मनात जरी असेल
आपलेपणाचा ओलावा ।
पण स्वार्थ येतो आडवा
आणि वाढतो दुरावा ।
उरलीच कुठे माणुसकी
फालतुचेच होतात दावे ।
वेळ आली की कळते
गुणगान कुणाचे गावे ।
शब्दा शब्दात अंतर किती
कुठे काळोखाची काया ।
कधी सहजच जाणवते
शब्दातून किती माया ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment