शब्दांना जुळती शब्द
चार ओळींची कविता ।
आयुष्यच पडे अपुरे
संपेना लिहिता लिहिता ।
रोज सूर्याची असे साक्ष
रात्री चांदण्यांची सरिता ।
सुखदुखाच्या आठवणी
अंतरात जणू ती गीता ।
अर्थाचे कधी होती अनर्थ
घडे त्यातून मग कथा ।
पुसून डोळ्यातली आसवे
मिटते कुठली व्यथा ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment