Thursday, December 28, 2017

" दिलमे तुम "


दिलने जब तुम्हे
याद किया ।
तब तब हमने
तुमको पाया ।

दिलमे है रक्खा
बस एक साया ।
हो वह तुम या
तुम्हारी छाया ।

कौन अपना
कौन पराया ।
तुमही तुम हो
मेरी काया ।
Sanjay R.


" मनातलं जंजाळ "

मनात विचारांच
महा जंजाळ ।
घोंगावतात सारे
होताच सकाळ ।
गुणगुण त्यातली
असे गोड मधाळ ।
जिवनासी करी मग
तिच रसाळ ।
Sanjay R.

Wednesday, December 27, 2017

" उंच भरारी "

उंच उंच आकाशात
घेतं मन भरारी ।
कधी अंतराचिच
होते वारी .।
येतं फिरुन क्षणात
दिशा चारी ।
जिवाला जिव कधी
होतो भारी ।
कधी ताटकळत बसतो
ह्रुदयाच्या दारी ।
आधार शब्दांचा त्यास
लावितो पारी ।
मुखातले बोल कसे
देइ ललकारी ।
नजरेत दिसे भावनांचे
लक्ष जरतारी ।
Sanjay R.

Monday, December 18, 2017

" श्वास "

बघुन तुझे हास्य वाटतं
मीही खुप हसा्वं ।
लटका राग बघुन तुझा
मीही थोडं रुसावं ।

सुंदर किती नयन तुझे
त्यातच सारखं बघावं ।
गालावरची खळी तुझ्या
हलकेच त्यासी जपावं ।

ओठ तुझे मधुघट जसे
मध ओठांनीच टिपावं ।
शब्द तुझे लाघवी किती
सतत तुलाच ऐकावं ।

सुडोल कसा बांधा तुझा
घेउन मिठीत तुज छळावं ।
श्वास तुझा माझे जिवन
श्वासां मधेच जगावं ।
Sanjay R.

" ओ जाने जाना "

क्या था वह जमाना
था जब मै तेरा दिवाना ।

पहुच जाता करीब तुम्हारे
ढूंडके कोई एक बहाना ।

दिलमे होती तस्वीर तुम्हारी और
मन ही मन कुछ गुनगनाना ।

अब भी वही बात है दिलमे
प्यारीसी तुम ओ जाने जाना ।

राह चलते अजनबी ही सही
कभी तुम युही मुझे मिल जाना ।
Sanjay R.

Saturday, December 16, 2017

" हो वही तुम "

यु ही तुम हमे ऐसे
तडपाया ना करो ।
एक झलक रोज तो
युही दिखाया करो ।

लगती हो तुम हमे
जन्नत की कोई परी ।
सह न पायेंगे अब हम
बीचकी यह दुरी ।

लिये हु दिलमे मिलन
की एक आस ।
कहो कब आयेगा वो दिन
जो होगा हमारा खास ।
Sanjay R.

Friday, December 15, 2017

" मी आणी माझी मैत्री "

मैत्रीची हो ही
दुनीयाच न्यारी ।
एकाहुन एक इथे
आहेत लय भारी ।

सुख: दुखाचे
सारेच साथी ।
उरेल कशाची
हो मग भीती ।

तरीही  खंत
होतीच मनात ।
दुर गेले सारे
नाही उरले गावात ।

सगळेच लागले
आपल्या कामी ।
वाटे विसरलेत तर
नाही ना मित्रभुमी ।

आता मात्र किती
हो झाले बरे ।
उघडा मोबाईल
दिसतात सारे ।

मिटला दुरावा
जवळीक झाली ।
हास्य परतले
दिसतय गाली ।
Sanjay R.

Thursday, December 14, 2017

” जिवन प्रवास “



माझा शेती प्रपंच ”

पप्पा तुम्ही गेलात आणी मग
आली शेती माझ्या हाती ।

फिरुन फिरुन बघीतली सारी
काळी भोर तीची माती ।

तोलुन मापुन बोलुन सारी
आपलीशी केली सगळी नाती ।

डोंगर वाढला कामाचा
कळले मज वळायच्या वाती ।

नागरण वखरण पेरणी डवरण
सगळी कामं पावसाच्या घाती ।

शोधायचे आकाशात ढग काळे
आणी मोजायचे झाडावर बोंडपाती ।

मजुरांचा प्रश्न किती आहे भारी
धाप लागते जिवाला भरुन येते छाती ।

डोक्यावर असतो काळजीचा डोंगर
सांगा कशी येयील हो झोप राती ।

पावसाचे असते वेगळेच नाटक
नको तेव्हा पडुन धरतो छाती ।

बी बियाणे औषध खते
पै पै लागतो हिशोब तरी कीती ।

बाजारात मालाला मिळत नाही भाव
फळफळतात नुसत्या व्यपार्यांच्या जाती ।

हाती आलेल्या पिकाची हो
बघावी लागते माती ।

नका मोजु तुम्ही राजेहो
फाटक्या शर्टाला ठिगळं कीती ।
Sanjay R.


कापसाला का नाही भाव “

काय सांगु राव
नाही कापसाला भाव ।
निवडणुकी आधी
किती मारला ताव ।

चांगल्या दिवसांची
किती वाट पहाव ।
शेतकरी करतो
किती धावाधाव ।

चोर तो माल्या
बनुन बसला साव ।
व्यापार्यांना कीती
पैशाची हाव ।

उपाशी पोटी
झोपतो सारा गाव ।
मेहनत करुनही का
त्यानेच असे मराव ।

उठा कोणीतरी
सांगा बाजार भाव ।
मंतर द्या म्हणा
नाहीतर दिसेल प्रभाव ।

अतीच होतय आता
विसरा घुम जाव ।
जागा झाला बळी तर
उरणार नाही नाव ।
Sanjay R.

जिवन प्रवास “

दिवस तसा आजचा
किती खास आहे .
तुझ्या आणी माझ्या
मिलनाचा हा प्रवास आहे .

आठवते ती पहिली भेट
अजुनही तिच आस आहे .
नसतेस ना तु जेव्हा
मनाला तोच ध्यास आहे .

गालात तुझे हसणे
आणी हलकेच रागावणे
तोच तर सहवास आहे .
कसा विसरेल ते क्षण
त्यातच माझा श्वास आहे .

जपलीत मी ती सारी फुलं
त्याच्यासाठी तु आकाश आहे.
फुलं मुलं काळजी किती
घराला तुझाच सहवास आहे .

तु मी आणी आपलं जग
सार्यांचाच तु विश्वास आहे .
रस्ता अजुन सरला नाही
अनंताचा हाच प्रवास आहे .
Sanjay R.

पावसाची सर “
बघुन वाट पावसाची

जीव बळीराजाचा झाला अधर ।

सुखावला किती तो

येता एक पावसाची सर ।

पाठी कर्जाचा डोंगर

वाटे का होइल त्यात अजुन भर ।

पावला बघा देवच जसा

फुलली शेतं आला आनंदाला बहर ।

नद्या नाले सारं भरु दे आता

होती सारखी त्याची आकाशी नजर ।

हात जोडुन करतो धावा

देवा ढगांचा आकाशी होउ दे गजर ।

Sanjay R.


" आभाळ "
आभाळाला लाउन बसला

बळीराजा आपला डोळा ।

आकाशातल्या ढगांमधे

शोधतो तो ढग काळा ।

हिरमुसलेली शेतं बघुन

हुंदक्याने दाटला गळा ।

विखुरताहेत स्वप्न सारी

निघाली आसवं घळघळा ।

Sanjay R.


मनच जळलं “

कसं कुणास ठाउक

पण आज कळलं ।

माणसाचं ना

मनच जळलं ।

माणसांनी माणसांना

किती छळलं ।

माणुसकी बघुन

सारं जग हळहळलं ।

माणसाचं ना

मनच जळलं ।

वाटलं होतं

संकट टळलं ।

आलेलं तुफान

मागच्या मागे वळलं ।

विचारांचं आवरण

कित्ती मळलं ।

माणसाचं ना

मनच जळलं ।

Sanjay R.

पेटते चुल “
संसार फाटका
काखेत मुल ।
घालुन फुंकर
पेटते चुल ।

डोळ्यात आसवं
विचारांना हुल ।
दिवस रात्र
भुकेला भुल ।

स्वप्नात बघते
नवी एक चाहुल ।
गुलाब फुलवतो
काट्यात फुल ।
Sanjay R.


दी दिवाळी “

दी दिवाळी
कसली नव्हाळी .
पोटाला हवी
भाजी अन् पोळी .

मुल आजारी
नाही त्याला गोळी .
लुटताहेत सारे
लफंग्यांची टोळी
.
बघुन झगमगाट
मन मनातच जळी .
फुलायच्या अगोदर
असते ना कळी
.
चिखल सारा
सागराच्या तळी .
Sanjay R.


पावसा तुला सलाम “

पावसा पावसा
नसला तु तर
सार्यांनाच फुटतो घाम ।

असाच थोडा
करत तु जा
मधे मधे मुक्काम ।

नदी नाले
भरुन थोडे
टाक घेउन आराम ।

पीक पाणी
झाडं झुडपं
फुलव निसर्ग तमाम ।

केलास ना तु
आता थोडासा मुक्काम
थांबलेत सगळे काम धाम ।

करु दे थोडी कामं
तोवर तुला
मिळेल छान आराम ।

असाच कधी मधी
जात येत रहा मग
सारेच करतील सलाम ।
Sanjay R.

दार मरणाचे “

स्वप्नांच्या या दुनियेत
आहे स्वागत सर्वांचे ।
विचार झालेत स्वैर
राज्य इथे दुष्टांचे ।

सफर अंतराळाची करा
घर तिथे चांदण्यांचे ।
भुतलावर चालाल तर
घाव झेला माणसांचे ।

आकशी चंद्राची शितलता
धरेवरी सुर्याची प्रखरता ।
विचारांचे बांध तुटले
पुर वाहताहेत रक्तांचे ।

आसुसलेली माणसं इथं
वैरी आहेत एकमेकांचे ।
नाही उरले काळीज कुठेच
ढीग लागले प्रेतांचे ।

सुर्यावरच जाउ आता
लाकडं वाचतील दहनांचे ।

कोण कुणाचा काय लागतो
उघडे दार मरणाचे ।
आसवांना नाही थारा
शब्द गुंजतात हास्याचे ।
Sanjay R



आषाढ वारी “

मुखी हरी नामाचा गजर
निघाली पंढरपुराला वारी ।
मनात ध्यास विठ्ठलाचा
विसरला तहान भुक सारी ।

टाळ मृदंगाच्या नादात पडे पाउल
पुढे जाया हरीच्या द्वारी ।
आज एकादशीचा दिवस
लोटला जन सागर पंढरी ।

चंद्रभागेत भिजताच पाय
संचारला मनी उत्साह भारी ।
ओढ लागली दर्शनाची
ठेउनी आला सुख दुःख घरी ।

मनी एकच आशा दर्शनाची
बाप माय तुची माझा हरी ।
भाव श्रद्धा देवा तुझ्या ठायी
टेकवतो माथा तुझ्याच पारी ।

फिटले याची देहाचे पारणे
सफल झाली जन्माची वारी ।
जय जय हरी जय जय हरी
विठ्ठल हरी विठ्ठल हरी ।
Sanjay R.


लाव जिव थोडासा “

असा कसा रे तु माणसा
नको वाटे तुज लेक लाडाची ।
नको करुस असा फरक
देइल तुज सावली झाडाची ।

गर्भातच तीचा करीशी अंत
कसा होशील रे तु निवांत ।
जन्मा आधीच घालवतो तु
का मनानं होशील तु शांत ।

भेद मुला मुलीचा का करीशी
माया करील कोण तुझशी ।
आसवं पुसाया येयील ती
रडेलही तीच घेउन तुज उशाशी ।

नको लोटुस असा रे तीला
आहे प्रेमाची तीच मुरती ।
लाव थोडासा जिव तिजला
करील जिवनाची तुझ्या पुरती ।
Sanjay R.


कोण मी कुणाची आई “

कोण मी कुणाची आई
मला तर आता कुणीच नाही ।

दोन मुलांना देउनी जन्म
जपले तयासी राई राई ।

पंख पसरुनी झेप घेता
उरले पदरी काहीच नाही ।

जिव छोटासा कराया मोठा
हसणे रडणे कळले नाही ।

बाळ तानुला निजण्यासाठी
रात्री सरल्या करीत गाई ।

तहान भुकेचे सारेच केले
स्वप्न पाहुनी दिशा दाही ।

पै पै जोडुन शिक्षण केले
उतारवयाला न उरले काही ।

मोठ्ठा झाला लेक लाडका
गेला सोडुन बाप आई ।

वृद्धाश्रमही नाही नशीबी
काळजी आमची कोण वाही ।

अंत घटिका मोजतो देवा
ठेउनी माथा तुझ्या पायी ।
Sanjay R.

सुई आणी दोरा “
काय सांगु दुःख मी दादा
नशीबाचा आहे हा फेरा ।

लावले जागोजागी ठिगळं
घेउन सुई अन् दोरा ।

नको तानुस तु जास्त
होइल उघडा सारा पसारा ।

नाही सरणार दुःख माझी
नियतीचा हाच इशारा ।

काळ्या अंधारात शोधतो मी
माझ्या मनातला तारा ।

देवा उगवतीच्या सुर्या संगे
होवु दे जिवनात प्रकाश सारा ।
Sanjay R.


जिवनाची जोड “

नाही खाण्यास गोड धोड
पोर बघा हो झाली कशी रोड ।
पैसा पैसा का असा
त्याची कशी जिवनाशी जोड ।

नाही जुळले माझे तया
नाही गवसली कुठे तोड ।
पाहतो सार्या दीशा असा मी
सारेच करती लुटायची होड ।

देतो सोडुन आता सारे
नाही पेलवत मजला लोड ।
पाश उलटले जिवनाचे आता
फंदा वेडावतो कसा बेजोड ।

सरली आसवं डोळ्यातली
पेटु दे चीता दुर सार गिधाडं ।
नको रडउस तान्हुल्यासी
हसाया देजो धाडुन एक झाड ।
Sanjay R.


वर्हाडी ठेचा “

काल गेलो होतो
मी एका आफीसात ।
सरकारी हाफीस ते
सारेच होते बंदोबस्तात ।

बाबु पाशी गेलो
मनलं काम कवा होइन ।
म्हनते कसा बाबु
भेटन वेळ तवा मी पाइन ।

मनलं बाबुले पहानजी जरा
महीने झाले नाइन। ।
तो म्हने भेट मंग
रात्री घेउ थोडी वाइन ।

म्या म्हनलं मंग
देतो न जी क्वाइन ।
रात्री भेटशीन त
उद्या काम तुहं होइन ।

नियमच हाये तसा
काय काय मी पाहीन ।
रात्र झाली जंगी
निपटलं काम बहीन ।

फालतुच होतो बसला
कामाची कीती वाइन ।
Sanjay R


घरटे सुखाचे “

देवु कसा मी ओ
तुझ्या आर्त हाकेला ।
मनाच्या खोलात तु
आहेस सदा साथीला ।

आठवणींच्या विश्वात
वीणले प्रीतीचे जाळे ।
भरुन आले बघ अंबर
ढग निळे काळे ।

साठला पूर आसवांचा
भिजले तयात डोळे ।
पुसाया शोधतो मी आता
उघड तुच ताळे ।

तुझ्या शिवाय नाही काही
माझा मीच म्हणायला ।
साथ मज तुझी हवी
घरटे सुखाचे विणायला ।
Sanjay R.


विसरलो हसणं “

खरच का विसरलो
आम्ही हसणं ।
आपलसं केलय
तणावात असणं ।

प्रगतीच्या वाटेवर
का नुसतच जगणं ।
कपाळावर आठ्या
आणी विचारात फसणं ।

जगाच्या यादीत
कुठेच नसणं ।
चिंताच सार्या आणी
श्वास ढकलणं ।

कुठवर चालायचं
खोलात रुतणं ।
द्याना कोणी
हास्य उसणं ।

नाहीतर होइल
असुन नसणं ।
Sanjay R.


वय म्हातारं “

तुटला संसार
मोडले घर ।
सारे जिवन
झाले अधर ।

पाणावलेले डोळे
झुकली नजर ।
त्राण सरले
मनात थरथर ।

टेकले हात
झुकले अंबर ।
वय वर्ष
झाले शंभर ।

जगलो वाचलो
कुणास कदर ।
नाही उरला
शेला पदर ।

नाती गोती
मायेची पाखरं ।
नको कुणालाच
घरात म्हातारं ।

इच्छाच सरल्या
नको वाटतं सारं ।
वेध लागले आता
जायचे वर ।
Sanjay R.


उजाड धरा “

तोच चंद्र तोच तारा
झोंझावत येणारा
वादळी वारा ।

सागराचा कधी
तर नदीचा किनारा ।
पक्षांची किलबील
सृष्टीचा नजारा ।

जिकडे तिकडे त्यात
माणसांचा पसारा ।
जशा ओसंडुन वाहणार्या
पावसाच्या धारा ।

सोबतीला जिवघेण्या
टप्पोर्या गारा ।
थकली भागली
उजाड धरा ।

थोडासा विचार
सारेच करा ।
संपलं हे सारं तर
काय असेल तर्हा ।

थांबवा पर्यावरणाशी
खेळणे जरा ।
Sanjay R.



माझे घर “

इमारती चढताहेत आकाशी वर
रहायला नाही आम्हा छोटेसे घर ।

तुटके फुटके नावाला छप्पर
भिजउन जाते पावसाची सर ।

नाहित भिंती झोपडी ही अधर
झुळकीनं वार्याच्या होते थर थर ।

दोन हात जागेत चललाय बसर
गरिबाच्या जगण्याची कुणास कदर ।

दिवस रात्र चालतो कष्टाचा नागर
तरी फाटकाच आहे साडीचा पदर ।

दोन हजार विस पर्यंत सार्यांना घर
लाउन बसलोय तिकडेच मी नजर
Sanjay R.


जगत्दात्री मी “

कोण मी काय नाते तुजशी माझे
होउनी अर्धांगिणी जपते स्वप्न तुझे ।

कुणाची मी बहिण कुणाची माता
त्यागाची धरुनी मशाल जळते स्वताः ।

जगत्दात्री मी या धरेची गाथा
सोसते दुःख सारे पदरात व्यथा ।

आसवांच्या सागरातले मी कमळ
झेलुनी मार लाटांचा आहे अढळ ।
Sanjay R.



रोषणाई “
            1
रंग जिवनाचे कीती काही
झोपडीत काळा अंधार
आणी महाली रोषणाई ।

कुणाच्या शर्टाला टाई
कुणास पांघराया नाही काही ।

फिरतो वणवण दीशा दाही
कुणी गेला वाया पैशा पाई ।

कुणा भुके विना झोप नाही
कुणी वेडा व्यसनाच्या ठाई ।

ज्योत दिव्याची जळत जाई
कहाणी ओल्या शब्दांची शाई ।
Sanjay R.


पपी लाडाचा “
लेकीला माझ्या
पिल्लाचं वेड ।
ए बी सी डी टु
एक्स वाय झेड ।

दिवसभर असते
पपीच्या मागे ।
निरागस मनाचे
अतुट धागे ।

दुधातले दुध आणी
पोळीतली पोळी ।
सारखेच तिच्या
भरवते वेळी ।

दुपारची मस्ती
पपीला पांघरुण ।
शाळेला जाते
काळजीचे सांगुण ।

झोपेतही विचारते
झोपला का पपी ।
हो कळताच ती
होते हॅप्पी

दिवस उजाडताच
पपीची आठवण ।
बघतो वाट
तिचीच तो पण ।

छोटी छोटी मनं
आणी प्रेमाचे क्षण ।
असाच घडावा
प्रत्येक जण ।
Sanjay R.


बळीराजाची व्यथा “

बळिराजा तु, नाही तुज
उन्हा तान्हाची फिकीर ।
पान्या पावसाशी तुझी
किती जुळली लकीर ।

उपसतो कष्ट किती
होतोस तु अधीर ।
पावसाच्या वाटेवर
नजर लागे भीर भीर ।

वेडावती ढग तुला
कधी होतो मग उशीर ।
कधी होतो पुर पाणी
तुटतो जिवाचा धीर ।

निसर्गाच्या हाती सारे
सोसतो सारे तीर ।
चंदना वाणी झिजतो
गड्या तुच शुर वीर ।

चिंता वाहतो दुनीयेची
अर्धपोटी तुझा संसार ।
लेतो शिउन फाटके
परी दिव्याखाली अंधार ।
Sanjay R.


परतीच्या वाटेवर ”

आहे हा वळणा वळणांचा थाट
कशी ही खाचखळग्यांची वाट ।
टाकले पहीले पाउल तेव्हा मी
नव्हता आधार कशात ।

पडलो झडलो आणी उठलो
हाती आई बाबांचा होता हात ।
उभा ठाकलो मी पायांवर तेव्हा
रोजच होती एक नवी पहाट ।

घातली पालथी दुनीया सारी
शोधला आनंद मी तयात ।
दुर पाहीले मृगजळ सुखाचे
झाले जेव्हा दोनाचे सहा हात ।

नव्हती उसंत मज एक क्षणाची
जशी सागरात उठणारी लाट ।
नाही उरला त्राण क्षीण झाले श्वास
शोधतो मी आता माझी परतीची वाट ।
Sanjay R.