अस्त्र नको, शस्त्र नको
कशी ही लढाई ।
पैशाच्या बळावर
मारायची नुसती बढाई ।
निर्बल बघून सारे
करतात मग चढाई ।
निरपराधी जातात बळी
म्हणे कोण कुणाचा भाई ।
नाव किती गाव किती
वाळत नाही शाई ।
खबरे मागून खबर येते
जातो जीव त्राही ।
विचारांना थारा कुठे
सारे उचलतात बाही ।
रक्त गळते डोळ्यावाटे
पुसायला कोणी नाही ।
मनातच उठतात ज्वाला
होते लाही लाही ।
दूर निपचित पडले प्रेत
बघते दिशा दाही ।
हरलो जिंकलो वाद कुठला
मी जगतो शाही ।
सांगू नका वरचढ कोण
कोण कुणाला पाही ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment