मुले ते सगळं बघून खूपच खुश झाले होते. सायंकाळी तयार होऊन सगळे सनसेट बघायला गेलं. ते दृश्य तर अप्रतिम सुंदर होते. नाईकांनी तिथे बरेच फोटोज आणि सेल्फी काढल्या. राणी नाईक आणि मूल यांचे ग्रुप फोटो दुसर्याकडून काढून घेतले. सगळेच खूप खुश होते. आता अंधार पडू लागला होता. सगळे परत हॉटेल ला जायला परत निघाले. मग थोडा मार्केट चा फेरफटका मारून सगळे हॉटेल ला परत आले. तोवर रात्रीच्या जेवणाची वेळ झाली.  वेटर परत रात्रीचे जेवण घेऊन आला. सगळ्यांनी मस्त हसत खेळत गप्पा करत जेवण संपवले. उद्याचा प्लान पूर्ण पणे रेडी होता. तिथले प्रसिद्ध पॉईंट्स बघून मेळघाट व्याघ्र प्रकल्प बघायला जंगलात आत जायचे होते. दुपारचे जेवण तिकडेच जंगलात  ठरलेले होते. मुले वाघाची स्वप्ने बघत झोपी गेली.
सकाळी पहाटेच उठून सगळे तयार झाले आणि 
पॉईंट्स बघायला निघाले. भीमकुंड, गाविलगड किल्ला, देवी पॉईंट तिथला धबधबा, मोझरी पॉईंट हरिकेत पॉईंट बघून आणि रुचकर स्वादिष्ट जेवनाचा आस्वाद घेऊन ते मग ते मेळघाट व्याघ्र प्रकल्प बघायला रवाना झाले.
मेळघाट पट्टेदार वाघांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे अनेक जंगली जनावरे पाहायला मिळतात त्यात हरीण अस्वल, कोल्हा, लांडगा, नीलगाय, हरीण, सांबर, ससे, मोर, माकड व खूप सारे पक्षी बघायला मिळतात. आज नाईक परिवाराचे भाग्य खूपच जोरात होते. आतमध्ये प्रवेश करताच दोन किलोमीटर पुढे जात नाही तो त्यांची गाडी थांबली. समोरून रस्ता क्रॉस करून एक पट्टेदार वाघ जात होता. सगळ्यांच्या मनात एकदम धस्स झाले.  राणीने एका हाताने मुलांना धरले आणि दुसऱ्या हाताने नाईकांना धरले. तिचे भानच हरपले होते. ड्रायव्हर ने सगळ्यांना शांत पणे बसून राहायचे सांगितले. नाईकांनी ताबडतोब मोबाईल काढून वाघाचे फोटो घेतले. मुलं तर एकदम स्तंभित होऊन वाघाकडे बघतच राहिले. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. रोडवरून वाघ बाजूला जंगलात अदृश्य झाला. 
त्यानंतर गाडी पुढे निघाली. पुढे हरीण,  माकड , नीलगाय, ससे, मोर ही बघायला मिळाले.  सगळेच खूप खुश झाले होते. 
वाघाचे दर्शन घेऊन नाईकांची पिकनिक आनंदमय झाली होती.  रात्र होता होता नाईक परिवार परत हॉटेल ला पोचला. आता मात्र मुलांना जोश आला होता. वाघ कसा चालत होता. तो कसा बघत होता. त्याचा रंग कसा होता त्याचे पट्टे किती सुंदर दिसत होते. यावर चर्चा करत होते. राणी ही खूप खुश झाली होती. आज ती नाईकांना टेकून बसली होती. मध्ये मध्ये गाडी हल्ल्यामुळे दोघांचाही एकमेकास स्पर्श होत होता.  राणी त्या स्पर्शात खूप सुखावत होती. नाईकांनाही राणीचा तो स्पर्श हवाहवासा वाटत होता. आज पहिल्यांदाच दोघेही तो स्पर्श अनुभवत होते. 
रात्रीचे जेवण करून सगळे आरामात झोपी गेले. सकाळी परत निघायचे होते. रस्त्यातच ते मुक्तगिरी आणि बहिरम चे दर्शन करायला जाणार होते. अमरावतीला देवीचे दर्शन ही घ्यायचे होते. आणि नंतर नागपूरला परतायचे होते.
आज तिसरा पिकनिक चा तिसरा परतीचा दिवस होता. सगळे सकाळी उठून तयार झाले. नास्ता करून परतीचा प्रवास सुरु झाला. मुक्तगिरी जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे. संगमवरी दगडांनी बांधलेले मंदिर खूप प्रसिद्ध आहे तिथे जायला पायऱ्या चढाव्या लागतात. पण कुणालाही थकवा जाणवला नाही. मुलं तर अगदी जोशात होती. दर्शन करून त्यांनी तिथेच जेवण घेतले. जेवण अगदी साधे होते पण खूपच स्वादिष्ट होते. 
तिथून ते बहिरम ला गेले तिथे ही टेकडी चढून मंदिरात जावे लागते. दर्शन करून सगळे आता अमरावतीला निघाले. अमरावतीला अंबा देवीचे दर्शन करून  थोडा वेळ मंदिरातच आराम करून  गाडी आता नागपूर कडे निघाली. पिकनिक खूपच छान झाली होती. घरी पोचता पोचता रात्र झाली होती. आता मात्र सगळे थकले होते. थोडे जेवण करून सगळे पिकनिक ची चर्चा करत झिपी गेले.
Sanjay R.



" सांजवेळ ही झाली आता "

वाट पाहे पिलू घरट्यात
नजर त्याची आकाशात ।
कुठे थांबली आई माझी
लक्ष लागेना कशाकशात ।
सांज वेळ ही झाली आता 
होईल काळोख या गगनात ।
चलबिचल मनात चाले
थेंब अश्रुंचे आले डोळ्यात ।
ओढ लागली आईलाही
लक्ष सारे तिच्या बाळात ।
दूर कशी मी आज आली
किती विचार आले डोक्यात ।
शांत झाले मन तेव्हा
घरटे आले जेव्हा नजरेत ।
आई पिलाची भेट घडली
चिवचिव सरली पिलू पंखात ।
Sanjay R.

Friday, September 10, 2021

" नशीब आहे फुटके "

देऊ किती दोष मी
नशीब आहे फुटके ।
घर नाही दार नाही
वर आभाळही तुटके ।

एकेक दाना अन्नाचा
तोही कठीण दिवसाला ।
विचारच सरले आता
अर्थच काय  जीवनाला ।

जिथे कुंपण असे मोडके
पाय देऊन जाती सारे ।
दिवसाही बघतो मी
अंधारातले सगळे तारे ।

म्हणू कसा माणूस मी
दुबळा लाचार वाटसरू ।
दिसेचना रस्ता पुढे
घेऊन कुबडी काय करू ।
Sanjay R.



Thursday, September 9, 2021

" कुठे मिळेल ती वाट "

कुठे मिळेल ती वाट
मनी भावना अफाट ।
हवेना सारेच मला
इच्छाही भारीच दाट ।
हेही हवे तेही हवे
मनच घालते घाट ।
फेरा नशिबाचा उलटा
मिळताच लागे नाट ।
बसे हिरमुसुन मग
किती हा डोक्याला शॉट ।
Sanjay R.

Wednesday, September 8, 2021

" असते काही अटळ "

कितीही करा प्रयत्न
असते काही अटळ ।
नाही चालत इलाज
संपुष्टात येते बळ ।
निघून जाते सारे
मनात होते हळहळ ।
तर कधो फुले आनंद
अंतरात होई सळसळ ।
अवस्था या मनाच्या
होते किती खट्याळ ।
Sanjay R.


Tuesday, September 7, 2021

" माझे गाव "

असेल छोटे गाव
अनोखे त्याचे नाव ।
लोकं तिथले भारी
खातात किती भाव ।
स्वभावाने मात्र शांत
नाही कशाची हाव ।
प्रेमळ किती मायाळू
जीवास जीव लाव ।
गरिबीत जगती सारे
देवा त्यांना तू पाव ।
सुखी कर साऱ्यास
चरणी तुझ्या धाव ।
Sanjay R.


" चांदणी "

चमचम तू चांदणी
नाही तुजविण कोणी
प्रेयसी तू ग चंद्राची
तो राजा नि तू राणी ।
का छळतो सूर्य तुला
नसे समोर तेव्हा कोणी ।
नभही बघतो दुरून तुज
नि ढळतो होऊन पाणी ।
Sanjay R.

Monday, September 6, 2021

" बैल पोळा "

सण बैलांचा पोळा 
होतात बैल सारे गोळा ।
सजून धजून सारे येती
होतो धन्य पाहुनी डोळा ।
सखा बळीराजाचा तो
सोबती कष्टात भोळा ।
वाहन महादेवाचे तेच
वाजे घुंगरू गळा ।
पूजन आज तयाचे
लागेल तुम्हांसी लळा ।
Sanjay R.

" दूर किती हे हात "

देणार कशी तू साथ
दूर किती हे  हात ।
परिक्रमा ही अनंताची
तिथे काळोखी रात ।

चुकता एक पाऊल
होईल जीवाचा घात ।
वादळ वारा नाही तिथे
फक्त आसवांची बरसात ।

रीत या दुनियेची कशी
कठीण किती देणे मात ।
एकटा इथे मी वाटसरू
मज वाटे मीच अनाथ ।
Sanjay R.



" नको तू सोडू काही "

नको तू सोडू काही
मनच मनाला पाही ।
वेदना कोण बघतो
अंतरात फुटते लाही ।
नशिबाचा खेळ सारा
जीव होतो त्राही त्राही ।
शब्दविन कळे कोणा
बोल तू जरा काही ।
मनातले सांगतो माझ्या
शोध मला तू दिशा दाही ।
Sanjay R.

Sunday, September 5, 2021

" भूत संशयाचे मनी "

भूत संशयाचे मनी
जसा मागे लागे शनी ।
बंध नात्याचे तुटती
झरते डोळ्यात पानी ।
नको विचार कसले
हवी मधाळ वाणी ।
हवे सुखाचे तरंग 
गाऊ आनंदाची गाणी ।
हसत सदा असावे
ही जीवनाची कहाणी ।
Sanjay R.

Saturday, September 4, 2021

" अंतरात कुठला भाव "

अंतरात कुठला भाव
करी मनावर घाव ।
कुणा म्हणू मी आपला
आहेत सारेच साव ।
नाही जाण कशाची
नाही कुणास ठाव ।
ओळख कुठे कुणाची
नाही कुणास नाव ।
सर्व सोडिले तुझ्यावर
देवा तूच मजला पाव ।
Sanjay R.


Friday, September 3, 2021

" विसरू कसे मी सांग "

विसरू कसे मी सांग
कसे फेडील मी पांग ।
उपकार तुझे मजवर
मोजू किती मी सांग ।
पडेल जन्म हा अपुरा
नाही ही भरणार रांग ।
सोडू कसे मी तुजला
प्रेम तुझेची अथांग ।
आईविना लेक पोरका
विसरेल कसा मी सांग ।
Sanjay R.


Thursday, September 2, 2021

" गूढ अंतराचे "

गूढ अंतराचे कळेना
अडकले मन वळेना ।
मनात विचार किती
कधी कशाशी जुळेना ।
क्षणात बदलते कसे
कधी कुणास छळेना ।
करतो मी सहन सारे
भोग नशिबाचे टळेना ।
Sanjay R.





Wednesday, September 1, 2021

" सांगा काय करायचं "

झालं ते आता विसरायचं
रुसणं फुगण सोडायचं ।

गालात थोडं हसायचं
पुन्हा नाही रुसायचं ।

मागे कशाला वळायचं

पुढचंच सारं बघायचं ।

मार्ग हा कुठे सरतो
अजून बरंच चालायचं

करणार काय आता
नाही मनात ठेवायचं ।

घेऊ वाटून सुख दुःख
हसत हसत जगायचं ।

जेव्हा येईल वेळ तेव्हा
बघू ना काय करायचं ।

टाळलं कुणाला मरण
त्यालाही आहे थकवायचं ।
Sanjay R.