नको बघू वाट
तो येणारच आहे ।
सरेल जेव्हा आयुष्य
तो नेणारच आहे ।
आज आहे तुझ्याकडे
काळजी कशाला करतोस ।
जगून घे रे मनसोक्त
उद्या सारेच जाणार आहेत ।
मन तर असतेच हळवं
हो ना जरासा खम्बीर ।
दूर कर विचारांच जाळं
होतोस कशाला तू गंभीर ।
बघ जरा तू हंस जरा
इतरांनाही हसव जरा ।
कधी सुख तर कधी दुःख
हा तर जीवनाचा फेरा ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment