Thursday, June 27, 2024
कविता प्रकाशित
आज दिनांक 23 जुन 2024 ला दैनिक तरुण भारत, आसमंत पुरवणीत माझी " आत्मविश्वास " ही कविता प्रकाशित झाली, संपादकांचे खूप खूप आभार .
गोष्ट माणसाची
जो तो इथे घाईत
आहे कुणाकडे वेळ ।
अहोरात्र काबाड कष्ट
बसेना कशाचा मेळ।
उरलीच कुठे सवड आता
जीवनच झाले खेळ ।
भूक साठी चाले सारे
उठते पोटात कळ ।
सुख समाधान हरवले
करतो नुसती पळापळ ।
खणायचे ते कुठे काय
गवसेल का आता तळ ।
Sanjay R.
Thursday, June 20, 2024
छंद लागला
लागला का छंद मज
कळेना असते कुठे मन ।
आठवणीत तुझ्याच का
जाईना एकही क्षण ।
कधी नजर आकाशात
नी मोजतो एकेक तारा ।
वाटावं कुणालाही बघून
आताच बरसतील धारा ।
तहान भूक हरतो सारे
नसते शुद्ध कशाचीच ।
आभास होतात सारखे
खेळ चालतो मनाशीच ।
मधेच हसतो मनात
कधी होतो मी गंभीर ।
लागेना मन कशात
कधी होते ते अधीर ।
Sanjay R.
गैर समज
समज वा नासमज
सगळाच गैर समज ।
समजवायचे किती
असो वा नसो गरज ।
तुटलेले हे मन असे
जुळेल का खरंच ।
धाग्याला धागा जुळतो
स्वच्छ असे मन तरच ।
नको राग नको लोभ
मोह माया ठेवा दूरच ।
मनाशी मन जुळवा
मी मी सोडाल तरच ।
Sanjay R.
Wednesday, June 19, 2024
Subscribe to:
Posts (Atom)