कसं कुणास ठाउक
पण आज कळलं
माणसाचं ना
मनच जळलं ।
माणसांनी माणसांना
किती छळलं ।
माणुसकी बघुन
सारं जग हळहळलं ।
माणसाचं ना
मनच जळलं ।
वाटलं होतं
संकट टळलं ।
आलेलं तुफान
मागच्या मागे वळलं ।
विचारांचं आवरण
कित्ती मळलं ।
माणसाचं ना
मनच जळलं ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment