जायचे पुढेच पुढे
नाही साथ कुणाची ।
क्षितिजा च्या पलीकडे
जाते वाट ही आयुष्याची ।
दगड धोंडे मढेच येती
पार करायच्या अडचणी ।
झेलायचे घाव सारेच
जखमा होतील क्षणोक्षणी ।
माघारीचा नाही रस्ता
फक्त पुढे चालायचे ।
एक दिवस होईल संध्या
तोवर आपण जगायचे ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment