Tuesday, December 24, 2019

" तुझ्या पाई रे माणूस हरला "

काय झाले कुणास ठाऊक
शांतीचा तर रंगच पालटला ।
मोर्चा दगडफेक जाळपोळ
हिंसेचा तर डोंब उसळला ।

सगळीकडे अफवांचा बाजार
सुत्रधाराने एक डाव रचला ।
जीव कुणाचा जातोय सांगा
अविचारी तर तिथेच फसला ।

शांती अहिंसा गांधींचा मार्ग
कसा रे माणसा तू विसरला ।
हो ना थोडा शांत जरासा
तुझ्यापाई रे माणूसच हरला ।
Sanjay R.

No comments: