Sunday, December 29, 2013

" लक्षण हे बर नाही "

झपाटल आता मनाला
भिनलय प्रेमाच वारं
बघा पाणीही गोड झाल
अरबी समुद्राच खारं
वाट बघाया लागलो
उघडुन दाही दारं
माझा मी उरलो आता
तुज देउन टाकल सारं
sanjay R.



वेड्या मना आता
तुझ काही खर नाही
क्षणा क्षणाला सुर बदलतो
लक्षण हे बर नाही
sanjay R.

Friday, December 27, 2013

" केव्हा येयील हो गोव्याची बस "

मेरी ख्रिसमस
हैपी ख्रिसमस
केव्हा येयील हो
गोव्याची बस
घ्यायची आहे
फेणीची लस
मौज मजेचा
लुटायचा रस
आनंद नववर्षात
भरायचा ठसाठस
sanjay R.


थंडीचा कडाका
इतका वाढला
ब्लँकेट मधुन
निघवत नाही
सोडुन दे
सार आता
तुजविण काही
बघवत नाही
 sanjay R.


राम राम राम
आहेत कितीतरी
कराला काम
कंटाळा आला आता
करु या थोडा आराम
फिरायला जावे तर
डिमांड मुलांच्या
असतात जाम
खरेदीला लागतात
तेवढेच दाम
त्यापेक्षा घरीच बसुन
घेउ या रामनाम
sanjay R.


खुप खुप वाटत मनाला
हिमालयात जाउन बसाव
इथलीच थंडी सोसवत नाही
जाउन तिथे तरी काय कराव
sanjay R.


गार गार हवा
फुलला गुलाब नवा
सुर्याच्या स्वागताला
निघाला पक्षांचा थवा
sanjay R.

Sunday, December 22, 2013

” भुकेला हवी भाजी भाकर ”

घालता फुंकर
उडती पाखर ।
भुकेला हवी
भाजी भाकर ।
sanjay R.


आनंदी बोल
जिवन अनमोल ।
दुखी मन
माती मोल ।
sanjay R.


मनात बहुत
कल्पनांचे झरे ।
आनंदी जिवन
क्षण अपुरे ।
sanjay R.


असतीस तु जाडी
किंवा सनकाडी
परवडली नसती
लाडी गोडी
आठवणीन तुझ्या
धगधगते नाडी
sanjay R.


नको घोडा
नको गाडी
मज हवी
लाडी गोडी
sanjay R.


जिवनाचा आनंद
द्यायचा मज तुला ।
दुखः नाही द्यायचे
मज तुझ्या मनाला ।
sanjay R.


साद तुने द्यावी
कानी माझ्या यावी ।
धाउन येता मी
साथ तुझी असावी ।
sanjay R.


जाणले मी मन तुझे
दे मजसी क्षण तुझे
जगु आता संगतीन
जिवन तुझे माझे
sanjay R.


आठवतात त्या
पावसाच्या धारा
चिंब ओले होउन
वेचलेल्या गारा ।
कागदी नावांचा
खेळ पसारा ।
गाणे पावसाचेनी
ढग गडगडणारा ।
लखलखाट विजेचा
आणी वादळ वारा ।
आला आला पाउस
शाळेला बुट्टी मारा ।
sanjay R.

” दिला पाहुन हिरा ”

आई बाबानी
दिला पाहुन हिरा ।
आता जन्मभर
मागे त्याच्या फिरा ।
sanjay R.


ये माझ्या कवेत
बस अशी नावेत ।
मिळु दे श्वासात श्वास ।
थेंब थेब प्राशन करुनी
विझवु तनाची प्यास ।
sanjay R.


फुलाला अस सजवु
गंध त्यातला घेउ ।
चांदणी रात्र सोबत
बहुपाशात जागउ ।
sanjay R.


कसे सांगु तुजला
मनात आहे लव्ह ।
मनात तुझ्या काय
हूदया माझ्या कळव ।
sanjay R.


मनाच काय
कळत नाय ।
आवाज येतो तिथुन
हेल्लो हाय ।
sanjay R.


वाटत घट्ट बांधाव्या
संग तुझ्या गाठी ।
अम्रुत कराव प्राशन
ओठ लाउनी तुझ्या ओठी ।
sanjay R.


मनात माझ्या
तु अशी बसली ।
सोबत तुझी असतांना
आता चिंता कसली ।
sanjay R.


काय खर काय खोट ।
मन त्याच खुप मोठ ।।
मनात माझ्या तुच राजा ।
का हीच आहे मला सजा ।।
sanjay R.

” परंपरा आणी रुढीं “

हलकेच ओढुनी चादर
निवांत निजली चांदणी ।
वेडा चंद्र निघाला
तिज शोधाया हिरकणी ।
sanjay R.


अंबर करता सिंचन
त्रुप्त होई धरा
चढेल प्रीतीला
रंग खरा, वाह धरा ।
sanjay R.



” परंपरा आणी रुढीं “

नक्कीच आपल्या पुर्वजांनी
ज्या परंपरा आणी रुढीं
बांधुन दिल्यात त्या मागे
शास्त्रीय कारणं आहेत ।
आणी आपण बघतोच
आहोत, त्या काळातही
विज्ञान आणी तंत्रज्ञान
बरेच प्रगत होते ।
जसे ईजिप्त मधील
पिऱयामीड, रामाचा
विमान लंका ते अयोद्ध्या
युद्धानंतरचा परतीचा
प्रवास, रामायणातील
युद्धात वापरले गेलेले
विवीध शस्त्र, महाभारतात
संजय द्वारा ध्रुतराष्ट्राला
दिलेला युद्ध व्रुत्तांत, जुन्या
काळातील मंदीर लेण्या
व त्यांचे अद्वितीय बांधकाम
आणी असे बरेच काही
सांगता येयील ।
आणी म्हणुन जुन्या परंपरा
आणी रुढींना नाकारणे
म्हणजे आपलाच मुर्खपणा
ठरेल ।
sanjay R


.आली बघा दिवाळी
चला जाउ खरेदिला ।
खिशात नाही पैसा
कर्ज काढुया खर्चाला ।
चंपु गंपुला नवा शर्ट
हवी साडी रमीला ।
फाटका शर्ट टाचुन घेउ
चालेल मग दिवाळीला ।
मिठाइ फटाके महाग फार
चिवडाच ठेउ फराळाला ।
पावसान यंदा सार नेल
गवत उरलय उपासाला ।
sanjay R.

” दुखःही कसे आनंदी होते “

“दुखःही कसे आनंदी होते”
हलकेच ओढुनी चादर
निवांत निजली चांदणी ।
वेडा चंद्र निघाला
तिज शोधाया हिरकणी ।
sanjay R.


कल्पकतेतला रंग
असाच असतो ।
ह्रुदयात जाउन
कसा बसतो ।
मन विखुरते
सैरभैर होते ।
दुखःही कसे
आनंदी होते ।
जिवनही मग
रंगमय होते ।
sanjay R.


जाउ या चला
सागर सफरीला ।
तयार होडी
आहे दिमतीला ।
खारे पाणी
आहे संगतीला ।
झोक लाटांचे
आहे गमतीला ।
हळुच मासा
येयील चमकीला ।
जिव वरखाली
होई भरतीला ।
नभात चांदणी
आली हिमतीला ।
जायचे मज
आता धरतीला ।
sanjay R.


अर्पीला मी जन्म सारा
का तुटला विश्वास तुझा ।
नाही हरीश्चंद्र मी सखा
सोडुन दे आभास तुझा ।
sanjay R.

" आठवणींचा संदुक "

आठवणींचा संदुक
असाच सांभाळुन ठेवायचा
परत परत थर
धुळीचा पुसुन काढायचा ।
sanjay R.


कला अशीच असते ।
कलाकाराला आनंद देते ।
तर रसीकाला त्रुप्ती ।
जिवनात आमच्या डोकावते ।
मन मंत्रमुग्ध होते ।
हळुच झोके घेते ।
आणी सुर उमटतात ।
ये कहा आ गये हम ।
युही साथ चलते चलते ।
sanjay R.


आली आली दिवाळी
जिवनाचे वर्ष एक
कमी करुन गेली
sanjay R.


जगणे असले
जरी येक आभास ।
प्रत्येक क्षण
जिवनाचा आहे खास ।
पार करायचा आपणा
एक एक फास ।
चला करु या आपण
नवजिवनाचा ध्यास ।
sanjay R.


मला पण आहे
कवितेचा ध्यास ।
मिळे आनंद इतका
जगतो रोज एक
नवीन श्वास ।
sanjay R.


झाली तयारी एकदाची
गडबड घाई दिवाळीची
फुरसत नव्हती क्षणाची
संपवा प्लेट आता फराळाची ।
sanjay R.


आली आली
दिवाळी आली ।
फराळाची
तयारी झाली ।
कपडे फटाक्यात
खिसा खाली ।
साडी साठी नाराज
माझी घरवाली ।
महागाईन सारी
फजीती केली ।
कराव काय
कोण नाही वाली ।
सोडुन चिंता
पेटउ मशाली ।
sanjay R.


बस याद उनकी आइ
और होश गवा बैठे हम ।
रातभर ढुंढते रहे फिर
लौट आये होशमे तो
सुबह हुयी ।
शुभ प्रभात ।।

” चांदीच्या कपात सोनेरी चहा “

चांदीच्या कपात
सोनेरी चहा ।
मोजावे लागतील
रुपये दहा ।
जाउन टपरीवर
येकदा पहा ।
न पिताच म्हणाल
वाह वाहा ।
sanjay R.


कधी कधी
दिवस असाही येतो ।
दुर कुठतरी
कंटाळवाणात नेतो ।
येकाकी मनाला
उदासीनता देतो ।
विचारांचे काहुर
हिराउन घेतो ।
sanjay R.


सुंदर आकाशी
चंद्र पौर्णीमेचा ।
सोबतीला असे
चमचमणाऱया
चांदण्यांची ।
मनी विचारांचे
काहुर माझ्या ।
येकटाच निघालो
आता तयारी आहे
जिवन प्रवासाची ।
खाच खळग्यांचा
खडतर हा मार्ग
हिच असावी
कसोटी जिवनाची ।
sanjay R.

कुठेही जा
फराळाचा आग्रह ।
थकलो बाबा आता
नको तो फराळ ।
दुसरे काही द्या
झाली आहे सकाळ ।
sanjay R.

” आले भरुन डोळे “

भरुन आले डोळे
आसव नेत्री मावेना ।
गळी आला हुंदका
रड आता थांबेना ।
आठवणीना पुर आला
दुखः मनाचे कळेना ।
sanjay R.


आषाढ कार्तिकी
जनसागर लोटला ।
पंढरपुरात जन
भक्तीसागरात डुबला ।
विठ्ठल रखुमाई माझ्या
ह्रुदयात वसला ।
गजर नामाचा करु
जय जय हरी विठ्ठला ।
sanjay R.


आठवत मज ते लहानपण
आणी लहानपणातले खेळ ।
कधी धाबाधुबी लपाछपी
तर कधी लगोऱयांचा मेळ ।
कधी उनाडक्या करत फिरायच ।
तर कधी शाळेला बुट्टी मारुन
नाल्यावर मासोळ्यांना धरायच ।
पाठीत आईचा दणका बसता
दुर कुठतरी लपुन बसायच ।
लपुनच आईला शोधतांना
बघायच ।
आणी मनातल्या मनात
खुप हसायच ।
मित्र मैत्रीणींशी खुप भांडायच।
परत हसत हसत मिळायच ।
मोठ्ठे झालो आता म्हणुन
टेंशन मधेच जगायच ।
sanjay R.

” जपायचे बेधुंद मनाला “

गोड मधुर हलकी थंडी
उब हवी आता तनाला ।
हळुच पांघरुणात शिरायचे
जपायचे बेधुंद मनाला ।
sanjay R.

येता झुळ झुळ वारा
डोलतो निसर्ग सारा
मनही लागे डोलाया
शोधीतो एक किनारा
sanjay R.

” अधीर कान झाले ऐकाया काव काव ”

कावळोबा करता
तुम्ही काव काव ।
दिसत नाहीत इतक्यात
सोडला का गाव ।
लहानपणा पासुन
ऐकतोय तुमचे नाव ।
काडीच्या घराची
आहे तुम्हास हाव ।
वाहुन गेले तरी
परत मांडता डाव ।
या परत येकदा
छान आमचा गाव ।
अधीर कान झाले
ऐकाया तुमची काव काव ।
sanjay R.


उघडता बंध
येक मनात ।
दरवळतो गंध
प्रेमाचा क्षणात ।।
अवतरते गोड
छवी एक नजरेत ।
धुंद होतो मी
तुझ्या कल्पनेत ।।
घेउनी तुझाच
हातात हात ।
दुखः सारी
विसरतो क्षणात ।।
झेपावतो आकाशी
असते तुझीच साथ ।
नाही मग उमजत
सरते कशी ती रात ।।
sanjay R.

” मनाचा खेळ न्यारा “

मनाचा खेळ न्यारा
लगे सबकुछ प्यारा ।
सभोवताल बघा जरा
सुंदर कीती ही धरा ।
sanjax R.

सुर्य आहे सोबतीला
आणी चंद्र साक्षीला ।
परीजात हा बहरला
सुगंध येयी जिवनाला ।
sanjay R.

हॅ बहोत यहा लेकीन
दोस्त आपसा नही कोई ।
और हमे चाहीये क्या
दोस्ती आपकी हमने पाई ।
sanjay R
.
काय झाले कुणास ठाउक
कवीता माझी रुसली ।
सोडुन एकट्यास मला
एकांतात जाउन बसली ।
मनच लागत नाही आता
मनी चिंता आहे कसली ।
चाहुल तुझी लागताच मना
बघ कविता पण माझी हसली।
sanjay R.

तुझ्या आठवणींचा
बघ कसा डोंगर झाला
कळले नाही म्हणतेस तु
चंद्रही बघ नजरेआड झाला
sanjay R.

घेउन तुला छातीशी
निवांत झोपील म्हटल
आधीच झोपी गेलीस तु
स्वप्न न बघताच तुटल
sanjay R
.
बाळा जो जो रे बाळा
तान्हुला तु छकुला तु
टीका केला काळा ।
इवली इवली पावल तुझी
चढवील्या वाळा ।
चिउ काउ या रे सारे
भरवायची आहे शाळा ।
sanjay R
.
किलबील पाखरांची सुंदर
गंध पुष्पांचा सुंदर
बहरली वनराई सुंदर
बघा चौफेर ही धरा सुंदर
मी सुंदर मन माझे सुंदर
sanjay R.

सनडे कमाल
हाती रुमाल
गाण्याचा ताल
लुंगी डांस करुन
उडवु या धमाल
sanjay R.

” देवा मला तु पाव "

कसा मनावर
केलास तु घाव ।
नाही कशाची आता
मजला उरली हाव ।
अखंड जपतो देवा
तुझेच मनात नाव ।
आता तरी येकदा
देवा मला तु पाव ।
sanjay R.

मी नाही काळा
ना मन माझे काळे ।
ओढ तुझी मजला
नजरही मागेच वळे ।
आसक्ती तुझी मजला
तुजसाठी मन झाले खुळे ।
मनीशा तुझी मजला
मग मन असे का जळे ।
sanjay R.

मी पण बेचैन
इथे तुझ्याभेटीसाठी ।
मनाला कसे समजाउ
होणार कधी भेटीगाठी ।
sanjay R.

प्रेमात असते सगळच माफ ।
उकळल्यावर निघते वाफ ।
झाला जर पत्ता साफ ।
पिटायचे टाळ गेल्यावर साप ।
sanjay R.

उठा उठा सगळे जण
स्मरण करा श्री गजानन
भजन करा जय श्रीराम
चहा झालाय गरमागरम
ब्रेड बिस्कीट आहे संगतीन
भराभर आटोपा आपली काम
दिवस चांगला मिळेल आराम
श्रीराम श्रीराम जय श्रीराम
sanjay R.

” सागर पुढे असतांनाही आसवातच न्हालो “

का तु मज अशी
इतकी छळतेस ।
दिवस रात्र मन
माझे जाळतेस ।
दुर असतेस तेव्हा
खळखळुन हसतेस ।
येताच जवळ अशी
दुर का सारतेस ।
sanjay R.

आठवणीत तुझ्या मी
व्याकुळ इतका झालो ।
सागर पुढे असतांनाही
आसवातच न्हालो ।
तस्वीरीतली छवी तुझी
ह्रदयी असा मी ल्यालो ।
एक एक आठवण तुझी
आत ओठांच्या मी प्यालो ।
sanjay R.

नात तु अन मीच
पाळायच बघ तुलाही ।
मैत्रीची हा बंध
ठेवायचा गाठीशी मलाही ।
तु मी म्हणतांना
अनुभवतो मी एक जिव्हाळा ।
एक एक करुन सरेल दिवस
आयुश्याचा प्रत्येक पावसाळा ।
sanjay R.

” सुर्य आहे सोबतीला “

मनाचा खेळ न्यारा
लगे सबकुछ प्यारा ।
सभोवताल बघा जरा
सुंदर कीती ही धरा ।
sanjax R.

सुर्य आहे सोबतीला
आणी चंद्र साक्षीला ।
परीजात हा बहरला
सुगंध येयी जिवनाला ।
sanjay R.

हॅ बहोत यहा लेकीन
दोस्त आपसा नही कोई ।
और हमे चाहीये क्या
दोस्ती आपकी हमने पाई ।
sanjay R.

काय झाले कुणास ठाउक
कवीता माझी रुसली ।
सोडुन एकट्यास मला
एकांतात जाउन बसली ।
मनच लागत नाही आता
मनी चिंता आहे कसली ।
चाहुल तुझी लागताच मना
बघ कविता पण माझी हसली।
sanjay R.

तुझ्या आठवणींचा
बघ कसा डोंगर झाला
कळले नाही म्हणतेस तु
चंद्रही बघ नजरेआड झाला
sanjay R.

घेउन तुला छातीशी
निवांत झोपील म्हटल
आधीच झोपी गेलीस तु
स्वप्न न बघताच तुटल
sanjay R.

बाळा जो जो रे बाळा
तान्हुला तु छकुला तु
टीका केला काळा ।
इवली इवली पावल तुझी
चढवील्या वाळा ।
चिउ काउ या रे सारे
भरवायची आहे शाळा ।
sanjay R.

किलबील पाखरांची सुंदर
गंध पुष्पांचा सुंदर
बहरली वनराई सुंदर
बघा चौफेर ही धरा सुंदर
मी सुंदर मन माझे सुंदर
sanjay R.

सनडे कमाल
हाती रुमाल
गाण्याचा ताल
लुंगी डांस करुन
उडवु या धमाल
Sanjay R.

” आयुष्याची ही शिदोरी “

सुरांची साथ करण्या
सरसावली एकतारी ।
बहरली मैफील अशी
साज सुरांची स्वारी ।
आनंदोत्सवात न्हाल्या
रंगल्या दिशा चारी
जिवनात साथ तुझी
आयुष्याची ही शिदोरी ।
sanjay R.

काय चाललय आता
सांगु कुणा मनी ।
सारखा गुंजतोय
स्वर तुझाच कानी ।
sanjay R.

आप तो हमारे लिये
कीमती जवाहर हो
कोइ पुछे तो कहेंगे
दिलके किमतके
बराबर हो
sanjay R.

सरली रात्र दिवस नवा
उगवतीला पेटला दिवा
पाखरांचा सुमधुर पावा
सोबतीला शीतल गारवा
sanjay R.

ना है हम
कोइ खिलाडी ।
और ना समझो
हमे अनाडी ।
ना करते हम
बात कोइ बडी ।
बस दिलो को
जोड जोड कर
बनाना चाहते
एक लंबीसी गाडी ।
sanjay R.