करू कविता मी कशाची
हास्याची की आसवांची ।
शब्द जोडुनी होते कविता
मनातल्या विचारांची ।
मन होते व्यथित जेव्हा
होते बरसात अश्रूंची ।
सरसावतात पुसण्या हात
व्यथा काय ओल्या गालांची ।
आनंदाची किमयाच न्यारी
गाली लकीर हास्याची ।
मन सांगे मनास कसे ते
कथा सारी या भावनांची ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment