किती करायचे सहन
आहे ना प्रश्न गहन ।
रोज होतात वाद
पण परत देतात साद ।
मन होतं म्हणे मोकळं
सांगायचं कसं सगळं ।
मार्ग आता एकच
प्रश्नांची उत्तरं फेकच ।
नको प्रश्न नको उत्तर
मनही झाले पत्थर ।
चढू दे दिवस एकेक जरा
कालच्या पेक्षा होता बरा ।
भोगली आजवर हीच तऱ्हा
जीवनाचा तर हाच फेरा ।
येईल कधी जोरात वारा
नेईल उडवून पसारा सारा ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment