हातात आले मोबाईल
हा जीवनाचा टप्पा
रंगताहेत आता खूप
त्यावरच गप्पा ।
पूर्वी मन मोकळं करायला
नव्हता कुठला पर्याय ।
समोरा समोर भेट व्हायची
सहजच वळायचे पाय ।
दिवस महिने वर्ष आता
कळतच नाही किती गेले ।
मोबाईलवरच होते भेट
सारे व्हर्चुअल आता झाले ।
जीवन झाले किती व्यस्त
आता वेळच नाही पुरत ।
मोबाईल वर करायच्या गप्पा
बसायचं कशाला झुरत ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment