सूर्य येताच मावळतीला
नभही झालेत लाल ।
आकाशही झाले निवांत
ओढली काळोखाची शाल ।
व्रुक्ष वेलीही स्थिरावले
परतले पक्षी घरट्यात ।
वारा झाला शांत जरा
चांदण्या चमकल्या अंगणात ।
रात राणीस आला बहर
दरवळला सुगंध चोहीकडे ।
सुखावला चंद्र जरासा
हळूच हसला बघून धरेकडे ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment