मैत्रीची हो ही
दुनीयाच न्यारी ।
एकाहुन एक इथे
आहेत लय भारी ।
सुख: दुखाचे
सारेच साथी ।
उरेल कशाची
हो मग भीती ।
तरीही खंत
होतीच मनात ।
दुर गेले सारे
नाही उरले गावात ।
सगळेच लागले
आपल्या कामी ।
वाटे विसरलेत तर
नाही ना मित्रभुमी ।
आता मात्र किती
हो झाले बरे ।
उघडा मोबाईल
दिसतात सारे ।
मिटला दुरावा
जवळीक झाली ।
हास्य परतले
दिसतय गाली ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment