उंच उंच आकाशात
घेतं मन भरारी ।
कधी अंतराचिच
होते वारी .।
येतं फिरुन क्षणात
दिशा चारी ।
जिवाला जिव कधी
होतो भारी ।
कधी ताटकळत बसतो
ह्रुदयाच्या दारी ।
आधार शब्दांचा त्यास
लावितो पारी ।
मुखातले बोल कसे
देइ ललकारी ।
नजरेत दिसे भावनांचे
लक्ष जरतारी ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment