वेळच पडतो अपुरा
कुठे उरेल क्षण ।
ढीग हवा साऱ्यांना
पुरेल कसा कण ।
मुंगीचे असते बरे
वेचते एकेक कण ।
तरीही कसा तो
भरतो किती मण ।
आमची हावच भारी
नको कण कण ।
नितीच उरली कुठे
पडतो मग घण ।
काही तर असे इथे
पछाडतील सारे रण ।
मिळत नाही काहीच
उपाशी होतो सण ।
विचारांचा सारा घोळ
मी सांगिल तू म्हण ।
माणुसकीच नाही
विचारू नका गण ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment