सरू देना हेही वर्ष
मीही हरणार नाही ।
राहिलेले सारेच मी
असे सोडणार नाही ।
नव वर्ष हे सुखाचे
समृद्ध होणार आहे ।
आशा आकांक्षा साऱ्या
पूर्ण करणार आहे ।
" Happy New Year "
2023
सरू देना हेही वर्ष
मीही हरणार नाही ।
राहिलेले सारेच मी
असे सोडणार नाही ।
नव वर्ष हे सुखाचे
समृद्ध होणार आहे ।
आशा आकांक्षा साऱ्या
पूर्ण करणार आहे ।
" Happy New Year "
2023
सरले वर्ष हे आता
नववर्षाचे आगमन ।
आठवतात मज
जुने सारेच क्षण ।
युद्धाची होती काळजी
भयभीत होते मन ।
युक्रेन झाले खंडार
मिसाईल गाजवी रण ।
वर्चस्वाची ही लढाई
प्रत्यकाचा वेगळा प्रण ।
जिवितांची काळजी कुणा
आयुष्यभर पोसू व्रण ।
नव वर्षाचा नवा डाव
भरेल धुराने का गगन ।
माणुसकीच नाही कुठे
कोण सांगा कसा जगन ।
Sanjay R.
अनामिका नव्हे ती
होती मंजुलिका
भूत बनून आली जेव्हा
झाली अंजुलिका
डोक्यावर बांधली शेंडी
कपाळावर टीका ।
प्रेमापायी तिच्या कसा
पागल झाला मूका ।
भुताटकीच्या कथा बघा
वाटतो किती धोका ।
मनाचाच खेळ सारा
असतात साऱ्या फोका ।
Sanjay R.
उघडुन डोळे नीट बघा
कोण इथे तुमचा सखा ।
जात फसवी माणसांची
कधीही देतील तेच धोका ।
दूर जरासे ठेवा काढून
धोकेबाजांना आधी रोका ।
देऊ नका हो एकही त्यांना
फसवेगिरीचा असा मोका ।
शब्दांमध्ये ही किंमत असते
वेळीच त्यांना जरा टोका ।
जमत नसेल तर बघा जरा
कीड लागलेले उपटून फेका ।
Sanjay R.
मागे वळून नको पाहू
आहे तो तर भूतकाळ
वर्तमान आहे जगायचा
भविष्य उद्याची सकाळ
काल गेला आज आला
आहे उद्या तर येणारच ।
नाही कुणास काळजी
जे व्हायचे ते होणारच ।
Sanjay R.
नव वर्षाची ही चाहूल
सरणार जुने नवे येणार ।
गत वर्षीच्या आठवणी
भविष्याला देई आधार ।
आनंद उत्सव करू साजरा
करू भूतकाळाला सार ।
नवावर्षाच्या नव्या आशा
स्वप्न मनातले करू साकार ।
Sanjay R.
छोटीशी ऐक परी
सुंदर ती किती
नव्हती तिला कुणाची
काहीच हो भीती ।
भ्रमण करायची स्वर्गात
यायची पृथ्वीवर कधी ।
वाटेवर तिच्या मधेच
पडायची अमृताची नदी ।
पाणी पिताच कोणी
अमर तो व्हायचा ।
सरळ मग परी संगे
स्वर्गातच जायचा ।
दुष्ट जेव्हा प्यायचे पाणी
नरकात पोचायचा ।
हाल अपेष्टा शिक्षा
आयुष्यभर भोगायचा ।
होऊ नका हो दुष्ट
परी होईल रुष्ट ।
स्वर्गात जाण्यासाठी
तुम्ही करू थोडे कष्ट ।
Sanjay R.
आनंदाचा उत्सव आला
हसू खेळू या चला चला ।
झिम्मा फुगडी खेळू चला
माळून गजरा मिरवू चला ।
नवी कोरी ही साडी हिरवी
पदरावरती ही नक्षी माला ।
नटून थटून आल्या सखी
चला घेऊ या उंच झुला ।
Sanjay R.
खेळू चला आज झिम्मा
नका करू तुम्ही हम्मा ।
जुने सारे खेळ झाले पार
घेतला मोबाईलचा आधार ।
मोबाईल मधेच बघतात सारे
पागल व्हाल हो नाही ते बरे ।
नजर तुमची होईल कमी
पाठीच्या आजाराची आहे हमी ।
जरा सोडा ना आता मोबाईल
झिम्मा खेळण्यात वेळही जाईल ।
Sanjay R.
नेताजी सुखदेव भगतसिंग
या अनेक वीरांच्या गाथा ।
दिले त्यांनी बलिदान आपले
नाही ती हो साधी कथा ।
हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापले
ते शिवराय मुघलांशी लढले ।
शूर वीर ती झाशीची राणी
गांधी नेहरू ही इथेच घडले ।
इतिहास जाणतो शौर्य तयांचे
त्या साऱ्यांना नमन आमचे ।
व्यर्थ नाही जाणार बलिदान
रक्षण करू या भारत भू चे ।
Sanjay R.
सरले उत्सव सारे
जगतो वास्तव इथे ।
अंतिम यात्राच बाकी
कळेना जायचे कुठे ।
दूर नीरव शांतता
गर्दीत मी उभा इथे ।
मार्ग सोपा की कठीण
कळेना जायचे कुठे ।
सत्य म्हणू की भ्रम तो
नाही कोणीच का तिथे ।
आत्मा अशांत वाटतो
कळेना जायचे कुठे ।
सोडून जीव मी आलो
भ्रमण नाही सरले ।
मृत्यू पुढे नी मी मागे
कळेना जायचे कुठे ।
Sanjay R.
नकळत मनात तू
घर करून गेली ।
विसरलो मलाच मी
तहान भूकही नेली ।
कधी कुठे पहिले तुला
नजरा नजर झाली ।
निघेना मनातून आता
मनाची तू राणी झाली ।
शोधतो तुलाच आता
रस्ता असला जरी खाली ।
विचार सदा असतो तुझा
नेत्रांची झोपही उडाली ।
परत येकदा वाटते बघावी
गालावरची तुझ्या लाली ।
चाहूल तुझी मी घेतो आणि
होतात श्वासही वर खाली ।
Sanjay R.
रंग मेंदीचा असा
झाला गर्द कसा ।
प्रेमाचे ते प्रतिक
आहे घेतला वसा ।
रंग निघणार नाही
पक्का तो जसा ।
विश्वास हा माझा
आहे प्रेमात तसा ।
आनंद आहे प्रेमात
जरा थोडे तर हसा ।
नको काळजी आता
सुंदर तुम्हीही दिसा ।
Sanjay R.
गर्द हा रंग मेंदीचा
हातावर खुलला ।
ओठावरच्या हास्याने
चेहराही फुलला ।
डोळे झाले बोलके
आनंदही झुलला ।
रंग गुलाबी कसा
सर्वस्वच भुलला ।
Sanjay R.
काल जे होते
झाले इतिहास जमा ।
उद्या जे येईल
त्याची नाही तमा ।
दुखणे असते तेच
सांगू मी काय तुम्हा ।
रोज एक नवा दिवस
विचारतो कोण आम्हा ।
Sanjay R.
कुठे असते भावना
तिला भेटायचं मला ।
सरली म्हणतात सारे
दिसली का तुला ।
नको जाऊस आहारी
असते ती भारी ।
तुटली येकदा की
लागते जिव्हारी ।
स्वरात तिच्या हो
का ते कळत नाही ।
नकार देऊनही
होकार टाळत नाही ।
Sanjay R.
जगतो मी वर्तमान
नको मज इतिहास ।
भविष्याची नाही चिंता
आज घेतो तोच श्वास ।
जगण्यासाठी चाले सारे
निष्फळ होतात प्रयास ।
जगण्यापुढे नाही काही
पोटासाठी सारे ध्यास ।
बघतो रात्री स्वप्न एकच
होतो सुखाचा आभास ।
दिवस ऐक येईल बरा
आहे मनात विश्वास ।
Sanjay R.
गार झाला वारा
उतरला पारा ।
वाटते किती थंडी
जणू बर्फाचा मारा ।
सोसेना आता मज
हले अंग थरथरा ।
दवबिंदू पाना वरती
देई काय इशारा ।
वाटे हवा गरम चहा
तोच थंडीचा चारा ।
पेटवा कोणी शेकोटी
देईल तीच सहारा ।
हवे रजई ब्लँकेट
नाही तो पसारा ।
Sanjay R.
मनाला कोण जाणतं
पण खूप काही सांगतं ।
कधी इथे कधी तिथे
ऐका जागी कुठे थांबतं ।
नाही लागत थांग पत्ता
मनात वेगळच चालतं ।
वारा नसतानाही कसं
झाड आपोआप हालतं ।
भावनाच त्या मनाच्या
हवा त्याला ही एकांत ।
Sanjay R.
नको देऊस तू याद
नाहीच कळणार तुला
माझ्या मनाची साद ।
वाटल असेल ना तुला
का करतो मी वाद ।
नव्हताच तो वाद
होता माझ्या मनाचा
फक्त मनाशी संवाद ।
मलाही हवी होती
त्यावर तुझी दाद ।
Sanjay R.
सगळेच इथे अनाकलनीय
फक्त ते बघायचे ।
विचार नकोत फार
बघून दूर सारायचे ।
आपल्यात आपण खुश
दुसऱ्यांचे काय करायचे ।
दिवस आहेत अजून
तोवर तर जगायचे ।
हसा खेळा मस्ती करा
येवढेच मज सांगायचे ।
Sanjay R.
होतो तुझा भास
अडकतात श्वास ।
शोधतो मग तुला
असतात प्रयास ।
नसतेस तू कुठे
पण होतात भास ।
मनाला ही लागतो
तुझाच ध्यास ।
Sanjay R.
मीलना मै चाहू तुझसे
पर कैसे कहू ।
अंजानी यह दोस्ती
मै कैसे कहू ।
चाहत दीलमे इतनी
तूही बता कैसे रहू ।
यादे भी अब रुकती नही
बता कैसे रहु ।
आखे धुंडती तुझे सदा
मै क्या कैसे सहू ।
बेचैन है यह दिल
मै कैसे कैसे सहु ।
आ लौट के तू आ
मै तो वही हू ।
चाहत भी मेरी है वही
मै भी वही हू ।
Sanjay R.
नकळत झाला खून
लागली क्रिमिनल केस ।
हेतू नव्हता काहीच
सापडेल कुठे बेस ।
निर्दोष झाली सुटका
मिटली कलांकाची रेश ।
लोकांनी टाकले वाळीत
उरलेच काय शेष ।
Sanjay R.
आम्ही अहिंसेचे पुजारी
नको हिंसेची बात ।
गोड गोड बोलून रे
करतात जवळचेच घात ।
मज वाटते आता
नको कुणाचा हात ।
आसही नको आता
नको कुणाची साथ ।
Sanjay R.
जीवनाचे हे चल चक्र
चालेले निरंतर ।
भूतकाळ जातो निघून
वर्तमानात प्रत्यंतर ।
भविष्याचे सारे अंदाज
पडते थोडे अंतर ।
जीवन कुठे हो थांबते
अपेक्षाच अवांतर ।
Sanjay R.
होतो इथे तर दिवस
आजचाच कठीण ।
भविष्याचा करता विचार
डोकं होते भिन ।
कष्टाला नाही किंमत
उधरीचा दिसे आव ।
माणुसकी तर सरली
विचारही बेभाव ।
दुःख इथे भोगायचे
नाही कुणाचा आधार ।
मेल्यावरही सुटणार नाही
डोक्यावरचा भार ।
Sanjay R.
कशी तुझी यारी
कर ना तयारी ।
ऐक ऐक दिवस
जातो किती भारी ।
बघत असतो सारखा
साऱ्या दिशा चारी ।
मनही माझे घेते
वारंवार भरारी ।
सोड तुझा हट्ट
बसलोय मी दारी ।
Sanjay R.
असेल ज्यासी चार यार
बघा त्याला किती आधार ।
मित्र तर मित्र्च असतात
उचलतात तुमचाही भार ।
भांडण हो वा होऊ दे तंटा
खावा लागत नाही मार ।
अडचणींचा असू दे डोंगर
नौका लावतात तेच पार ।
खाणे असो वा असो पिणे
सगळ्यांचे सारखे विचार ।
मौज मजा सुख दुःखात
यारच तर होतात भागीदार ।
Sanjay R.
तुझी माझी यारी
दोस्ती असतेच भारी ।
नसतो राग लोभ
वाटते मैत्री प्यारी ।
कधी कधी होते
आपसात मारामारी ।
क्षणात जातो विसरून
पोचतो मग दारी ।
मैत्रीला नाही तोड
असते मज्जाच सारी ।
Sanjay R.
सावरू कसे मी मला
मन उधाण वाऱ्याचे ।
लागले वरीस सोळावे
आकर्षण त्या ताऱ्याचे ।
करतो चमचम तारा
छेडतो अंगास वारा
उडती केस भुरभुर
कळला मज इशारा ।
मोगरा फुलला अंगणात
केली सुगंधाची बरसात
गालात हसतो गुलाब
माळला हळूच केसात ।
SAnjay R.
मनात एकच ध्यास
आहे घडवायचा इतिहास ।
बोबडे बोल हे माझे
ठेवा थोडा विश्वास ।
परिश्रम करील मी सारे
पडणार नाही मागे ।
जे स्वप्न आई बाबांचे
करील त्यास मी जागे ।
शूर वीर म्हणा मज
लहान मी हो कुठे ।
मीही बघतो स्वप्न
व्हायचे मज मोठे ।
Sanjay R.
जीवनाची ही बात
मिळते ऐक साथ ।
एकमेकासी आधार
करायचा पुढे हात ।
संकटे येती भारी
करायची त्यावर मात ।
जीवनाचे गीत हे
जायचे पुढे गात ।
बघा जरा करून
जीवनाची सुरूवात ।
Sanjay R.
चला....
जाऊ देवा घरी....
आहे तिथे हरी....
असेल भले सारे
वाटते इथल्या परी....
मंदिरात कुठे देव
ते नदीच्या तीरी....
भजन तिथे करून....
भोजन आपल्या घरी...
भुकेले हे पोट...
त्यास कष्टाची चाकरी...
रात्रन दिवस खपून
नाही पोट हे भरी.....
उपवास नको आता...
पोटात लागल्या सरी.....
रिकाम्या पोटाला हो
हवी ऐक भाकरी......
वाहतो संसाराची धुरा....
रोज होते एक वारी....
स्वप्न पाहता पाहता
दिवस जातो भारी....
गरीबाची ही कहाणी
वाटते कुणा खरी...
भोग भोगतो सारे
नाही वाटत बरी....
चला....
जाऊ देवा घरी....
आहे तिथे हरी....
असेल भले सारे
वाटते इथल्या परी....
Sanjay R.
शब्दांची होते किमया
त्यात जीवनाचा सार ।
कधी करती ते घात
सुटतो पायाचा आधार ।
शब्दांनी जुळते नाळ
फुलते नात्याची माळ ।
कधी घेती वेध अंतराचा
हृदयात होतो जाळ ।
शब्दांनी भरतो प्याला
गोड अमृत त्याला ।
कधी वाटती ते काटे
करती घायाळ मनाला ।
Sanjay R.
ओळख कशास हवी
अनोळखीच बरे ।
गुपित राहू दे सारे
नाही काहीच खरे ।
जग वाईट इथे
माणसेही वाईट ।
झोल झाल आत
वरूनच ते टाईट ।
शब्दांच्या मोहाचे जाळे
तोही ऐक सापळा ।
जातील चिरून कधी
कळणार नाही गळा ।
Sanjay R.
शोधू तुला मी कोठे
जग आहे किती हे मोठे ।
थकले डोळे हे आता
दिसते नजरेस सारे खोटे ।
शोधण्या माणूस निघालो
ठिकठिकाणी आहेत गोटे ।
ओलावा गेला सरून
मन झाले किती ते छोटे ।
स्वार्थ दडला मनात
ध्यास लागलेत मोठे ।
वाटतो माणुसकीचा अंत
भरलेत त्यानीच पोटे ।
Sanjay R.
नकळत मनात तू
घर करून गेली ।
विसरलो मलाच मी
तहान भूकही नेली ।
कधी कुठे पहिले तुला
नजरा नजर झाली ।
निघेना मनातून आता
मनाची तू राणी झाली ।
शोधतो तुलाच आता
रस्ता असला जरी खाली ।
विचार सदा असतो तुझा
नेत्रांची झोपही उडाली ।
परत येकदा वाटते बघावी
गालावरची तुझ्या लाली ।
चाहूल तुझी मी घेतो आणि
होतात श्वासही वर खाली ।
Sanjay R.
डोईवर भार प्रकाशाचा
काया दिवसा हरलेली ।
थकुन भागून निजते जशी
असते रात्र मंतरलेली ।
नजरा जणू वखवखलेल्या
काया होई काळवंडलेली ।
काळोखात निखरते रूप
रात्र होते सळसळलेली ।
अंतरात वसे विष दंशाचे
आशा मनात विझलेली ।
रात्री होऊन ती चांदणी
विसावते राणी हरलेली ।
Sanjay R.
संगिनी तू
तूच अर्धांगिनी ।
तुज विन काय
माझ्या जीवनी ।
आदर आहे तुझा
सांगतो माझ्या मनी ।
कसे मानू आभार
आहे मी ऋणी ।
Sanjay R.
मिळाली साथ जीवनाची
अर्धांगिनी तू आयुष्याची ।
सुख दुःखात देतेस साथ
चिंता साऱ्या परिवाराची ।
सकाळपासून किती राबते
फुरसत नसते क्षणाची ।
तरी असतो हसरा चेहरा
खबर तुजला प्रत्येकाची ।
हवे नको ते सारेच बघते
काळजी नसते स्वतःची ।
आई पत्नी सूनही होतेस
जाण तुलाच नात्यांची ।
तुझ्या विना विचारच नको
माऊली तूच ग सगळ्यांची ।
Sanjay R.
संसाराची दोन चाके
आयुष्याचा रथ हाके ।
होतो पुरुष पुढे आणि
अर्धांगिनी त्याच्या मागे ।
जीवनाला मिळे गती
भार उचलून चाले दोघे ।
थांबण्यास वेळ नाही
कष्टातून नशीब जागे ।
Sanjay R.
इंद्रधनुचे तर रंग सात
पुरतात कुठे तिथे हात ।
रंगांची होते उधळण
आकाशाची अलगच बात ।
उदय असो वा होई अस्त
लाल रंगांची सूर्यास साथ ।
निळे निळे ते दूर आकाश
क्षितिजालाही मिळते मात ।
Sanjay R.