वारकरी मी
मुखी अभंग ।
आस दर्शनाची
नामात दंग ।
आली पालखी
संतांचा संग ।
भक्तिमय झाला
पंढरीचा रंग ।
चंद्रभागेच्या काठी
भक्तीचा उमंग ।
जय हरी श्री हरी
पांडुरंग पांडुरंग ।
Sanjay R.
वारकरी मी
मुखी अभंग ।
आस दर्शनाची
नामात दंग ।
आली पालखी
संतांचा संग ।
भक्तिमय झाला
पंढरीचा रंग ।
चंद्रभागेच्या काठी
भक्तीचा उमंग ।
जय हरी श्री हरी
पांडुरंग पांडुरंग ।
Sanjay R.
मनाला तर खूप वाटतं
लिहावं असं काही काही ।
पण काय ते लिहावं
पेनाला ही ठाऊक नाही ।
शब्दांचा तर सागर इथे
तरीही जुळता जुळत नाही ।
कथा कविता कादंबरी
सारेच कसे वाट पाही ।
मनानेच केला निवाडा
लिहिले शब्द घेऊन वही ।
दुःख असतं दिशा दाही
आनंदाची करा घाई ।
खोटे नाटे कसेही हसा
आसवांना किंमत नाही ।
S
anjay R.
बात है कुछ पहलेकी
दिन हुवे हो दो चार ।
उमडा था दिलमे
यूही मेरा प्यार ।
देखकर उनको
दिलमे हुई बहार ।
हसता चेहरा भोली सुरत
गाल गुलाबी जैसे अनार ।
सुंदरसी चमकीली आखे
ओठ शराबी गलेमे हार ।
जी कहेता रहा
कैसे करू मै दिदार ।
झोका हवाका आये
और तूट जाये दिवार ।
उलझन मी था दिल
किससे करू तकरार ।
कह दे वह कुछ भी
ना करू इनकार ।
करू मै उनसे
बस प्यार ही प्यार ।
बुझा दो बुझा दो
अब दिलमे लगी अंगार ।
Sanjay R.
म्हाया वऱ्हाडाची माती
फुलवते सारी नाती गोती ।
धनी राबतो थे शेती
होतो वला पावसाच्या घाती ।
पऱ्हाटीले फुटते पाती
वळे कष्टाच्या वाती ।
तवा येयी पयसा हाती
पोसे मानसाच्या जाती ।
घास दोन सारे खाती
कधी उपासाच्या राती ।
तुटे निसर्गाची गती
हाती ढेकलाची माती ।
दिस हपत्याचे साती
जीव उरफाटा घेती ।
अभंग तुकोबाचा गाती
फुले इंच इंच छाती ।
सपन उद्याचे पाहती
झोप सुखाची राती ।
Sanjay R.
काय किती भारी
जमात आमची सारी ।
पेलतायेत सगळे
आपापली जवाबदारी ।
गडबड गोंधळ घोटाळे
चाललंय दारोदारी ।
उघडा वर्तमान पात्र
दिसेल नुसती मारामारी ।
संपल्यातच जमा आहे
आता दुनिया दारी ।
पैज लागलं नुसती
कोण कुणावर भारी ।
राजकारणात दिसताहेत
गिधाडं आणी घारी ।
भोग भोगले आम्ही
आता आली तुमची बारी ।
जागोजागी वाळवळतात
हेच नाग विषारी ।
वाजवा कुणी आता
युद्धाची तुतारी ।
रे विठ्ठला फुलली कशी
माणसांनी पांढरी ।
माणुसकीचा दे प्रसाद
होईल सफल जन्माची वारी ।
Sanjay R.