अशी कशी ही नजर
म्हणती वाईट कुणी ।
वाटते सारखी भीती
जणू मागे लागला शनी ।
पडता ऐक नजर
कुणी होतो घायाळ ।
वाटे हवे हवे काही
अंतर होते मधाळ ।
नजरेस मिळता नजर
हरपते कुणाचे भान ।
विसर पडतो सारा
नाही कश्यावर ध्यान ।
भुताटकीचा होई वार
लगता कुणाची नजर ।
लिंबू मिरची हवे मग
निघता निघेना असर ।
नजरेची किमया न्यारी
आहे किती ती भारी ।
डोळे उघडुन चाला
नजर नजरेस तारी ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment