भुकेचा उसळला डोंब
कळली पोटाची आग ।
चौत कोर पोळीसाठी
होते किती भागम भाग ।
कष्टासाठी पुढे येती हात
सोसतो कुणाचाही राग ।
झेलतो किती शब्दांचे वार
असतो तो सर्स्वाचा त्याग ।
अन्न पाणी अन् निवारा
गरजांचा घेतो मी माग ।
अंताचा होतो अनंत
विझते कुठे ती आग ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment