लागला का छंद मज
कळेना असते कुठे मन ।
आठवणीत तुझ्याच का
जाईना एकही क्षण ।
कधी नजर आकाशात
नी मोजतो एकेक तारा ।
वाटावं कुणालाही बघून
आताच बरसतील धारा ।
तहान भूक हरतो सारे
नसते शुद्ध कशाचीच ।
आभास होतात सारखे
खेळ चालतो मनाशीच ।
मधेच हसतो मनात
कधी होतो मी गंभीर ।
लागेना मन कशात
कधी होते ते अधीर ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment