नको ते विपरीत सारे
का हे असे घडते ।
सांभाळायचे मन कसे
जाऊन तिथेच जडते ।
आठवणींचा डोंगर विशाल
करू किती मी पालथा ।
त्राणच उरले नाहीत
एकट्याने येईल का चालता ।
क्षणनी क्षण अवघड किती
डोळे असतात वाटेवर ।
थांबत नाही एक थेंब
जणू लाटच येते गालावर ।
हुंदकाही कुठे आवरतो
आवेग दुःखाचा सोसेना ।
तुझ्याविना जगू कसे
काहीच मजला सुचेना ।
ये परत तू सोडून सारे
नको विचार कशाचा ।
रोज बघतो सूर्य नवा
हवा किरण एक आशेचा ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment