सत्य टाकतो पुरून
अफवांचा येता पूर ।
खोट्याचा बोल बाला
लागे दुष्टांचा सूर ।
स्वप्न सुखाचे जिथे
दुःखात होते चुर चुर ।
रक्ताचे वाहती पाट
दुष्ट इथले आतुर ।
भ्रष्टच झाली बुद्धी
होते किती ते चतुर ।
झाले सारे इथे आता
नरभक्षक आसुर ।
उरली कुठे दया माया
माणुसकी तर दूर ।
असत्त्वच मिटले सारे
जिकडे तिकडे धूर ।
Sanjay R.
No comments:
Post a Comment