Saturday, August 26, 2017

" राम रहीम आसाराम "

नावात त्यांच्या राम
भोंदु बाबास प्रणाम ।
राम पाल कुणी तर
राम रहिम आसाराम ।
भोळी भाबडी जनता
नकळे तयासी हराम ।
बुद्धी शुद्धी हरपली
बळी घेतो नराधम ।
नाही सोडले देवा तुज
आडोशाला तुझे नाम ।
चाले लबाडी लफंग्यांची
करी चारीत्र्य निलाम ।
भोळा भक्त देवा तुझा
झाला राक्षसांचा गुलाम ।
Sanjay R.

" ध्यास "

लागला ध्यास
अंतरात विश्वास
एक एक श्वास
मनी आभास
चालला प्रवास
कधी फास
कधी सुहास
आनंद निवास
जिवन खास
Sanjay R.

Thursday, August 24, 2017

" वेध "

नजरेने तुझ्या ही
काय जादु केली ।
सर्वस्व विसरलो
तहान भुक नेली ।

सदैव तुझेच वेध
झोप माझी उडाली ।
स्वप्नातही तुच असे
जिव होतो वर खाली ।

हसतो मी पण बघुन
हास्य तुझ्या गाली ।
शोधतो भिर भिर मी
आहेस तुच खयाली ।
Sanjay R.

Monday, August 21, 2017

" पावसाची सर "

बघुन वाट पावसाची
जिव बळीराजाचा झाला अधर ।
सुखावला किती तो
येता एक पावसाची सर ।
पाठी कर्जाचा डोंगर
वाटे का होइल त्यात अजुन भर ।
पावला बघा देवच जसा
फुलली शेतं आला आनंदाला बहर ।
नद्या नाले सारं भरु दे आता
होती सारखी त्याची आकाशी नजर ।
हात जोडुन करतो धावा
देवा ढगांचा आकाशी होउ दे गजर ।
Sanjay R.

Thursday, August 17, 2017

आभाळ

आभाळाला लाउन बसला
बळीराजा आपला डोळा ।
आकाशातल्या ढगांमधे
शोधतो तो ढग काळा ।
हिरमुसलेली शेतं बघुन
हुंदक्याने दाटला गळा ।
विखुरताहेत स्वप्न सारी
निघाली आसवं घळघळा ।
Sanjay R.

Monday, August 14, 2017

नंद लाला

गोपाला गोपाला
तु गिरीधर लाला ।
क्रिष्ण कन्हैय्या तु
देवकी नंद लाला ।

आवडीचे तुझ्या
दही दुध लोणी ।
गोपीकांचा लाडका
नसेल इतका कोणी ।

मैत्रीची मिसाल तु
मित्र तुझा सुदामा ।
संपला दुष्ट तो
कपटी कंस मामा ।

सुर बासरीचे ऐकुन
होइ वेडी ती राधा ।
अर्जुनाचा सारथी तु
महाभारताचा विधाता ।
Sanjay R.

फाटका संसार

मोठे किती
हे घर आमचे ।
खाली धरती
वर आकाश ।
आडोशाला
आहेत दगड ।
पाउस पाण्याची
नाही चिंता ।
फाटका संसार
जिवनाची व्यथा ।
पोटाची भुक
जळती गाथा ।
Sanjay R.





Tuesday, August 8, 2017

" आनंद "

मैत्रीचा एक हात
सार्या जिवनाची साथ ।
चढ उतार जिवनातले
करुन त्यावर मात ।
जगायचं सारं आयुष्य
रोज नवी प्रभात ।
जावं लागेल सोडुन
कधी एक क्षणात ।
तोवर हसायचं
खुप खुप आनंदात ।
Sanjay R.

Thursday, August 3, 2017

" मनच जळलं "

कसं कुणास ठाउक
पण आज कळलं
माणसाचं ना
मनच जळलं ।
माणसांनी माणसांना
किती छळलं ।
माणुसकी बघुन
सारं जग हळहळलं ।
माणसाचं ना
मनच जळलं ।
वाटलं होतं
संकट टळलं ।
आलेलं तुफान
मागच्या मागे वळलं ।
विचारांचं आवरण
कित्ती मळलं ।
माणसाचं ना
मनच जळलं ।
Sanjay R.

Wednesday, August 2, 2017

" हो गयी रात "

ढल गया दिन
हो गयी रात
न जाने कब होगी
उनसे मुलाकात ।
आज दिलमे है
कुछ मनकी बात ।
चांद को मीला
चांदनी का साथ ।
मिले जब दोनो
हातो मे हात ।
ढल गयी रात
अधुरी मुलाकात ।
दिल मे रह गयी
दिल की बात ।
साथ सुरजके
फिर एक शुरुवात ।
कब होगी रात
होगी कब मुलाकात ।
Sanjay R.

" मनमोहना "

मनमोहना सुर तुझ्या बासरीचे
कीती मोहविती मजला ।
स्वरांच्या मैफलीत झाले मी सुर
शोधते तुजला ।
Sanjay R.