मनाला तर खूप वाटतं
लिहावं असं काही काही ।
पण काय ते लिहावं
पेनाला ही ठाऊक नाही ।
शब्दांचा तर सागर इथे
तरीही जुळता जुळत नाही ।
कथा कविता कादंबरी
सारेच कसे वाट पाही ।
मनानेच केला निवाडा
लिहिले शब्द घेऊन वही ।
दुःख असतं दिशा दाही
आनंदाची करा घाई ।
खोटे नाटे कसेही हसा
आसवांना किंमत नाही ।
S
anjay R.
No comments:
Post a Comment