गेल्या पडून सरी चार
अंगणात ।
गंध मातीचा पसरला
रोमारोमात ।
रातराणीने मिसळला
सुगंध तयात ।
दूड दुड धावती ढग
गगनात ।
सुर्याविनाच झाली आज
प्रभात ।
झुळ झुळ वाहे वारा गार
दस दिशात ।
गेला सांगून आज पाऊस
शिरला मनात ।
नवजीवन फुलेल आता
धरेच्या विश्वात ।
दिसती सारे रंग जीवनाचे
नव्या उत्साहात ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment