नावात त्यांच्या राम
भोंदु बाबास प्रणाम ।
राम पाल कुणी तर
राम रहिम आसाराम ।
भोळी भाबडी जनता
नकळे तयासी हराम ।
बुद्धी शुद्धी हरपली
बळी घेतो नराधम ।
नाही सोडले देवा तुज
आडोशाला तुझे नाम ।
चाले लबाडी लफंग्यांची
करी चारीत्र्य निलाम ।
भोळा भक्त देवा तुझा
झाला राक्षसांचा गुलाम ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment