बुरखा घुंगट
हवा कशाला ।
उन्हापासून
सौरक्षणाला ।
खवखवणार्या
नजरा किती ।
त्यांच्यापासून
कशी ही भीती ।
पूर्वा पारची
ही पद्धत कशी ।
स्त्री ला झाकून
ठेवायचे जशी ।
Sanjay R.
बुरखा घुंगट
हवा कशाला ।
उन्हापासून
सौरक्षणाला ।
खवखवणार्या
नजरा किती ।
त्यांच्यापासून
कशी ही भीती ।
पूर्वा पारची
ही पद्धत कशी ।
स्त्री ला झाकून
ठेवायचे जशी ।
Sanjay R.
करू कविता मी कशाची
हास्याची की आसवांची ।
शब्द जोडुनी होते कविता
मनातल्या विचारांची ।
मन होते व्यथित जेव्हा
होते बरसात अश्रूंची ।
सरसावतात पुसण्या हात
व्यथा काय ओल्या गालांची ।
आनंदाची किमयाच न्यारी
गाली लकीर हास्याची ।
मन सांगे मनास कसे ते
कथा सारी या भावनांची ।
Sanjay R.
फुलला आज गुलाब
पाकळ्यांना नाही गंध ।
मोगराही रुसलेला का
नाही पसरला सुगंध ।
गारवा थोडा हवेत
वाटे मनास धुंद ।
सोड रुसवा सखे तू
नेहमीचाच तुझा हा छंद ।
कोमेजला किती बघ
फुललेला निशिगंध ।
हसून बघ ना जरा
चाफा होईल बेधुंद ।
Sanjay R.
लागली आज संचारबंदी
कमी झाली मनातली रुंदी ।
नाही ही कुठली धुंदी
अंतरात अंतरालाच बंदी ।
वाटे जणू हृदयावर बंदी
ओठांवर शब्दांची मंदी ।
काढून सोने लावली चांदी
हलते मान जसा हा नंदी ।
Sanjay R.
सूर्य सकाळी आज
उगवलाच नाही ।
साम्राज्य धुक्याचे
झाले दिशा दाही ।
आले भरून किती
आभाळ काळे काळे ।
प्रकाश झाला मंद
दिसेना आकाश निळे ।
धारा पावसाच्या
गेल्या येऊन चार ।
भिजला गुलाब चिंब
पाकळ्यांवर प्रहार ।
Sanjay R.
झाले सारेच शांत
मन तरीही अशांत ।
शोधू कुठे तुला मी
क्षितिजास नाही अंत ।
लोपला सूर्य त्या कडेला
झाला प्रकाश निवांत ।
काळोख दाटून आला
नाही कुणास खंत ।
आकाश भरून आले
चांदण्या तिथे अनंत ।
हळूच मग चंद्र आला
होऊन एक संत ।
Sanjay R.
शोधले चाक मानवा
वेग प्रवासाला आला ।
शेकड्याने दूर अंतर
प्रवास क्षणाचा झाला ।
जळत होतो मनात किती
प्रवास आयुष्याचा झाला ।
अंत आला जवळ जेव्हा
बघा अग्नीचा जाळ झाला ।
कुठे अग्नी कुठे चाक
मनात कुठे उरला धाक ।
चकावरती प्रवास होतो
विझता अग्नी उरते राख ।
Sanjay R.
श्राद्धाचा मैना ह्या
न्हाई दिसत कावळा ।
मायबापाले तळपवलं
तुयासारखा तूच बावळा ।
कराची होती सेवा जवा
निस्ता खाल्ला तुन मेवा ।
मरून गेले तुया पायी
करशींन किती आता देवा ।
ल्हान जवा तू होता
केली किती तुयी फिकीर ।
तुया वानी गा औलाद झाली
चुकली किती हाताची लकीर ।
माय बाप देवावानी
थोडीशी तं कदर करा ।
मंग पायजा येईन कावळा
विच्छा त्यायची करन पुरा ।
Sanjay R.
स्तब्ध होतो मी
का बघताच तुला ।
कसे सांगू मी ग
डोळे खुणावतात मला ।
बोलताना ओठ तुझे
सांगून सारच जातात ।
कहाणी तुझी माझी
कानामध्ये गातात ।
मन घेतं वेध तुझा
भाव खोल अंतरात ।
सांगू कसे तुला मी
तूच माझ्या श्वासात ।
विसरतो सारेच मी
असतेस तू पुढ्यात ।
असताना तू समोर
बोलू कसा कोड्यात ।
मी कृष्ण तू राधा
वाजे बासरी गोकुळात ।
आठवांची आठवण
वसते माझ्या मनात ।
Sanjay R.
न जाने दिलको
क्या हुवा ।
देखे बिनाही उनसे
प्यार हुवा ।
झोका हवाका आया
और इकरार हुवा ।
दिलमे जागी उमंग
नजाने क्या हुवा ।
रुकी कुछ सासे,
तेज हुई धडकने
और प्यार हुवा ।
नही देखा उनको
और प्यार हुवा ।
Sanjay R.
कैसे रखु मै तुमको
करीब दिलके ।
ज्यो याद बार बार
आती हो ।।
अबतो तुम्हे दिलही
बना डाला ।
और याद दिलको
आती हो ।।
लागता था एक सपना
खोने का डर ।
और भुलनेकीं जो
आदत थी मेरी ।।
अब सपना ही मैने
सजया दिलमे ।
न तुटता, न भुलता हु
और तुम हो मेरी ।।
Sanjay R.
निघालं आज ऊन
झालं का सगळं धून ।
आला सूर्य डोक्यावर
दिसते आभाळ अजून ।
मधेच लपतो सूर्य
झाला थंड थोडा लाजून ।
जा बाबा पावसा थोडा
पडलो आजारी भिजून ।
जगू दे आता तरी
सांग राहायचं किती निजून ।
Sanjay R.
थांब ना ग सखे
नको दूर जाऊस ।
आभाळ आले भरून
येईल आता पाऊस ।
रस्ता हा वेडा वाकडा
नको ना तू धाऊस ।
सुटला वारा थंड
किती तुला हाउस ।
घे विसावा थोडा
दूर नको जाऊस
बसून बोल ना थोडं
एकटीच नको गाऊस ।
साथ हवी शब्दांची
वाट नको पाहुस ।
Sanjay R.
गणेशराव निघणार ना आता
झालेत दहा दिवस ।
इतकाच होता का हो आमचा
तुमच्या करिता नवस ।
किती छान गेलेत दिवस
आरती आणि प्रसदात ।
करमणार नाही हो मुळीच
तुमच्या विना या घरात ।
भाव भक्ती आनंद उत्साह
भरभरून दिला तुम्ही ।
म्हणून तर बाप्पा बाप्पा करतोय ना
इथे सारे आम्ही ।
Sanjay R.
कविता तुझ्या मौनाची
कथा ही जीवनाची ।
मौन तुझे निरंकाळ
शब्दांचा झाला दुष्काळ ।
नजरेला नजर नाही
कानावरती गजर नाही ।
आकाशाचे आभाळ झाले
ढगांमधून थेंब आले ।
सरसर सरसर ओले ओले
भिजून सारे चिंब झाले ।
Sanjay R.
बाप्पा निघाले परतीला
चला जाऊ या आरतीला ।
दिवस दहा आम्ही केली सेवा
आनंदाचा तुम्ही दिला मेवा ।
भाव भक्तीचा मनात भरला
राग द्वेष आता नाही उरला ।
प्रसाद मोदक प्रकार किती
उत्साहाच्या पेटल्या वाती ।
करू चला हो जयघोष आता
आरती गणेशाची गाता गाता ।
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या ।
Sanjay R.
आज दिवस तीन झाले
आला थोडा ताप ।
खोकल्यासोबत बघा
कशी लागते धाप ।
लागत नाही लक्ष
नकोच वाटते जेवण ।
दुखणे तीव्र हात पायाचे
कडू औषधांचे द्रावण ।
मळमळ वाटते थोडी
तोंडाला नाही चव ।
लाडू पेढे काहीही आणा
पांघरुणात ही लागते दव ।
पडायचे बिछान्यावर
सांगा झोपायचे किती ।
पडून पडून थकलो
दिवस आणि रात्र रीती ।
अशक्त वाटे शरीर
मनही झाले अस्वस्थ ।
होऊ दे ना बरे आता
येईल फिरून मस्त ।
Sanjay R.
कैसे मै मनाऊ तुम्हे
कैसे समाझावू तुम्हे ।
देखकर राह तुम्हारी
कुछ तो हो रहा हमे ।
हालत क्या दिलकी
कैसे कहू मै तुम्हे ।
ख्वाईश दिलमे मेरे
हसता देखू तुम्हे ।
दूर ना जाना कभी
साथ रहना हमे ।
मंजिल तो एकही है
पर खोना नहीं है तुम्हे ।
Sanjay R.
करून शिक्षित सोडिले
गुरुजी तुम्हीच आम्हा ।
परिश्रम गुरूजी तुमचे
सांगू कसे मी तुम्हा ।
अ आ इ ई पासून
झाली विद्येची सुरुवात ।
पाठ जीवनाचे गिरवले
शिकलो सारेच तयात ।
गुरूंची महिमा अपार
ज्ञानाचा ते सागर ।
जमेल तितकी आम्ही
घेतली भरून घागर ।
जीवनाची केली मग
त्यातूनच वाटचाल ।
गाठले उद्दिष्ट आम्ही
नसतील जरी विशाल ।
करतो नमन गुरुवर
ऋणी मी तुमचा पामर ।
तुमच्याविना नाही सिद्धी
पडेल कसा तुमचा विसर ।
Sanjay R.
वाहतुकीचे आलेत आता
नवीन नवीन भारी नियम ।
भरावा लागेल दंड मोठा
जाईल बघा खिशाचा दम ।
बेल्ट बांधा, हेल्मेट घाला
पिऊच नका हो आता रम ।
वाहन चालवा हळू हळू
अपघात होतील थोडे कम ।
खाच खळगे रस्त्यात गड्डे
सरकारचाच प्रश्न अहम ।
देईल कोण दंड त्याचा
उतरवा अधि काऱ्यांचा भ्रम ।
अतिक्रमण तर झाले इतके
करायचे सहन होऊन मम ।
रस्त्यात रस्ता शोधा आता
पडाल झडाल होईल धडम ।
व्यवस्थेचे तर बघाच आता
प्राण जातात कुणाला गम ।
अश्रू पुसायला नाही कोणी
सरकारनेही घ्यावेत श्रम ।
जगणे मरणे हाती कुणाच्या
पण रस्त्यावरती नको मरण ।
Sanjay R.
कुणास ठाऊक
मनात काय कुणाच्या ।
ठाव नाही लागत
तऱ्हाच अनेक मनाच्या ।
मधेच घेई उडान
पल्याड जाई आकाशाच्या ।
कधी आकार सुक्ष्म
मावे टोकावरती सुईच्या ।
आठवणींचा डॉगर इथे
कोपऱ्यात भरून मनाच्या ।
उठते काहूर कधी
थांग लागेना मनाचा कुणाच्या ।
Sanjay R.
आले आज बाप्पा घरो घरी
आनंद उत्साह दाटला उरी ।
भाव भक्तीचा मनो मनी
वंदन जोडूनी हात दोन्ही ।
विद्या सिद्धीचे दैवत गणराया
हवी आम्हास तुमची छाया ।
नाद निनादतो मोरया मोरया
बोला गणपती बाप्पा मोरया ।
Sanjay R.