कधी पडतो पाऊस खूप
कधी दिसेचना त्याचे रूप ।
येतात कधी वादळ वारे
हाती निसर्गाच्या हे सारे ।
नसते कमी मेहनत माझी
पण नाही कुणा कदर त्याची ।
फळ मेहनतीचेही का मिळेना
गुन्हा काय माझा काहीच कळेना ।
Sanjay R.
कधी पडतो पाऊस खूप
कधी दिसेचना त्याचे रूप ।
येतात कधी वादळ वारे
हाती निसर्गाच्या हे सारे ।
नसते कमी मेहनत माझी
पण नाही कुणा कदर त्याची ।
फळ मेहनतीचेही का मिळेना
गुन्हा काय माझा काहीच कळेना ।
Sanjay R.
भाऊ दूर नको जाऊ
जग लय बेकार ।
डोळे उघडून पाय
खाऊन पिऊन देते डकार ।
वरून तुले म्हणन
लयच होता तू गा टिकार ।
पायजो बापू अजून कोनी
यक अजून शिकार ।
आमचा त ह्या धंदाच हाये
मातर तू करू नोको नकार ।
Sanjay R.
का काहीच कळेना
दूर जातात लाटा ।
येऊनिया काठावर
परत फिरतात वाटा ।
वाटतो जणू अबोला
काठा लाटांचा कसा ।
सागराने कशाला हा
घेतला असा वसा ।
नको काही काठाला
हवा थोडासा संवाद ।
अथांग किती सागर
का कशाचा हा वाद ।
स्वार्थ नाही कसला
उरते काय गाठीला ।
सुटेल साराच गुंता
भरती नि ओहटीला ।
Sanjay R.
कशावर मी सांगू हक्क
काहीच इथे उरले नाही ।
अंधार दिसतो काळा
सूर्याचा तर पत्ताच नाही ।
चांदण्याही लुप्त झाल्या
चंद्र तर उगवतच नाही ।
मिणमिणते ते काजवे
का ते रात्री जागत नाही ।
Sanjay R.
सरले दिवस आता
करू काय जाता जाता ।
बसु द्या ना थोडे तरी
सांगतो मी माझी कथा ।
गाठीला आहेत बांधलेले
त्यात साऱ्याच व्यथा ।
प्रश्न आहे पुढ्यात
चालेना आता माथा ।
Sanjay R.
अंतरातल्या विचारांना
शब्दांची हवी साथ ।
अवतरते मग कविता
घेऊन शब्दांचा हात ।
भावार्थ त्या रचनेचा
दिसे काय या मनात ।
आनंदाची अनुभुती
ती आनंदाची प्रभात ।
Sanjay R.
छंद नव्हे हा असा
ही तर आहे नशा ।
बघा जरा याची
झाली कशी दशा ।
सदा हाती मोबाईल
जणू झाला तो पिशा ।
कळेना काही कसे
विसरला हो दिशा ।
काळ वेळ नाही काही
चालतात उठा बशा ।
Sanjay R.
कसा हा जगण्याचा छंद
आयुष्यभर दरवळतो गंध ।
कधी हसतो मी दिलखुलास
आणि स्वतःतच होतो धुंद ।
वाट दुःखाची कधी येते
मग श्वास ही होतात मंद ।
सुख दुःख तर येती जाती
वेचतो त्यातून मी आनंद ।
Sanjay R.
लढेल मी हक्कासाठी
नका समजू मज अबला ।
पाळते माया ममता धैर्य
आहेच मी ही स्वयं सबला ।
आहे मी सीता मीच माता
आहे दुर्गेचे अभय मजला ।
नको पाहुस अंत रे माझा
कठोर किती कळेल तुजला ।
Sanjay R.
फुलांचा रंग आणि काट्यांचा संग
गुलाबालाच जमतो ।
मोगरा बिचारा देऊन सुगन्ध
स्वतःच दमतो ।
बाकी फुलांची व्यथाच वेगळी
कोण कुणात कसा रमतो ।
गळ्यातला होऊनही हार तुरा
तोही शेवटी जागीच सरतो ।
Sanjay R.
कसा रे तू माणसा
करशील किती लोभ ।
नको वागू असा
दिसेल तुलाही क्षोभ ।
जोर ज्याच्या हाती
दाखवितो तो रोब ।
साधा सरळ कुठे चाले
म्हणतात त्याला डूब ।
Sanjay R.
फुल जिथे तिथे काटे
सुखाला का दुःख वाटे ।
वाट प्रेमाची ही कठीण
वाटे सारे जग हे खोटे ।
होई अंतराला यातना
आसवे डोळ्यात दाटे ।
आशा तरीही सुटेना
हवे क्षण आनंदाचे छोटे ।
येरे येरे तू पावसा
केलास किती उशीर ।
वाट होतो पाहात
केलेस किती अधीर ।
पड आता आरामात
घेऊ नको तू विसावा ।
सगळे लागलेत कामाला
सोडू नकोस ओलावा ।
खूप तापला रे सूर्य यंदा
कर म्हणा थोडा आराम ।
बोलव ढगांना मदतीला
घेऊ नकोस तू विराम ।
शेत होऊ दे हिरवे छान
डोलतील सारी पिकं ।
बळीराजा होईल खुश
संपेल घरातलं धुकं ।
Sanjay R.
गणपा आमचा लय भारी
सिनेमा साठी करायचा चोरी
पहिला दिवस पहिला शो
शाळेला मग बुट्टी मारी ।
पिक्चरचा नेहमी ध्यास त्याला
हिरो बनून मारायचा फेरी ।
स्टाईल शिवाय जमायचे नाही
म्हणायचा नेहमी ओ तेरी ।
देखना एकदिन तुम भी सारे
आयेगी एक दिन पिक्चर मेरी ।
बघतोय आता सारेच आम्ही
गणपा फिरतो दारो दारी ।
Sanjay R.
सरला दिवस आता
रात्र परतून आली ।
चमचम करते चांदणी
राणी चंद्राची झाली ।
अंधार काळा त्यात मी
शोधतो सूर्याची सावली ।
चन्द्र बघतो दुरून सारे
हास्य चांदणीच्या गाली ।
Sanjay R.
साधा सरळ मी असा
कुठे जमते राजकारण ।
वेडे वाकडे मार्ग इथले
होतो मनस्ताप विनाकारण ।
हाजी हाजी इथे करायची
दहा वेळा पकडा चरण ।
साध्या सुध्यास कोण जुमनतो
त्याचे फक्त होते मरण ।
Sanjay R.
निसर्गाची किमया बघा
हिरव्या झाडाला लाल फुल ।
आकाशात दिसतात तारे
कुठून येतात वाहणारे वारे ।
आकाशातून पडतो पाऊस
कांपुटरला असतो माउस ।
माणसांची इथे किती गर्दी
पैसे लागतात करायला खरेदी ।
कुतूहलाचे सारेच विषय
कधीच कळेना कशाचा आशय ।
Sanjay R.
बाळ म्हणे जेव्हा आई बाबा
माय बापाला कुतूहल किती ।
पडे बाळाचं ते पाहिलं पाऊल
सगळ्यांना वाटे नवल किती ।
बाळ हळू हळू मग मोठे होई
जडते सगळ्यांची किती प्रीती ।
आनंदाचा मग प्रत्येक क्षण
आई बापाची फुलते छाती ।
मोठे मोठे मग जेव्हा होते बाळ
आई बापास वाटते भीती ।
सोडून तेव्हा मग जातो बाळ
आई बापाची थांबते गती ।
नाना विचार येतात मनी
का ही अशी जगाची रीती ।
म्हातारपणाचा सहारा तुटतो
का क्षणात सरते सगळी नाती ।
Sanjay R.
येईल तो ही दिवस
पूर्ण होईल नवस ।
मिळेल साथ जन्माची
नसेल चिंता हसण्याची ।
असेल हातात ही हात
जन्मभराची मिळेल साथ ।
सरेल मग दुःख सारे
वाहतील आनंदाचे वारे ।
Sanjay R.
जन्म होताच बाळाचा
शोध होतो नावाचा ।
नामकरण होते जेव्हा
कानात गजर नामाचा ।
हसते खुदकन बाळ कसे ते
ऐकून उच्चार कामाचा ।
बोल बोबडे त्यासी कळते
होतो किती मग लाडाचा ।
नाव विचारता कोणी त्याला
साथीला उल्लेख बापाचा ।
नाव कमावून होतो मोठा
मान मिळवितो नावाचा ।
Sanjay R.
भावनेला द्यायची
कधी मोकळी वाट ।
त्यातही वाटते मग
रम्य किती पहाट ।
नवं रंगांची उधळण
निसर्गाचा कसा थाट ।
झुळझुळ वाहे पाणी
तुडुंब भरतील पाट ।
डोंगर दऱ्या उंच पहाड
हिरवी हिरवी झाडी दाट ।
पुढे पुढे मग जावे जसे
संपते कुठे कळेना वाट ।
अथांग हा सागर कसा
येतो घेऊन उंच लाट ।
रूप बघतो मी धरेचे
आहे कसे किती विराट ।
Sanjay R.
कुठे काय हो बघायचे
सांगा कसे वागायचे ।
सुख थोडे तरी द्यायचे
दुःख सारेच घ्यायचे ।
अश्रू डोळ्यातच प्यायचे
हास्य मुखावर बघायचे ।
भूतकाळ विसरून सारा
भविष्य आनंदात जगायचे ।
Sanjay R.
कशी ही जादू
कसा हा टोना ।
जगतो जीवन
पण एकच रोना ।
रडतो जास्त
पण हसतो कमी ।
दिसेल डोळ्यात
नेहमीच नमी ।
आसवांचे इथे
काय मूल्य ।
दाबून टाकायचे
मनातले शल्य ।
उठून लागतो
जेव्हा वाटेला ।
खिळावे वाटते
धरून खाटेला ।
वाटतं मला
मीच लाचार ।
सुख विसरतो
दुःखाचा प्रचार ।
Sanjay R.
सक्काळी सक्काळी
जावे आपल्या गावी ।
स्वागताला हजर सारे
गोष्ट ही नाही हो नवी ।
रहस्य कुठले नाही यात
जो तो वेशिकडे धावी ।
प्रथा ही दिसेल तुम्हा
प्रत्येकच गावो गावी ।
Sanjay R.
😊😊😊😊
बालपणीच्या त्या आठवणी
वाटतं परत व्हावं लहान ।
खेळावं बागडावं मस्त उडावं
परत शाळेत जावं छान ।
मित्रांशी घालावा तसाच गोंधळ
नवे कपडे घालून मारावी शान ।
खोड्या काढाव्या कुणाच्याही
जेव्हा नसता कुणाचेच भान ।
काढून एक चित्र गुरुजींचे
फाडावे तसेच वहीचे पान ।
गुरुजींचा पडता मार मग
व्हावे अजूनच खूप लहान ।
आईचा मार बाबांचा धाक
पाठीवरच्या वळांचे ते निषाण ।
परत वाटतं हवं हवं सारं
व्हायचं मला परत एकदा अजाण ।
संजय रोंघे
सगळेच जिथे रहस्य
तेच ते आहे गाव ।
असू द्या ना काहीही
त्या छोटया गावाचे नाव ।
झुळ झुळ वाहते नदी
निसर्ग घेतो मन मोहून ।
आंबा चिंच गोड आंबट
तोडावी वाटते धावून ।
मूठभर दाणे पेरायचे
पोते भरून आणायचे ।
काय किमया होते बघा
रहस्य तिथल्या मातीचे ।
माणसंही साधी भोळी
लळा लावून जातात ।
गरीब असला तरी हो
श्रीमंती त्यांच्या प्रेमात ।
अशी कित्येक रहस्य
दडलीत त्या गावात ।
एकदा फक्त जाऊन बघा
कळेल सारे एका डावात ।
Sanjay R.
कळले मज सारे
कशात माझे हित ।
वागणे तुझे बघ
आहे कशी ही रीत ।
हरणार सांग कशी
होईल तुझी जित ।
माझी तू मी तुझा
ही आपली मित ।
बहरू दे आता
तुझी माझी प्रीत ।
Sanjay R.
तुझा आणि माझा
एक अनामिक संबंध ।
आठवणीनेही मीही
होतो कसा बेधुंद ।
आभास मनाला
दरवळतो सुगंध ।
करतो स्मरण किती
लागला तोच छंद ।
Sanjay R.
आयुष्याचे रंग अनेक
सुख दुःखाचा त्यात रिटेक ।
गालावर हास्य डोळ्यात अश्रू
वाटते कधी सारेच फेक ।
रंग अनेक ढंग अनेक
मिळतात कधी माणसं नेक ।
Sanjay R.
तुझ्या माझ्यात आज
करू एक करार ।
कागदावर नकोच तो
होतो नेहमी फरार ।
मनाचेही खरे नाही
नेहमीच पडते दरार ।
तुझे तू माझे मी
हाच आता विचार ।
दूर झालो दोघे तर
होईल कोण लाचार ।
मी एक सदाचार
तू तर भ्रष्टाचार ।
दुर हो आता तरी
नको मला आधार ।
Sanjay R.
पहिल्या पावसाची आज
झाली बरसात ।
घेतले चार थेंब मी त्यातून
पसरवून हात ।
गार आकाशातले ते पाणी
थांबेना हातात ।
जो तो होता किती डोलत
झाडही होते हालत ।
माती झाली थोडी ओली
धुंद सारे गंधात ।
गीत पावसाचे होते त्यात
पक्षांचा चिवचिवाट ।
ढोल वाजला आकाशी
ढगांचा गडगडाट ।
मधेच वीज येऊन गेली कशी
तिचाही कडकडाट ।
वाऱ्यालाही होता किती जोर
धावला गारव्यात ।
ढगांनी झाकले सारे आकाश
वाटे झाली ही प्रभात ।
Sanjay R.
बघत होतो मी आकाश
ढगांचा नव्हता पत्ता ।
आकाशात चोही कडे
सुर्याचीच होती सत्ता ।
चट चट झोंबायच ऊन
अंगाची व्हायची लाही ।
गळ्याला पडली कोरड
पाण्यासाठी मचली त्राही ।
नदी नाले पडले कोरडे
विहिरीत नाही उरले काही ।
काळ्या ढगांची वाट आता
भिर भिर सारे आभाळ पाही ।
येऊ दे रे पहिला पाऊस
मीही थोडं भिजून घेईन ।
वादळ झाले वारे झाले
सांगा पाऊस केव्हा येईन ।
Sanjay R.
प्रेमाचे किती प्रकार
जणू जडलेत विकार ।
नाही त्यास अस्तित्व
नाही कुठला आकार ।
अंतरात चाले सारे
किती किती ते विचार ।
जुळले जर सारेच
तेव्हाच होई साकार ।
नशिबात नसेल तर
मिळेल फक्त नकार ।
Sanjay R.