काय म्हणू या मनाला
आहे हे हळवे किती ।
असले मनात तर
जुळतात ना नाती ।
मनाचीही आहे व्यथा
तुटले की होते गाथा ।
सुटले की मग मात्र
का ठणकतो माथा ।
मन असते कुठे स्थिर
कधी फिरे भिर भिर ।
थांबत नाहीच कुठे
कधी मग सुटतो धीर ।
आनंदात विहरते कधी
उंच उंच आकाशात ।
दुःख झाले की मात्र
भासते आहे काळोखात ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment