उजाडले हे आयुष्य
भावनांची झाली राख ।
क्षण आता तो आला
नाही कुणा कुणाचा धाक ।
ओसाड पडली शहरे इथली
माणसांचा नाही कुठे पत्ता ।
जिकडे तिकडे आगीचे डोंब
काळया आभाळाची तिथे सत्ता ।
वर्चस्वाची ही लढाई
कोण मोठा कोण महान ।
मातीत मिळाले सारे काही
नाही उरले कुणास भान ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment