पोटासाठी चाले सारे
जीवन झाले कथा ।
ज्याचे तोच भोगतो
हीच जीवनाची व्यथा ।
दुःखाचा हा महासगर
आनंदाचा नाही पत्ता ।
हसत हसत भोगतो सारे
दारिद्र्याचीच महासत्ता ।
नाही कुणास देणेघेणे
माणुसकीचा झाला अंत ।
लुटारूंची फौज मोठी
कुणा म्हणू मी आता संत ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment