मन माणसाचं म्हणजे
आहे एक रहस्य ।
कधी रागाचा थरथराट
तर कधी सुहास्य ।
कधी चाले संथ निरंतर
एक एक श्वास ।
कधी विचारांचा कल्लोळ
त्यात नुसते आभास ।
सुख आणि शांती करी
सदा मनात वास ।
कधी लोभ आणि मोह
त्यांचाच चाले ध्यास ।
अधीर कधी अस्थिर
अंतरातले विचार ।
कधी लागे ध्यान कुठे
भासे सारे निराकार ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment