वाट संसाराची कठीण
खडतर किती हा प्रवास ।
पोटाशिवाय असतो का
दुसरा कुठला ध्यास ।
भरले जरी पोट गच्च
सरत नाहीच हव्यास ।
अनाचारी होतो मग
घेतो हिसकून घास ।
स्वतःचाच विचार असतो
इतरांना देतो त्रास ।
राक्षस होतो कधी तोच
लालची पणाचे सारे प्रयास ।
अंत्य समयी काय नेतो
सोडून इथेच जातो श्वास ।
माणुसकीला असता जगला
नसता झाला कसला त्रास ।
चार सुखाचे दिवस सुटले
कुठे मिळाला त्याला विश्वास ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment