तेव्हा कधी तरी एकदा
वारा अगदीच होता शांत ।
तू आणि मी दोघेच तेव्हा
बसलो असेल निवांत ।
त्यादिवशीचा तो आपला
असेल पहिलाच एकांत ।
बोलायला नव्हते सुचत
शब्दही झाले होते संथ ।
सहजच मग बोलून गेलो
कशाला बघतेस तू अंत ।
बोल मनातलं तुझ्या काही
बाळगू नकोस तू खंत ।
बोलणे तूच सुरू केलेस
बाकी अजूनही ते अनंत ।
तेच शब्दांचे होते मिलन
संपूच नये आता अंता पर्यंत ।
Sanjay R....
No comments:
Post a Comment