कठीण असे ते काय असतं
मनात असलं की सगळं होतं ।
मनाचा ताबा कुणाच्या हाती
असेल इच्छा तर जुळतात नाती ।
मन कधी कशात ते गुरफटतं
मनच मग गुंता सारा सोडवतं ।
मनाला सांगा कुणाचा आधार
मी जागला की उचलतो भार ।
आहे जीवनाचाही एकच सार
सुखदुखातून होते सहज पार ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment