मन झाले अधीर
वाटे झाला किती उशीर ।
धीर धरवेना आता
लागली नजर वाटेवर ।
श्वास लागले वाढाया
जीव झाला हूर हूर
डोळ्यात आसवे अवतरले
ओघळला गालावर पूर ।
वाट किती बघायची
येती मनात विचार ।
तांबडे झाले आकाश
सूर्य ही आता लाचार ।
हळूच आली एक चांदणी
वाटे होतो आता अंधार ।
लखलखला काजवा दूर
धरला रातकिड्यानी सुर ।
का येईना रे तू सख्या
केले मन तू का आतुर ।
तुझ्या विना नको वाटे
होऊ नको असा तू फितूर ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment