जीवन माणसाचे
आहे हा प्रवास ।
मनात उठती तयात
किती किती ते ध्यास ।
पळापळी चाले सारी
असती सारे प्रयास ।
हाप लागते धाप लागते
येतो फुलून श्वास ।
वाटे अर्धवट सारे
लागेल कसा कयास ।
दूर दिसती आपुले
निव्वळ सारेच आभास ।
सारे भुकेने व्याकुळ
सुटतो मुखतला घास ।
किती हा लोभ मनाला
नाही संपत हव्यास ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment