काय झाले कुणास ठाऊक
शांतीचा तर रंगच पालटला ।
मोर्चा दगडफेक जाळपोळ
हिंसेचा तर डोंब उसळला ।
सगळीकडे अफवांचा बाजार
सुत्रधाराने एक डाव रचला ।
जीव कुणाचा जातोय सांगा
अविचारी तर तिथेच फसला ।
शांती अहिंसा गांधींचा मार्ग
कसा रे माणसा तू विसरला ।
हो ना थोडा शांत जरासा
तुझ्यापाई रे माणूसच हरला ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment