शब्दांची होते किमया
त्यात जीवनाचा सार ।
कधी करती ते घात
सुटतो पायाचा आधार ।
शब्दांनी जुळते नाळ
फुलते नात्याची माळ ।
कधी घेती वेध अंतराचा
हृदयात होतो जाळ ।
शब्दांनी भरतो प्याला
गोड अमृत त्याला ।
कधी वाटती ते काटे
करती घायाळ मनाला ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment