Monday, May 2, 2022

जीवनाची कविता

शब्दांना जुळती शब्द
चार ओळींची कविता ।

आयुष्यच पडे अपुरे
संपेना लिहिता लिहिता ।

रोज सूर्याची असे साक्ष
रात्री चांदण्यांची सरिता ।

सुखदुखाच्या आठवणी
अंतरात जणू ती गीता ।

अर्थाचे कधी होती अनर्थ
घडे त्यातून मग कथा ।

पुसून डोळ्यातली आसवे
मिटते कुठली व्यथा  ।
Sanjay R.


No comments: